ETV Bharat / city

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना बांधल्या राख्या; नाशिक येथील चिमुकल्यांचा उपक्रम - nashik

स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून 'मस्ती की पाठशाळा' प्रकल्पातील मुलांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चारचाकी व दुचाकीस्वारांना राख्या बांधल्या. अनेक रिक्षाचालकांनी व नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करुन चिमुकल्यांकडून राख्याही बांधून घेतल्या.

चिमुकल्यांचा उपक्रम
author img

By

Published : Aug 15, 2019, 8:47 PM IST

नाशिक - 'हेल्मेट है जरूरी, ना समजो इसे मजबुरी', 'सीट बेल्ट लावा, अपघात टाळा' तसेच 'आपली कोणी तरी वाट पाहतयं' अशा प्रकारचा संदेश देत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांना राख्या बांधण्यात आल्या. शहरातील जीबीएस या सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन केले. या उपक्रमाला नाशिककरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

rakshabandhan at nashik
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना बांधल्या राख्या

स्वातंत्र्य दिनाचे आणि रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चारचाकी व दुचाकीस्वारांना 'मस्ती की पाठशाळा' प्रकल्पातील मुलांच्या हस्ते राख्या बांधण्यात आल्या. हा जनजागृतीपर कार्यक्रम नाशिकच्या औरंगाबाद नाका चौकात पार पडला. बांधल्या गेलेल्या राख्या या संस्थेच्या चिमुकल्यांनी स्वतः तयार केल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून वाहतुकीसंदर्भातील आदर्श उपक्रम समाजासमोर ठेवण्यात आला आहे.

अनेक रिक्षाचालकांनी व नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच चिमुकल्यांकडून राख्याही बांधून घेतल्या. उपक्रमात वाहतूक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार तसेच जीबीएस एनजीओच्या अध्यक्षा सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, संस्थेचे स्वयंसेवी तुषार धुमाळ, अभिजीत तांबे, कैलास जाधव, रत्ना दिवे, शैलेंद्र भारती, रितू कदम, शशिकांत गोसावी, समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्नेहा आहेर, कविता गावित आदींनी परिश्रम घेतले.

नाशिक - 'हेल्मेट है जरूरी, ना समजो इसे मजबुरी', 'सीट बेल्ट लावा, अपघात टाळा' तसेच 'आपली कोणी तरी वाट पाहतयं' अशा प्रकारचा संदेश देत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांना राख्या बांधण्यात आल्या. शहरातील जीबीएस या सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन केले. या उपक्रमाला नाशिककरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

rakshabandhan at nashik
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना बांधल्या राख्या

स्वातंत्र्य दिनाचे आणि रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चारचाकी व दुचाकीस्वारांना 'मस्ती की पाठशाळा' प्रकल्पातील मुलांच्या हस्ते राख्या बांधण्यात आल्या. हा जनजागृतीपर कार्यक्रम नाशिकच्या औरंगाबाद नाका चौकात पार पडला. बांधल्या गेलेल्या राख्या या संस्थेच्या चिमुकल्यांनी स्वतः तयार केल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून वाहतुकीसंदर्भातील आदर्श उपक्रम समाजासमोर ठेवण्यात आला आहे.

अनेक रिक्षाचालकांनी व नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच चिमुकल्यांकडून राख्याही बांधून घेतल्या. उपक्रमात वाहतूक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार तसेच जीबीएस एनजीओच्या अध्यक्षा सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, संस्थेचे स्वयंसेवी तुषार धुमाळ, अभिजीत तांबे, कैलास जाधव, रत्ना दिवे, शैलेंद्र भारती, रितू कदम, शशिकांत गोसावी, समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्नेहा आहेर, कविता गावित आदींनी परिश्रम घेतले.

Intro:हेल्मेट हे जरूरी ना समजो इसे मजबुरी चा संदेश देत विद्यथ्यां कडून वाहतूक नियमाचे प्रबोधन..


Body:'हेल्मेट हे जरूरी' 'ना समजो इसे मजबुरी','सीट बेल्ट लावा','अपघात टाळा','आपली कोणी तरी वाट पाहताय' अशा प्रकारचे संदेश देत वाहतुकीच्या नियमांचे पालन नं करणाऱ्या वाहनधारकांना जीबीएस सामाजिक संस्थेच्या विद्यथ्यांनी राख्या बांधून वाहतुकीच्या नियमा बाबत प्रबोधन केलं,ह्या उपक्रमाला नाशिककरांना सकारात्मक प्रतिसाद दिला...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे आणि रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून वाहतुकीचे नियम पालन न करणाऱ्या चार चाकी व दुचाकीस्वारांना वाहतूक जनजागृतीपर बोधचिन्ह असलेल्या संस्थेच्या मस्ती की पाठशाळा प्रकल्पातील गरीब ,गरजू,अनाथ मुलांच्या हस्ते राख्या बांधून जनजागृतीपर कार्यक्रम नाशिकच्या औरंगाबाद नाका चौकात घेण्यात आला,या बांधल्या गेलेल्या राख्या या संस्थेच्या चिमुकल्यांनी स्वतः तयार करून वाहतुकीसंदर्भात एक आदर्श उपक्रम समाजासमोर ठेवला आहे,

हेल्मेट हे जरुरी ना समजो हे मजबुरी ,सीट बेल्ट लावा अपघात टाळा, आपली कोणी तरी घरी वाट पाहतय अशा स्वरूपाचे संदेश देणाऱ्या या राख्या वाहनधारकांना बांधण्यात आल्या...


यामागील सर्वात मोठा उद्देश असा की शाळकरी मुले रस्त्याने जातांनाचारचाकी व दुचाकी धारक कुठल्याही प्रकाराचे भान नं राखत वाहन चालवतात अशात अनेक शाळकरी मुलांच्या दुर्घटना ऐकावयास व पहावयास मिळतात, या उपक्रमातून रस्त्यावर चालणार्‍या शाळकरी मुलांच्या बाबत नक्कीच वाहनधारकांनी वाहन चालवतांना विचार करणे गरजेचे आहे, या उपक्रमात प्रसंगी अनेक रिक्षाचालकांनी व हेल्मेट घातलेल्या नागरिकांनी ही स्वतःहून या उपक्रमाचे स्वागत करीत चिमुकलं कडून राख्या बांधून घेतल्या, या उपक्रमास वाहतूक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, सर्व वाहतूक पोलिस कर्मचारी जीबीएस एनजीओचे अध्यक्षा सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, संस्थेचे स्वयंसेवी तुषार धुमाळ,अभिजीत तांबे ,कैलास जाधव, रत्ना दिवे ,शैलेंद्र भारती, रितू कदम ,शशिकांत गोसावी, तसेच समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्नेहा आहेर ,कविता गावित आदींनी परिश्रम घेतले...



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.