ETV Bharat / city

मनरेगाच्या राज्य आयुक्तालयाला भिषण आग, आगीत कार्यालय जळून खाक

author img

By

Published : May 2, 2021, 4:07 PM IST

नागपूरच्या प्रशासकीय भवनातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या (मनरेगा) राज्य आयुक्तालयाच्या कार्यालयात आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास लागली. या आगीमध्ये ऑफीस पूर्णपणे जळून खाक झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र या आगीमध्ये कार्यालयातील सर्व दस्तावेज जळून खाक झाले आहेत.

मनरेगाच्या राज्य आयुक्तालयाला भिषण आग
मनरेगाच्या राज्य आयुक्तालयाला भिषण आग

नागपूर - नागपूरच्या प्रशासकीय भवनातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या (मनरेगा) राज्य आयुक्तालयाच्या कार्यालयात आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास लागली. या आगीमध्ये ऑफीस पूर्णपणे जळून खाक झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र या आगीमध्ये कार्यालयातील सर्व दस्तावेज जळून खाक झाले आहेत.

प्रशासकीय भवनात आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे ही आग 8 मजली प्रशासकीय इमारतीच्या इतर मजल्यांवर पसरली नाही. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले आहे.

मनरेगाच्या राज्य आयुक्तालयाला भिषण आग

आगीत कार्यालय जळून खाक

या आगीमध्ये मनरेगाचे राज्य आयुक्तालय जळून खाक झाले आहे. या ठिकाणी असलेल्या राज्यभरातील फाईली, दस्तावेज आणि संगणकांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांचे मनरेगा संबंधित सर्व दस्तावेज या कार्यालयात होते, ते आगीत जळाले आहेत. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; 5 जणांवर गुन्हा दाखल

नागपूर - नागपूरच्या प्रशासकीय भवनातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या (मनरेगा) राज्य आयुक्तालयाच्या कार्यालयात आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास लागली. या आगीमध्ये ऑफीस पूर्णपणे जळून खाक झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र या आगीमध्ये कार्यालयातील सर्व दस्तावेज जळून खाक झाले आहेत.

प्रशासकीय भवनात आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे ही आग 8 मजली प्रशासकीय इमारतीच्या इतर मजल्यांवर पसरली नाही. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले आहे.

मनरेगाच्या राज्य आयुक्तालयाला भिषण आग

आगीत कार्यालय जळून खाक

या आगीमध्ये मनरेगाचे राज्य आयुक्तालय जळून खाक झाले आहे. या ठिकाणी असलेल्या राज्यभरातील फाईली, दस्तावेज आणि संगणकांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांचे मनरेगा संबंधित सर्व दस्तावेज या कार्यालयात होते, ते आगीत जळाले आहेत. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; 5 जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.