ETV Bharat / city

...तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे - केंद्रीय मंत्री रामदास आठवले - Mahavikas Aghadi government

काँग्रेसला जर शिवसेनेने मुख्यमंत्रीपद दिले नाही, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला दिला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले
author img

By

Published : Jun 15, 2021, 12:01 PM IST

मुंबई - सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरू असतांना, दुसरीकडे राजकीय वक्तव्य जोरदार होऊ लागले आहेत. काँग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला एक सल्ला दिला आहे.

'काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा'

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, 'फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. त्यामुळे जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद हवा असेल तर शिवसेना मुख्यमंत्री पद देण्यासाठी तयार होणार का? जर शिवसेनेने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले नाही तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे', असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केले.

'महाविकास आघाडीचा पाठिंबा काँग्रेसने काढला पाहिजे'

नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्यास तयारी असल्याची महत्त्वाकांक्षा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्रिपद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून कुणाला मिळणार संधी?

मुंबई - सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरू असतांना, दुसरीकडे राजकीय वक्तव्य जोरदार होऊ लागले आहेत. काँग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला एक सल्ला दिला आहे.

'काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा'

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, 'फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. त्यामुळे जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद हवा असेल तर शिवसेना मुख्यमंत्री पद देण्यासाठी तयार होणार का? जर शिवसेनेने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले नाही तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे', असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केले.

'महाविकास आघाडीचा पाठिंबा काँग्रेसने काढला पाहिजे'

नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्यास तयारी असल्याची महत्त्वाकांक्षा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्रिपद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; बिहारमधून कुणाला मिळणार संधी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.