ETV Bharat / city

२०२५ पर्यंत गोवा आयटी आशियात नंबर एक होणार- मुख्यमंत्री

राज्य २०२५ पर्यंत गोवा आशिया खंडातील आयटी क्षेत्रातील अग्रगण्य राज्य करणार असून गावागावांत याच क्षेत्रात उद्योजक निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील नवोदित व्यावसायिकांना केले आहे. ते रविवारी पणजीतील अंत प्रेरणा या आयटी स्टार्टअप कार्यक्रमात बोलत होते.

author img

By

Published : Aug 29, 2021, 7:28 PM IST

goa
मुख्यमंत्री

पणजी - राज्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी सरकारने नवीन आयटी उद्योजकांना पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे. राज्याला स्वतंत्र होऊन नुकतीच 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सरकारने गोवा@६० ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्याला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प गोवा राज्याने केला आहे. यासाठी गोवा सरकारच्या वतीने नवीन राज्यात नवीन व्यावसायिक तयार व्हावेत व त्यांच्या मार्गदर्शनासाठी अंत प्रेरणा या आयटी परिषदेचे आयोजन रविवारी पणजीत करण्यात आले होते. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, गोवा माहिती व तंत्रज्ञान खाते व गोवा स्टार्टअप कॉर्पोरेशन च्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले होते.

गोवा आयटी आशियात नंबर एक होणार
गावागावात आयटी व्यावसायिक तयार व्हावेत- मुख्यमंत्रीराज्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी राज्यातील गावागावातील तरुण तरुणींनी आयटी व्यवसायाकडे वळावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणातून केले असून नवोदित व्यावसायिकांना मार्गदर्शन व व्यवसाय करण्यासाठी आपण व आपले सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.स्पीच- डॉ प्रमोद सावंतन्यू डेस्टिनेशन @गोवा- जेनिफर मोन्सरातपर्यटन, मत्स्य, मद्य, हॉटेल, समुद्रकिनारे ही गोव्याची वेगळी ओळख आहे या सर्वांना एकत्रित करण्यासाठी आयटीतील व्यावसायिका एकत्र येत आहेत. गोव्याच्या याच ओळखीमुळे अनेक आयटीतील व्यावसायिक आपले नवीन उद्योग येथे सुरू करत आहेत. त्यामुळे पर्यटणासोबतच आयटी क्षेत्रात गोव्याची वेगळी ओळख निर्माण होत असल्याची माहिती राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सरात यांनी दिली. २०२५ पर्यंत आशिया खंडात आयटीत अग्रेसर होणारपर्यटनामुळे मागच्या काही वर्षापासून देशविदेशातील अनेकांची ओढ गोव्याकडे लागली आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी गोव्यातील आयटी क्षेत्रात करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेमुळे अनेक व्यावसायिक गोव्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर असून 2025 पर्यंत ते आशिया खंडातील सर्वोत्तम राज्य करणार असल्याचा मनोदय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.हेही वाचा - तालिबान विरोधात दंड थोपटणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांची मुलगी भारतात घेतेय शिक्षण

पणजी - राज्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी सरकारने नवीन आयटी उद्योजकांना पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे. राज्याला स्वतंत्र होऊन नुकतीच 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सरकारने गोवा@६० ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्याला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प गोवा राज्याने केला आहे. यासाठी गोवा सरकारच्या वतीने नवीन राज्यात नवीन व्यावसायिक तयार व्हावेत व त्यांच्या मार्गदर्शनासाठी अंत प्रेरणा या आयटी परिषदेचे आयोजन रविवारी पणजीत करण्यात आले होते. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, गोवा माहिती व तंत्रज्ञान खाते व गोवा स्टार्टअप कॉर्पोरेशन च्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले होते.

गोवा आयटी आशियात नंबर एक होणार
गावागावात आयटी व्यावसायिक तयार व्हावेत- मुख्यमंत्रीराज्याला माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी राज्यातील गावागावातील तरुण तरुणींनी आयटी व्यवसायाकडे वळावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणातून केले असून नवोदित व्यावसायिकांना मार्गदर्शन व व्यवसाय करण्यासाठी आपण व आपले सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.स्पीच- डॉ प्रमोद सावंतन्यू डेस्टिनेशन @गोवा- जेनिफर मोन्सरातपर्यटन, मत्स्य, मद्य, हॉटेल, समुद्रकिनारे ही गोव्याची वेगळी ओळख आहे या सर्वांना एकत्रित करण्यासाठी आयटीतील व्यावसायिका एकत्र येत आहेत. गोव्याच्या याच ओळखीमुळे अनेक आयटीतील व्यावसायिक आपले नवीन उद्योग येथे सुरू करत आहेत. त्यामुळे पर्यटणासोबतच आयटी क्षेत्रात गोव्याची वेगळी ओळख निर्माण होत असल्याची माहिती राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सरात यांनी दिली. २०२५ पर्यंत आशिया खंडात आयटीत अग्रेसर होणारपर्यटनामुळे मागच्या काही वर्षापासून देशविदेशातील अनेकांची ओढ गोव्याकडे लागली आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी गोव्यातील आयटी क्षेत्रात करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेमुळे अनेक व्यावसायिक गोव्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर असून 2025 पर्यंत ते आशिया खंडातील सर्वोत्तम राज्य करणार असल्याचा मनोदय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.हेही वाचा - तालिबान विरोधात दंड थोपटणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांची मुलगी भारतात घेतेय शिक्षण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.