ETV Bharat / city

पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करताना शॉक लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

मुंबईच्या कुर्ला पूर्व सुमन नगर येथील ट्रॅफिक चौकीजवळ पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या पाणी विभागातील सात कर्मचारी गेले होते. पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करत असताना त्यात विद्युत प्रवाह वाहून शॉक लागल्याने हे सातही कर्मचारी जखमी झाले.

author img

By

Published : Oct 19, 2020, 8:26 PM IST

bmc
मुंबई पालिका

मुंबई - सुमन नगर येथे पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करताना पालिकेच्या पाणी विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर इतर पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांकडून केली जात होती. त्याची दखल घेत चौकशी करून त्याबाबतचा 'चौकशी अहवाल' येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी जल अभियंता खात्याला दिले आहेत.

हेही वाचा - केंद्राकडून मदत घेणे त्यामध्ये गैर काय? ती तर त्यांची जबाबदारीच - ठाकरे

मुंबईच्या कुर्ला पूर्व सुमन नगर येथील ट्रॅफिक चौकीजवळ पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या पाणी विभागातील सात कर्मचारी गेले होते. पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करत असताना त्यात विद्युत प्रवाह वाहून शॉक लागल्याने हे सातही कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेश दत्तू उगले (वय 45 वर्षे) व अमोल काळे (वय 40 वर्षे) या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर नाना पुकळे (41 वर्षे), महेश जाधव (40 वर्षे), नरेश अडांगळे (40 वर्षे), राकेश जाधव (39 वर्षे), अनिल चव्हाण (43 वर्षे) या पाच जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अक्कलकोट दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी तसेच आर्थिक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पालिका आयुक्तांकडे मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. कामगार संघटनांकडून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार या दुर्घटनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता अथवा उप जल अभियंता (पूर्व उपनगरे) यांनी त्वरित चौकशी करून त्याबाबतचा चौकशी अहवाल येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी जल अभियंता खात्याला दिले आहेत.

मुंबई - सुमन नगर येथे पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करताना पालिकेच्या पाणी विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर इतर पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांकडून केली जात होती. त्याची दखल घेत चौकशी करून त्याबाबतचा 'चौकशी अहवाल' येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी जल अभियंता खात्याला दिले आहेत.

हेही वाचा - केंद्राकडून मदत घेणे त्यामध्ये गैर काय? ती तर त्यांची जबाबदारीच - ठाकरे

मुंबईच्या कुर्ला पूर्व सुमन नगर येथील ट्रॅफिक चौकीजवळ पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या पाणी विभागातील सात कर्मचारी गेले होते. पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करत असताना त्यात विद्युत प्रवाह वाहून शॉक लागल्याने हे सातही कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेश दत्तू उगले (वय 45 वर्षे) व अमोल काळे (वय 40 वर्षे) या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर नाना पुकळे (41 वर्षे), महेश जाधव (40 वर्षे), नरेश अडांगळे (40 वर्षे), राकेश जाधव (39 वर्षे), अनिल चव्हाण (43 वर्षे) या पाच जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अक्कलकोट दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी तसेच आर्थिक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पालिका आयुक्तांकडे मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. कामगार संघटनांकडून करण्यात येणाऱ्या मागणीनुसार या दुर्घटनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता अथवा उप जल अभियंता (पूर्व उपनगरे) यांनी त्वरित चौकशी करून त्याबाबतचा चौकशी अहवाल येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी जल अभियंता खात्याला दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.