ETV Bharat / city

दोन वेळेस पराभूत उमेदवारांना उमेदवारी देऊ नका; काँग्रेस नेत्यांची मागणी

author img

By

Published : Sep 5, 2019, 2:06 PM IST

महापालिकेचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. परंतु, यानंतर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेने नाकारलेल्यांना उमेदवारी न देण्याची मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.

स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेने नाकारलेल्यांना उमेदवारी न देण्याची केली मागणी

नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. दोन वेळेला उमेदवारी मिळवून पराभूत होणाऱ्या व जनतेकडून मोठ्या अंतराने नाकारल्या जाणाऱ्या नेत्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत आहे.

स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेने नाकारलेल्यांना उमेदवारी न देण्याची केली मागणी

महापालिकेचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. परंतु, यानंतर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेने नाकारलेल्यांना उमेदवारी न देण्याची मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. जे काँग्रेस नेते दोनदा पक्षाची उमेदवारी मिळाल्यावरही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत, त्यांना पक्षाने यंदाच्या विधानसभेसाठी उमेदवारी देऊ नये, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. ज्यांना आधीच जनतेने नाकारले आहे, त्यांना पुन्हा पुन्हा जनतेसमोर का पाठवता, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा मुकुल वासनिक होणार काँग्रेसचे अध्यक्ष ? आज निर्णय

तसेच नागपूर पश्चिममधून उमेदवारी मागणारे नरेंद्र जिचकर यांनी राहुल गांधींनी इतर राज्यात राबवलेले प्रयोग महाराष्ट्रात राबवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रात तिकीट वाटताना या निकषाची अंमलबजावणी केल्यास शहरातील काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे असे अनेक नेते उमेदवारीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा सेना-भाजपत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी रस्सीखेच

तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेल्यांना यंदा तिकीट दिले जाऊ नये, अशीही मागणी होत आहे. त्यामुळे या मागणीनंतर काँग्रेस पक्षात नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. दोन वेळेला उमेदवारी मिळवून पराभूत होणाऱ्या व जनतेकडून मोठ्या अंतराने नाकारल्या जाणाऱ्या नेत्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत आहे.

स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेने नाकारलेल्यांना उमेदवारी न देण्याची केली मागणी

महापालिकेचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. परंतु, यानंतर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेने नाकारलेल्यांना उमेदवारी न देण्याची मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. जे काँग्रेस नेते दोनदा पक्षाची उमेदवारी मिळाल्यावरही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत, त्यांना पक्षाने यंदाच्या विधानसभेसाठी उमेदवारी देऊ नये, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. ज्यांना आधीच जनतेने नाकारले आहे, त्यांना पुन्हा पुन्हा जनतेसमोर का पाठवता, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा मुकुल वासनिक होणार काँग्रेसचे अध्यक्ष ? आज निर्णय

तसेच नागपूर पश्चिममधून उमेदवारी मागणारे नरेंद्र जिचकर यांनी राहुल गांधींनी इतर राज्यात राबवलेले प्रयोग महाराष्ट्रात राबवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रात तिकीट वाटताना या निकषाची अंमलबजावणी केल्यास शहरातील काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे असे अनेक नेते उमेदवारीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा सेना-भाजपत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी रस्सीखेच

तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेल्यांना यंदा तिकीट दिले जाऊ नये, अशीही मागणी होत आहे. त्यामुळे या मागणीनंतर काँग्रेस पक्षात नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Intro:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर काँग्रेस मधील अंतर्गत वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे,कारण दोन वेळेला उमेदवारी मिळवून पराभूत होणाऱ्या व जनते कडून मोठ्या अंतराने नाकारल्या जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांना आता पुन्हा विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी आता काँग्रेस मध्ये जोर धरत आहे... नागपुरातील काही काँग्रेस नेत्यांनी तशी मागणी केली आहे. Body:नागपूर काँग्रेसमधील वाद आणि गटबाजी गल्ली ते दिल्ली पर्यंत सर्वश्रुत आहे... मात्र आता नागपूर काँग्रेस मधील काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समोर आणलेल्या मागणीमुळे याच वादात तेल ओतल्या जाण्याची शक्यता आहे... नागपूर महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणारे तानाजी वनवे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली आहे की जे काँग्रेस नेते दोन वेळेला पक्षाची उमेदवारी मिळवून विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहे... त्यांना पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नये... ज्यांना आधीच जनतेने मोठ्या मताधिक्याने नाकारले आहे... त्यांना पुन्हा पुन्हा जनतेसमोर का पाठवता असा सवाल ही त्यांनी विचारला आहे...तसेच नागपूर पश्चिममधून उमेदवारी मागणारे नरेंद्र जिचकार यांनी ही तीच मागणी करत पक्षाने वारंवार पराभूत होणाऱ्या उमेदवारांना संधी देऊ नये... राहुल गांधी यांनी इतर राज्यात राबविलेले प्रयॊग महाराष्ट्रात राबवावे अशी मागणी केली आहे... आता काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रात तिकीट वाटताना या निकषाची अंमलबजावणी केली तर नागपुरात काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, नागपूर काँग्रेसचे विद्यमान शहर अध्यक्ष विकास ठाकरे असे अनेक नेते उमेदवारी मिळवण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे... एवढेच नाही तर ज्यांना गेल्या ( २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ) निवडणुकीत जनतेने मोठ्या मताधिक्याने पराभूत केले आहे... त्यांना ही या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर पुन्हा पाठवू नये अशी मागणी करण्यात आली आहे....राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये हेच निकष वापरून पक्षाला अच्छे दिन आणले... आता त्याच निकषांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करा अशी मागणी नागपुरात काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे... तसे झाल्यास राज्यात अनेक काँग्रेस दिग्गजांना उमेदवारीचे स्वप्न भंगण्याची शक्यता असून अनेक काँग्रेस नेत्यांना या निवडणुकीत घरी बसावे लागणार... त्यामुळे या मागणीनंतर काँग्रेस पक्षात एका नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.


बाईट -- तानाजी वनवे (विरोधीपक्ष नेते, महापालिका)-- माथ्यावर टिळा लावलेले, चष्मा घातलेले
बाईट -- नरेंद्र जिचकार (काँग्रेस नेते)


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.