ETV Bharat / city

अमित भाईंकडे काही गोष्टी गेल्यानंतर अनेकांना कापरे भरते, फडणवीसांचा विरोधकांना टोला

author img

By

Published : Jul 9, 2021, 6:44 PM IST

Updated : Jul 9, 2021, 7:02 PM IST

अमितभाईकडे काही गोष्टी गेल्यानंतर काही लोकांना कापरे भरते, त्याला आपण काही करू शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला

b
b

पुणे - अमित शाह हे राजकारणात येण्याआधी सहकारात होते. ते कार्यकर्ते म्हणून सहकारातून तयार झाले. त्यानंतर ते राजकारणात आले. त्यामुळे सहकार त्यांना पूर्णपणे माहीत आहे. गुजरात मधल्या सहकारातील प्रमुख नाव अमित शाह होते. त्यामुळे त्यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आले असावे. अमितभाईकडे काही गोष्टी गेल्यानंतर काही लोकांना कापरे भरते, त्याला आपण काही करू शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रीय मंत्रालयाचा फायदा महाराष्ट्राला अधिक -


केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाविषयी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, केंद्र सरकारने 70 वर्षात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्यावर केंद्र का हस्तक्षेप करत आहे, असा प्रश्न विचारला जातोय. केंद्र सरकारने उभे केलेल्या सहकार मंत्रालयाचा फायदा संपूर्ण देशाला आणि विशेषत: महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी जी मरणासन्न अवस्थेत होती ती मोदी सरकारच्या निर्णयामुळे पुनर्जिवीत झाली. त्यामुळे सहकाराला वाचवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे आणि आता स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चांगले बदल होतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस

अधिवेशन काळातच कोरोना अधिक गंभीर का होतो ?

फडणवीस म्हणाले, अधिवेशन आले की डेल्टा येतो, केलट येतो, अजून काय काय वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि अधिवेशन झाले की याच्या चर्चा संपतात. कोरोना गंभीर आहेच परंतु अधिवेशन आले की तो जास्त गंभीर का होतो. जनतेच्या प्रश्नांची सगळी आयुध गोठण्याचे काम सरकारने केले आहे. लोकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम, लोकशाहीला फासावर चढवण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. त्यांच्याविरोधात संघर्ष केल्याने आमदारांना निलंबित केले आहे. तरीदेखील ओबीसी समाजाचे, मराठा समाजाचे प्रश्न आम्ही मांडतच राहू. ओबीसींच्या प्रश्नावर आमची लढाई सुरूच राहील. जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई आम्ही चालूच ठेवणार आहोत.

..यामुळे पंकजांना आनंद झाला असेल -


सामना वृत्तपत्र कधीही भाजपबद्दल चांगले लिहित नाही, ते आमचे हितचिंतक देखील नाहीत. आमच्या पक्षाबद्दल ते कधीच बरे लिहिणार नाहीत. त्यामुळे सामनाने जे काय लिहिले त्याबद्दल काहीच आश्चर्य नाही. मी व भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी तयार केलेले नेतृत्व आहोत. मुंडे साहेबांवर निघालेला स्टॅम्प भागवत कराडांनी काढलेला आहे. भागवत कराड यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर जेवढा आनंद सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झाला असेल तेवढाच आनंद किंबहूना त्यापेक्षा जास्त आनंद पंकजा मुंडे यांना झाला असेल. कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातील आहेत. भारतीय जनता पक्षात राष्ट्र प्रथम ही भावना आहे. याविषयी पंकजा मुंडे यांनी जी काही भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे.

अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालय दिल्यावर काय म्हणाले जयंत पाटील -


अमित शाह यांना सहकार मंत्रिपदासाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना अप्रत्यक्षपणे खोचक टोला देखील लगावला आहे. “गुजरात आणि महाराष्ट्रातच सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शाह एक बँकही चालवत होते. नोटबंदीच्या काळात त्यांच्या एका बँकेचं नाव फार चर्चेत आलं होतं. जास्त नोटा त्या बँकेत एक्सचेंज झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव आहे”, असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमित शाह यांना आवाहन केलं आहे. “गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शाह यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल. मी त्यांच्या नेमणुकीचं स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधनं घालतेय, त्यांची स्वायत्तता धोक्यात आलीये. त्यांना अमित शाह सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. देशातल्या बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

पुणे - अमित शाह हे राजकारणात येण्याआधी सहकारात होते. ते कार्यकर्ते म्हणून सहकारातून तयार झाले. त्यानंतर ते राजकारणात आले. त्यामुळे सहकार त्यांना पूर्णपणे माहीत आहे. गुजरात मधल्या सहकारातील प्रमुख नाव अमित शाह होते. त्यामुळे त्यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आले असावे. अमितभाईकडे काही गोष्टी गेल्यानंतर काही लोकांना कापरे भरते, त्याला आपण काही करू शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रीय मंत्रालयाचा फायदा महाराष्ट्राला अधिक -


केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाविषयी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, केंद्र सरकारने 70 वर्षात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्यावर केंद्र का हस्तक्षेप करत आहे, असा प्रश्न विचारला जातोय. केंद्र सरकारने उभे केलेल्या सहकार मंत्रालयाचा फायदा संपूर्ण देशाला आणि विशेषत: महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी जी मरणासन्न अवस्थेत होती ती मोदी सरकारच्या निर्णयामुळे पुनर्जिवीत झाली. त्यामुळे सहकाराला वाचवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे आणि आता स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चांगले बदल होतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस

अधिवेशन काळातच कोरोना अधिक गंभीर का होतो ?

फडणवीस म्हणाले, अधिवेशन आले की डेल्टा येतो, केलट येतो, अजून काय काय वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि अधिवेशन झाले की याच्या चर्चा संपतात. कोरोना गंभीर आहेच परंतु अधिवेशन आले की तो जास्त गंभीर का होतो. जनतेच्या प्रश्नांची सगळी आयुध गोठण्याचे काम सरकारने केले आहे. लोकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम, लोकशाहीला फासावर चढवण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. त्यांच्याविरोधात संघर्ष केल्याने आमदारांना निलंबित केले आहे. तरीदेखील ओबीसी समाजाचे, मराठा समाजाचे प्रश्न आम्ही मांडतच राहू. ओबीसींच्या प्रश्नावर आमची लढाई सुरूच राहील. जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई आम्ही चालूच ठेवणार आहोत.

..यामुळे पंकजांना आनंद झाला असेल -


सामना वृत्तपत्र कधीही भाजपबद्दल चांगले लिहित नाही, ते आमचे हितचिंतक देखील नाहीत. आमच्या पक्षाबद्दल ते कधीच बरे लिहिणार नाहीत. त्यामुळे सामनाने जे काय लिहिले त्याबद्दल काहीच आश्चर्य नाही. मी व भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी तयार केलेले नेतृत्व आहोत. मुंडे साहेबांवर निघालेला स्टॅम्प भागवत कराडांनी काढलेला आहे. भागवत कराड यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर जेवढा आनंद सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झाला असेल तेवढाच आनंद किंबहूना त्यापेक्षा जास्त आनंद पंकजा मुंडे यांना झाला असेल. कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातील आहेत. भारतीय जनता पक्षात राष्ट्र प्रथम ही भावना आहे. याविषयी पंकजा मुंडे यांनी जी काही भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे.

अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालय दिल्यावर काय म्हणाले जयंत पाटील -


अमित शाह यांना सहकार मंत्रिपदासाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना अप्रत्यक्षपणे खोचक टोला देखील लगावला आहे. “गुजरात आणि महाराष्ट्रातच सहकार आहे. गुजरातमध्ये अमित शाह एक बँकही चालवत होते. नोटबंदीच्या काळात त्यांच्या एका बँकेचं नाव फार चर्चेत आलं होतं. जास्त नोटा त्या बँकेत एक्सचेंज झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव आहे”, असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमित शाह यांना आवाहन केलं आहे. “गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शाह यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल. मी त्यांच्या नेमणुकीचं स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधनं घालतेय, त्यांची स्वायत्तता धोक्यात आलीये. त्यांना अमित शाह सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. देशातल्या बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Last Updated : Jul 9, 2021, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.