पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१४ ला शिवसेनेचा प्रस्ताव घेऊन काँग्रेसकडे आले ( Manikrao Thackeray On Eknath Shinde ) होते. अशोक चव्हाण बोलतायत ते खरं आहे, पण त्यावेळेस राष्ट्रवादीची नेमकी भूमिका कळाली नाही आणि त्याने भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा दिल्याने भारतीय जनता पार्टीचे सरकार आले नाही. त्यावेळेसच महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता तर सरकार आले असते, असे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे ( Former president of Congress Manikrao Thackeray ) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. ( Congress Bhawan in Pune )
अशोक चव्हाण जे सांगतात ते अगदी खरे : 2014 ला राज्यस्तरावर ही चर्चा झाली होती. त्यावेळी मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे हे आमच्याकडे प्रस्ताव घेऊन आले होते. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीची भूमिका समोर येऊ शकली नाही आणि त्यामुळे चर्चा पुढे होऊ शकले नाही. परंतु ही चर्चा राज्यस्तरावर झाली होती आणि अशोक चव्हाण जे सांगतात ते अगदी खरं आहे. त्यावेळी पवार साहेबांची ही भूमिका मला समजली नाही आणि त्यामुळे तो प्रस्ताव तिथेच राहिला असे माणिकराव ठाकरे म्हणाले. 2014 ला काही शिवसेनेचे आमदार काँग्रेसमध्ये येणार अशी काही चर्चा नव्हती. परंतु शिवसेनेचा प्रस्ताव मात्र काँग्रेसकडे आलेला होता आणि मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यावेळी चर्चाही झाली होती. ती चर्चा प्राथमिक स्वरूपात होत असल्याचे असं माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.
पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी संवाद : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्तचे जे प्रशिक्षण शिबिर आहे त्याचा मी एक भाग आहे आणि प्रमुख आहे. त्याची जबाबदारी माझ्यावर काँग्रेसने दिली आहे. राज्याची त्यामुळे त्याकरिता पुण्यात आल्याची माहिती दिली. राहुल गांधी यांच्याबाबत विरोधक चुकीची माहिती पसरवतायेत. पाच जिल्ह्यात जरी जात असतील तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याची या यात्रेची माहिती व्हावी आणि जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रशिक्षण घेत आहोत. आणि त्यासाठीच आम्ही शहरामध्ये हे शिबिर घेत असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी आज पुण्यात म्हटला आहे.
दहा सूत्रे कार्यक्रम : संत गाडगेबाबा यांच्या नावाने सुरू केलेला दहा सूत्रे कार्यक्रम शिंदे सरकारने बंद पाडला असून त्याचा निषेध सर्वच समाजाने केला पाहिजे आणि आम्ही त्याचा निषेध करतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या योजना या सरकारने बंद पाडण्याचा मी निषेध करत असल्याचे माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.