ETV Bharat / city

'त्या' निर्णयाची अंमलबजावणी झाली तरच महिला पोलिसांना लाभ - माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी

author img

By

Published : Sep 24, 2021, 7:34 PM IST

राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी केल्याने त्यांचा त्रास काही प्रमाणात कमी होईल, असे मत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी व्यक्त केले आहे.

dhanraj vanjari
माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी

मुंबई - राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिली आहे. या आधीही पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे आता महिला पोलिसांच्या कामाच्या तासाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तरच त्याचा महिला पोलिसांना लाभ होईल, अशी प्रतिक्रिया माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा - Guidelines for Schools : शाळा सुरू झाल्यानंतर 'या' नियमांचं करावं लागेल पालन

  • महिला पोलिसांच्या कामाचे तास केले कमी -

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस दलाकडून केले जाते. पोलिसांना मंत्र्यांच्या सुरक्षेपासून गल्लीतील भांडणही मिटवावी लागतात. १२ ते २४ तास बंदोबस्ताचे काम करावे लागते. व्हीआयपी तसेच राज्यात घातपात होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून राज्याची सुरक्षा करावी लागते. याच पोलीस दलात महिला पोलिसही काम करतात. पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना बारा तास काम करावे लागत आहे. महिला पोलिसांना त्याच्या कामासोबत कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडावी लागत आहे. बऱ्याच वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरापासून अनेकवेळा या महिला पोलिसांना १२ तासांपेक्षा जास्त तास आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यावर आणि कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

  • राज्याने जीआर काढावा -

राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. पुरुष पोलिसांपेक्षा महिला पोलिसांना मानसिक आणि शारीरिक त्रास जास्त असतो. महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी केल्याने त्यांचा त्रास काही प्रमाणात कमी होईल. याआधीही आठ तासाची ड्युटी करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तो निर्णय फसला. आता घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तरच महिला पोलिसांच्या कामाचा ताण कमी होईल. पोलीस महासंचालकांनी त्यांच्या अखत्यारीत निर्णय घेतल्यास तो निर्णय त्यानंतर येणारे पोलीस महासंचालक बदलू शकतात. यामुळे राज्याच्या गृह विभागाने याबाबत जीआर काढून कामाचे तास कमी करायला हवेत, असे मत धनराज वंजारी यांनी व्यक्त केले आहे.

  • सुप्रिया सुळे यांनी मानले आभार -

राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणं शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सर्व मंत्रीमंडळाचे त्यांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा - Civil services exam 2020 युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; 761 उमेदवार उत्तीर्ण

मुंबई - राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिली आहे. या आधीही पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे आता महिला पोलिसांच्या कामाच्या तासाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तरच त्याचा महिला पोलिसांना लाभ होईल, अशी प्रतिक्रिया माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा - Guidelines for Schools : शाळा सुरू झाल्यानंतर 'या' नियमांचं करावं लागेल पालन

  • महिला पोलिसांच्या कामाचे तास केले कमी -

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस दलाकडून केले जाते. पोलिसांना मंत्र्यांच्या सुरक्षेपासून गल्लीतील भांडणही मिटवावी लागतात. १२ ते २४ तास बंदोबस्ताचे काम करावे लागते. व्हीआयपी तसेच राज्यात घातपात होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून राज्याची सुरक्षा करावी लागते. याच पोलीस दलात महिला पोलिसही काम करतात. पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना बारा तास काम करावे लागत आहे. महिला पोलिसांना त्याच्या कामासोबत कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडावी लागत आहे. बऱ्याच वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरापासून अनेकवेळा या महिला पोलिसांना १२ तासांपेक्षा जास्त तास आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यावर आणि कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

  • राज्याने जीआर काढावा -

राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. पुरुष पोलिसांपेक्षा महिला पोलिसांना मानसिक आणि शारीरिक त्रास जास्त असतो. महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी केल्याने त्यांचा त्रास काही प्रमाणात कमी होईल. याआधीही आठ तासाची ड्युटी करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तो निर्णय फसला. आता घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तरच महिला पोलिसांच्या कामाचा ताण कमी होईल. पोलीस महासंचालकांनी त्यांच्या अखत्यारीत निर्णय घेतल्यास तो निर्णय त्यानंतर येणारे पोलीस महासंचालक बदलू शकतात. यामुळे राज्याच्या गृह विभागाने याबाबत जीआर काढून कामाचे तास कमी करायला हवेत, असे मत धनराज वंजारी यांनी व्यक्त केले आहे.

  • सुप्रिया सुळे यांनी मानले आभार -

राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणं शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सर्व मंत्रीमंडळाचे त्यांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा - Civil services exam 2020 युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; 761 उमेदवार उत्तीर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.