ETV Bharat / city

नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक

author img

By

Published : Dec 18, 2019, 1:01 PM IST

सध्या नागरिकत्व विधेयकावरुन दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व विधेयकाबद्दल केलेले वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

sudhir mungantiwar reacts on ashok chavan' statement
नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक

नागपूर - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व कायदा घटनेला धरून नसल्याचे वक्तव्य केले होते. यामुद्द्यावर विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. चव्हाणांचे वक्तव्य घटनाविरोधी असून ते सभागृहाच्या कमकाजातून काढून टाका, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सध्या नागरिकत्व विधेयकावरुन दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायद्याबद्दल स्पष्टता नसल्याचे सांगितले आहे. ऊस तोडण्यासाठी शेतात जाणाऱ्या वंजारी समाजाला नागरिकत्वापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

याबद्दल पुढे बोलताना, वंजारी समाजातील स्त्रियांचे अनेकदा शेतातच बाळंतपण होते; अशा वेळी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसतात. यानंतर ऊस कामगारांनी नागरिकत्व सिद्ध करणारे दाखले कुठून आणायचे, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच या विधेयकामुळे गरीब-श्रीमंत भेद वाढणार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

नागपूर - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व कायदा घटनेला धरून नसल्याचे वक्तव्य केले होते. यामुद्द्यावर विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. चव्हाणांचे वक्तव्य घटनाविरोधी असून ते सभागृहाच्या कमकाजातून काढून टाका, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सध्या नागरिकत्व विधेयकावरुन दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायद्याबद्दल स्पष्टता नसल्याचे सांगितले आहे. ऊस तोडण्यासाठी शेतात जाणाऱ्या वंजारी समाजाला नागरिकत्वापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

याबद्दल पुढे बोलताना, वंजारी समाजातील स्त्रियांचे अनेकदा शेतातच बाळंतपण होते; अशा वेळी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसतात. यानंतर ऊस कामगारांनी नागरिकत्व सिद्ध करणारे दाखले कुठून आणायचे, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच या विधेयकामुळे गरीब-श्रीमंत भेद वाढणार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे



माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी
नागरिकत्व कायदा घटना विरोधी असल्याचे वक्तव्य विधानसभेत केल्यानंतर पुन्हा विरोधक आक्रमक झाले आहेत...अशोक चव्हाण यांचे वक्तव्य घटनाविरोधी असून ते
वक्त्याव्य सभागृहाच्या कमकाजातून काढून टाका अस भाजप नेते सुधीर मुनगंटीवार केले आहे...या विषयावर दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत...राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कायदा विरोधात संभ्रम असून त्या संदर्भात स्पष्टता नसल्याचे म्हंटले आहे...वंजारी समाज आजही ऊस तोडण्याची साठी शेतात जातो,तिथेच त्याचे बाळंतपण होत,त्यावेळी त्यांच्या कडे कुठले कागदपत्रे नसतात,अश्या प्रसंगी ते नागरिकत्व सिद्ध करणारे दाखले कुठून आणतील...नागरिकत्व विधेयकामुळे गरीब श्रीमंत मधील भेट वाढल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे

बाईट- जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादी आमदार

नागरिकत्व कायदा देशाच्या सर्वोच्च सभागृहात पारित झाल्यानंतर त्या संदर्भात अवमान कारक वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे...सर्वोच न्यायालयाने या कायद्याच्या स्टे दिलेला नाही....हा सत्ताधाऱ्यांचे वक्तव लोकसभा आणि राजसभेत अवमान असल्याचे शेलार म्हणाले आहेत..

बाईट- आशिष शेलार- भाजप नेते

Body:,Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.