ETV Bharat / city

NCP on Opposition Alliance : काँग्रेसशिवाय विरोधकांच्या एकजुटीची मोट शक्य नाही, हीच शरद पवारांची भूमिका - नवाब मलिक

author img

By

Published : Dec 4, 2021, 7:48 PM IST

Updated : Dec 4, 2021, 8:37 PM IST

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक ( NCP Spokesperson Nawab Malik ) म्हणाले, की देशात 2024 च्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका ( NCP spokesperson on 2024 Loksabha election ) डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी निर्माण करण्याचे काम या देशात सुरू आहे. त्यांचे नेतृत्व कोण करेल, हा आताचा तो विषय नाही. सामुहिक नेतृत्व राहिले पाहिजे, अशीच भूमिका असणार आहे. एकदा सर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यानंतर पुढील रणनीतीबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक

नागपूर - भाजप विरोधात देशात विरोधकांची मोट बांधायची आहे. पण ती मोट बांधताना काँग्रेस पक्षाशिवाय एकजुटीने मोट बांधली जाऊ शकत नाही, अशीच भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची असल्याचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik on Opposition Alliance ) यांनी स्पष्ट केले. ते गोंदियाच्या दौऱ्यावर असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, की देशात 2024 च्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका ( NCP spokesperson on 2024 Loksabha election ) डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी निर्माण करण्याचे काम या देशात सुरू आहे. त्यांचे नेतृत्व कोण करेल, हा आताचा तो विषय नाही. सामुहिक नेतृत्व राहिले पाहिजे, अशीच भूमिका असणार आहे. एकदा सर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यानंतर पुढील रणनीतीबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे.

मोठी आघाडी निर्माण करण्याचे काम या देशात सुरू

हेही वाचा-MP Dr. Amol Kolhe Trolled : 'पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर पण...'; डॉ. अमोल कोल्हेंचे ट्वीट

काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधकांची मूठ बांधणार-

पुढे मलिक म्हणाले, की काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाही. हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशीच भूमिका ममता बॅनर्जी यांनीही मांडली आहे. सगळे एकत्र येऊन एकजुटीने काम कारून विरोधकांचा मोर्चा बांधू. 2024 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देऊ. देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे 2024 मध्ये नक्कीच परिवर्तन घडून येईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षासोबत युपीएचे घटक नसलेल्या खासदारांची संख्या ही 150 च्या घरात आहे. त्या सगळ्यांची एकजूट करण्याचे काम सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

हेही वाचा-Brother Killed Sister : दया दाखवणाऱ्या बहिणीचा भावाने केला खून, दोन दिवस मृतदेहाजवळ होता बसून

राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय समितीच्या निर्णयाप्रमाणे निवडणूक लढू-
भंडारा -गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे दोघेही मित्रपक्ष समोरासमोर लढणार आहेत. ही पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचा निर्णय आणि संघटनेचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय समिती ( NCP national committee Bhandara Gondia ZP election ) मान्य करेल. त्या पद्धतीने स्थानिक निवडणुकांमध्ये पक्ष सामोरे जाईल. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढावे, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. काँग्रेसच्या 'एकला चलोरे'च्या भूमिकेला उत्तर देण्याचे काम करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-Atrocity Against Nawab Malik : नवाब मलिक यांना 13 डिसेंबरला हजर राहण्याचे वाशिम न्यायालयाचे आदेश

तिसऱ्या आघाडीच्या चर्चेत ममता बॅनर्जींनी काँग्रेसबद्दल व्यक्त केली होती नाराजी-

ममता बॅनर्जी यांनी मुंबईत दौऱ्यात 1 डिसेंबर 2021 रोजी शरद पवार (Mamata Banerjee met Sharad Pawar)यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तिसरा आघाडीबाबत चर्चा झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी एक मजबूत तिसरी आघाडी देशाला (Mamata Banerjee on Third Alliance) देण्याची गरज असल्याचे यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका योग्य बजावत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र तिसरी आघाडी ही सर्वांना सोबत घेऊनच होऊ शकते असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

नागपूर - भाजप विरोधात देशात विरोधकांची मोट बांधायची आहे. पण ती मोट बांधताना काँग्रेस पक्षाशिवाय एकजुटीने मोट बांधली जाऊ शकत नाही, अशीच भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची असल्याचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik on Opposition Alliance ) यांनी स्पष्ट केले. ते गोंदियाच्या दौऱ्यावर असताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, की देशात 2024 च्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका ( NCP spokesperson on 2024 Loksabha election ) डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी निर्माण करण्याचे काम या देशात सुरू आहे. त्यांचे नेतृत्व कोण करेल, हा आताचा तो विषय नाही. सामुहिक नेतृत्व राहिले पाहिजे, अशीच भूमिका असणार आहे. एकदा सर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यानंतर पुढील रणनीतीबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे.

मोठी आघाडी निर्माण करण्याचे काम या देशात सुरू

हेही वाचा-MP Dr. Amol Kolhe Trolled : 'पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर पण...'; डॉ. अमोल कोल्हेंचे ट्वीट

काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधकांची मूठ बांधणार-

पुढे मलिक म्हणाले, की काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाही. हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशीच भूमिका ममता बॅनर्जी यांनीही मांडली आहे. सगळे एकत्र येऊन एकजुटीने काम कारून विरोधकांचा मोर्चा बांधू. 2024 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देऊ. देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे 2024 मध्ये नक्कीच परिवर्तन घडून येईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षासोबत युपीएचे घटक नसलेल्या खासदारांची संख्या ही 150 च्या घरात आहे. त्या सगळ्यांची एकजूट करण्याचे काम सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

हेही वाचा-Brother Killed Sister : दया दाखवणाऱ्या बहिणीचा भावाने केला खून, दोन दिवस मृतदेहाजवळ होता बसून

राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय समितीच्या निर्णयाप्रमाणे निवडणूक लढू-
भंडारा -गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे दोघेही मित्रपक्ष समोरासमोर लढणार आहेत. ही पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. स्थानिक पातळीवर पक्षाचा निर्णय आणि संघटनेचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय समिती ( NCP national committee Bhandara Gondia ZP election ) मान्य करेल. त्या पद्धतीने स्थानिक निवडणुकांमध्ये पक्ष सामोरे जाईल. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढावे, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. काँग्रेसच्या 'एकला चलोरे'च्या भूमिकेला उत्तर देण्याचे काम करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-Atrocity Against Nawab Malik : नवाब मलिक यांना 13 डिसेंबरला हजर राहण्याचे वाशिम न्यायालयाचे आदेश

तिसऱ्या आघाडीच्या चर्चेत ममता बॅनर्जींनी काँग्रेसबद्दल व्यक्त केली होती नाराजी-

ममता बॅनर्जी यांनी मुंबईत दौऱ्यात 1 डिसेंबर 2021 रोजी शरद पवार (Mamata Banerjee met Sharad Pawar)यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तिसरा आघाडीबाबत चर्चा झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी एक मजबूत तिसरी आघाडी देशाला (Mamata Banerjee on Third Alliance) देण्याची गरज असल्याचे यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका योग्य बजावत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र तिसरी आघाडी ही सर्वांना सोबत घेऊनच होऊ शकते असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

Last Updated : Dec 4, 2021, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.