ETV Bharat / city

काँग्रेसचा गोवा राजभवनावर मोर्चा; पोलीस आणि आंदोलकांत रेटारेटी - गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर

देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. उद्योग बंद पडत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. मंदी असताना सरकार त्यावर काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. म्हणून गोवा काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला.

काँग्रेसचा गोवा राजभवनावर मोर्चा
काँग्रेसचा गोवा राजभवनावर मोर्चा
author img

By

Published : Dec 11, 2019, 8:15 AM IST

पणजी - ढासळलेली अर्थव्यवस्था आणि म्हादई नदी पाणीवापट या दोन्ही प्रकरणांमध्ये केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला. प्रवेशद्वारापासून काही अंतरावर पोलिसांनी हा मोर्चा रोखला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यानंतर मात्र, पोलिसांनी दहा जणांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी नेण्याची तयारी दर्शवली.

काँग्रेसचा गोवा राजभवनावर मोर्चा


काँग्रेसने मोर्चा काढून राज्यपालांना भेटून निवेदन देणार असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. त्यामुळे दोनापावल येथील राजभवनाचे प्रवेशद्वार आणि परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोनापावल सर्कल येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, प्रवक्ते जनार्दन भंडारी, सुभाष केरकर यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.


केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. उद्योग बंद पडत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. मंदी असताना सरकार त्यावर काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. तर देशभरात कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक बनली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात विदेशी पर्यटक येतील की नाही, अशी शंका येऊ लागली आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.


गोव्याची जीवनदायिनी असलेल्या 'म्हादई' नदीचा राजकारण्यांकडून सौदा सुरू आहे. राज्यपालांनी म्हादईबाबत गोव्यावर अन्याय होऊ देऊ नये. जर तसे झाले तर गोमंतकीय गप्प बसणार नाहीत, असेही कामत म्हणाले.


शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत असताना गोवा पोलिसांनी राजभवनापासून दूर अडवला. पोलीसही सरकारच्या अधिन आहे, त्यांच्या पक्षपातीपणाचा काँग्रेस निषेध करते. तसेच गोव्यावरील कर्जाचा बोजा 20 हजार कोटींच्या वर गेला आहे. उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे. यापुढे गोव्याचा आवाज दिल्लीत पोहचवण्यासाठी 14 डिसेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन छेडले जाईल, असे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष चोडणकर यांनी सांगितले.

पणजी - ढासळलेली अर्थव्यवस्था आणि म्हादई नदी पाणीवापट या दोन्ही प्रकरणांमध्ये केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला. प्रवेशद्वारापासून काही अंतरावर पोलिसांनी हा मोर्चा रोखला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यानंतर मात्र, पोलिसांनी दहा जणांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी नेण्याची तयारी दर्शवली.

काँग्रेसचा गोवा राजभवनावर मोर्चा


काँग्रेसने मोर्चा काढून राज्यपालांना भेटून निवेदन देणार असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. त्यामुळे दोनापावल येथील राजभवनाचे प्रवेशद्वार आणि परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोनापावल सर्कल येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, प्रवक्ते जनार्दन भंडारी, सुभाष केरकर यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.


केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. उद्योग बंद पडत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. मंदी असताना सरकार त्यावर काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. तर देशभरात कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक बनली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात विदेशी पर्यटक येतील की नाही, अशी शंका येऊ लागली आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.


गोव्याची जीवनदायिनी असलेल्या 'म्हादई' नदीचा राजकारण्यांकडून सौदा सुरू आहे. राज्यपालांनी म्हादईबाबत गोव्यावर अन्याय होऊ देऊ नये. जर तसे झाले तर गोमंतकीय गप्प बसणार नाहीत, असेही कामत म्हणाले.


शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत असताना गोवा पोलिसांनी राजभवनापासून दूर अडवला. पोलीसही सरकारच्या अधिन आहे, त्यांच्या पक्षपातीपणाचा काँग्रेस निषेध करते. तसेच गोव्यावरील कर्जाचा बोजा 20 हजार कोटींच्या वर गेला आहे. उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे. यापुढे गोव्याचा आवाज दिल्लीत पोहचवण्यासाठी 14 डिसेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन छेडले जाईल, असे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष चोडणकर यांनी सांगितले.

Intro:पणजी : ढासळलेली अर्थव्यवस्था आणि म्हादई नदी पाणीवापट दोन्ही मध्ये केंद्र सरकारचा सहभाग असल्याने यामुद्द्यांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने राजभवनवर मोर्चा काढला होता. परंतु, प्रवेशद्वारापासून काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा रोखला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यामध्ये जोरदार रेटारेटी झाली. त्यानंतर पोलिसांनी दहा जणांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी नेण्याची तयारी दर्शवली.


Body:काँग्रेसने आज मोर्चा काढत राज्यपालांना भेटून निवेदन देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे दोनापावल येथी राजभवन प्रवेशद्वार आणि परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोनापावल सर्कल येथे जमून गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, प्रवक्ते जनार्दन भंडारी, सुभाष केरकर यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
राजभवन प्रवेशद्वारापासून काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा रोखल्यामुळे बँरिकेडस तोडून पुढे जाण्याच प्रयत्न मोर्चेकरी करत होते. तर दुसऱ्या बाजुने पोलिसांनी सर्वशक्तीनीशी त्यांना मागे रेटले. अशा रेटारेटी दरम्यान राज्यपालांना भेटण्यासाठी 10 जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी देण्यात आली. त्यांनी आपले निवेदन सादर केले.
यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. उद्योग बंद पडत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. मंदी असताना सरकार त्यावर काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. तर दुसरीकडे देशभराऊ कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक बनली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विदेशी पर्यटक येतील की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.
तसेच गोव्याची जीवनदायीनी ' म्हादई' नदीचा राजकारण्यांकडून सौदा सुरू आहे. याचा आम्ही निषेध करतो. राज्यपालांनी म्हादई बाबत गोव्यावर अन्याय होऊ देऊ नये. जर तसे झाले तर गोमंतकीय गप्प बसणार नाहीत. याची झलक भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्घाटन सोहळ्यात तीन कार्यकर्त्यांनी दाखवून दिली आहे. निवेदनाद्वारे राज्यपालांच्या माध्यामातून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, असेही कामत म्हणाले.
तर गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष चोडणकर म्हणाले, शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत असताना गोवा पोलिसांनी सरकारच्या अधिन होत राजभवनापासून दूर अडविला. त्यांच्या पक्षपाती पणाबद्दल काँग्रेस निषेध करते. तसेच गोव्याच्या कर्जचा बोजा 20 हजार कोटींच्या पार गेला आहे. उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे. राज्यपालांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला सांगू इच्छितो की, यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी आमचा पक्ष सहकार्य करण्यास तयार आहे. तसेच कर्नाटक निवडणुकीसाठी म्हादईचा सौदा करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तसेच यापुढे गोव्याचा आवाज दिल्लीत पोहचविण्यासाठी 14 डिसेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन छेडले जाईल. तसेच आवश्यकता भासल्यास जंतरमंतर येथील निदर्शने केली जातील.
..


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.