ETV Bharat / city

मराठा अन् ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार शिक्षण संस्था असणाऱ्या नेत्यांनी उचलावा - राधाकृष्ण विखे पाटील

author img

By

Published : Jul 1, 2021, 9:02 PM IST

Updated : Jul 1, 2021, 9:22 PM IST

मराठा व ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार शैक्षणिक संस्था असणाऱ्या नेत्यांनी उचलावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील

पुणे - मराठा समाजाचे आरक्षण व ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे या दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी यावर्षीचा त्यांचा शिक्षणाचा भार ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्यांनी, आमदार-खासदारांनी उचलावा, अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिर्डी मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील जे विद्यार्थी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतील त्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः आमची शिक्षा संस्था करेल, अशी घोषणाही त्यांनी केली.

बोलताना राधाकृष्ण विखे पाटील
यावर्षी दोन्ही समाजाचे आरक्षण गेल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. लोकांकडे उत्पन्नाची साधने नाहीत. खरंतर या विद्यार्थ्यांची मदत सरकारने करणे अपेक्षित आहे. परंतु सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारकडून मला अजिबात अपेक्षा नाही. मात्र, सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी, आमदार-खासदारांनी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

मी जबाबदारी घेतली, प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील नेत्यांनीही घ्यावी

राधाकृष्ण विखे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक मराठा व ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत. या सर्व नेत्यांनी विद्यार्थ्यांचे दायित्व स्वीकारले पाहिजे. केंद्र सरकारवर टीका करून किंवा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून दोन्ही समाजातील नेत्यांनी आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांची जबाबदारी मी घेतली आहे. तसेच ती प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील नेत्यांनी घ्यावी, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा - या कारणामुळे पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, भावाने दिली ही माहिती

पुणे - मराठा समाजाचे आरक्षण व ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे या दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी यावर्षीचा त्यांचा शिक्षणाचा भार ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्यांनी, आमदार-खासदारांनी उचलावा, अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिर्डी मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील जे विद्यार्थी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतील त्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः आमची शिक्षा संस्था करेल, अशी घोषणाही त्यांनी केली.

बोलताना राधाकृष्ण विखे पाटील
यावर्षी दोन्ही समाजाचे आरक्षण गेल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. लोकांकडे उत्पन्नाची साधने नाहीत. खरंतर या विद्यार्थ्यांची मदत सरकारने करणे अपेक्षित आहे. परंतु सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारकडून मला अजिबात अपेक्षा नाही. मात्र, सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी, आमदार-खासदारांनी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

मी जबाबदारी घेतली, प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील नेत्यांनीही घ्यावी

राधाकृष्ण विखे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक मराठा व ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत. या सर्व नेत्यांनी विद्यार्थ्यांचे दायित्व स्वीकारले पाहिजे. केंद्र सरकारवर टीका करून किंवा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून दोन्ही समाजातील नेत्यांनी आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांची जबाबदारी मी घेतली आहे. तसेच ती प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील नेत्यांनी घ्यावी, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा - या कारणामुळे पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, भावाने दिली ही माहिती

Last Updated : Jul 1, 2021, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.