ETV Bharat / city

Nitesh Rane : हिंदुत्वासाठी सर्व काही माफ; मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्यांनंतर नितेश राणेंची भाषा बदलली - BJP MLA Nitesh Rane

शिंदे -भाजपा गट ( Shinde BJP group alliance ) युती झाल्यानंतर अनेक नेत्यांची भाषा बदलली आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) परिवारावर नेहमी सडकून टीका करणारे राणे कुटुंबीय काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. एवढेच काय आता हिंदुत्वासाठी सारं काही माफ असा नवा पवित्रा नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी घेतला आहे.

नितेश राणे
Nitesh Rane
author img

By

Published : Aug 6, 2022, 5:45 PM IST

मुंबई - राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो. हे वाक्य अलीकडे सातत्याने सिद्ध होऊ लागले आहे. कालपर्यंत एकत्र असलेले मित्रपक्ष म्हणून काम करणारे आज एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. तर, कालपर्यंत एकमेकाला पाण्यात पाहणारे आज एका ताटात जेवत आहेत. अशी परिस्थिती राज्यात दिसू लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) हे सातत्याने शिवसेना, ठाकरे परिवारावर टीका करताना दिसायचे.

हेही वाचा - Ajit Pawar : अधिकार सचिवांना मग मुख्यमंत्री घरी बसणार का?; अजित पवारांनी डिवचले

राणे यांची भाषा बदलली - शिंदे गट-भाजपा ( Shinde BJP group alliance ) एकत्र आल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेकांची भाषा बदलली आहे. तशीच नितेश राणे यांची ही भाषा बदलली. ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करू नयेत असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता नितेश राणे यांची ही भाषा बदलली आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल चकार शब्दन उच्चारता झालेली ही आज त्यांची पहिलीच पत्रकार परिषद असावी. बोलताना नितेश राणे म्हणाले की, आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहोत. हिंदुत्व हाच आमच्यातला मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आता फक्त हिंदुत्वावरच बोला. काँग्रेस मधून स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजपामध्ये आलेल्या राणी कुटुंबीयांचे हिंदुत्व नेमके कोणते हा प्रश्न उपस्थितथांना पडला होता.

हिंदुत्वासाठी सारं माफ - यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की हिंदुत्वासाठी आता सारे काही माफ आहे. या त्यांच्या बोलण्याचा अर्थ हिंदुत्वासाठी यापुढे काय काय माफ केले जाणार आहे आणि आतापर्यंत हिंदुत्वाच्या नावावर पक्षात दाखल झाल्यानंतर काय काय माफ केले यावरून स्पष्ट होते.

हेही वाचा - Bhandara Rape Case : भंडारा सामूहिक अत्याचाराचा तपास फास्ट ट्रॅकवर; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई - राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो. हे वाक्य अलीकडे सातत्याने सिद्ध होऊ लागले आहे. कालपर्यंत एकत्र असलेले मित्रपक्ष म्हणून काम करणारे आज एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. तर, कालपर्यंत एकमेकाला पाण्यात पाहणारे आज एका ताटात जेवत आहेत. अशी परिस्थिती राज्यात दिसू लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) हे सातत्याने शिवसेना, ठाकरे परिवारावर टीका करताना दिसायचे.

हेही वाचा - Ajit Pawar : अधिकार सचिवांना मग मुख्यमंत्री घरी बसणार का?; अजित पवारांनी डिवचले

राणे यांची भाषा बदलली - शिंदे गट-भाजपा ( Shinde BJP group alliance ) एकत्र आल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेकांची भाषा बदलली आहे. तशीच नितेश राणे यांची ही भाषा बदलली. ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करू नयेत असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता नितेश राणे यांची ही भाषा बदलली आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल चकार शब्दन उच्चारता झालेली ही आज त्यांची पहिलीच पत्रकार परिषद असावी. बोलताना नितेश राणे म्हणाले की, आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहोत. हिंदुत्व हाच आमच्यातला मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आता फक्त हिंदुत्वावरच बोला. काँग्रेस मधून स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजपामध्ये आलेल्या राणी कुटुंबीयांचे हिंदुत्व नेमके कोणते हा प्रश्न उपस्थितथांना पडला होता.

हिंदुत्वासाठी सारं माफ - यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की हिंदुत्वासाठी आता सारे काही माफ आहे. या त्यांच्या बोलण्याचा अर्थ हिंदुत्वासाठी यापुढे काय काय माफ केले जाणार आहे आणि आतापर्यंत हिंदुत्वाच्या नावावर पक्षात दाखल झाल्यानंतर काय काय माफ केले यावरून स्पष्ट होते.

हेही वाचा - Bhandara Rape Case : भंडारा सामूहिक अत्याचाराचा तपास फास्ट ट्रॅकवर; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.