पुणे - नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून, दिवाळीच्या दिवशी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या धनकवडी परिसरात ही घटना घडली. मृत विवाहितेच्या पतीसह पाच नातेवाईकांवर आत्महत्या प्रकरणात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री निशिकांत निवगुणे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल
नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, यासाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून, दिवाळीच्या दिवशी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
![सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल Married woman commits suicide in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9550622-262-9550622-1605435163829.jpg?imwidth=3840)
विवाहितेचे वडील उत्तम धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2016 मध्ये भाग्यश्रीचे निशिकांत निवगुणे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून तिचा छळ सुरू होता. नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी तिने माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी तिच्या सासरच्या लोकांकडून करण्यात येत होती. तसेच तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून, भाग्यश्रीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुणे - नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन यावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून, दिवाळीच्या दिवशी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या धनकवडी परिसरात ही घटना घडली. मृत विवाहितेच्या पतीसह पाच नातेवाईकांवर आत्महत्या प्रकरणात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री निशिकांत निवगुणे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
विवाहितेचे वडील उत्तम धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2016 मध्ये भाग्यश्रीचे निशिकांत निवगुणे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून तिचा छळ सुरू होता. नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी तिने माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी तिच्या सासरच्या लोकांकडून करण्यात येत होती. तसेच तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून, भाग्यश्रीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.