ETV Bharat / city

शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करणे थांबवा, अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा शिवसैनिकांचा इशारा

author img

By

Published : Oct 14, 2022, 7:43 PM IST

ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या ( Thane Shaivsainik ) वतीने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन पत्राद्वारे न्यायासाठी निवेदन देण्यात आले ( Thane Police Commissioner Jaijit Singh for justice ) आहे. शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या शाखेबाहेर तलवारी नाचवत शक्तिप्रदर्शन केल्याचा आरोपही उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे यावर पोलिसांनी कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल केलेला नाही आणि म्हणूनच पोलीस देखील दबावात काम करत असल्याचा आरोप उद्धव गटाकडून ( Uddhav Thackeray group ) होत आहे.

Thane Police Commissioner
ढाल तलवारी नाचवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला आहे.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेवर गुन्हे दाखल करण्यात येत असून काही कारण नसताना निष्ठावंत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अडकविण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन पत्राद्वारे न्यायासाठी निवेदन देण्यात ( Thane Police Commissioner Jaijit Singh for justice )आले आहे. शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या शाखेबाहेर तलवारी नाचवत शक्तिप्रदर्शन ( Sword dancing power show ) केल्याचा आरोपही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray group ) गटाकडून करण्यात आला आहे यावर पोलिसांनी कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल केलेला नाही आणि म्हणूनच पोलीस देखील दबावात काम करत असल्याचा आरोप उद्धव गटाकडून होत आहे.

तलवारींसह जल्लोष केल्याचा आरोप - काल मुख्यमंत्र्यांच्या शाखेवर मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला शिंदे गटाने हा जल्लोष करत असताना ढाल तलवारी ही आणल्या होत्या आणि याच ढाल तलवारी नाचवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल उद्धव ठाकरे गटाकडून विचारत उद्धव ठाकरे यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांवर शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा म्हणजे पोलीस बळाचा गैरवापर असल्याचे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे

दोन्ही गटांच्या भांडणाची पार्श्वभूमी - १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री म्हणजे १५ ऑगस्ट च्या प्रारंभी तलावपाली येथील मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार यावर्षीही असंख्य निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचविले असताना फुटीर गटाकडून चितावणी होत असताना सुद्धा आम्ही संयम दाखवल्यामुळे आणि कायदा सुव्यवस्थेची जाण ठेवून संघर्ष टाळला. त्यानंतर मनोरमा नगर येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या वाचनालयाचे नामफलक काढून शिंदे गटाचा नामफलक लावला जबरदस्तीने वाचनालयाची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला तेथेही आम्ही संयम सोडला नाही.तसेच ५ ऑक्टोंबर शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यास पक्षाचा जय जयकार करत घोषणा देत शिस्तीने ठाणे रेल्वे स्थानकात जात असताना ७७ वर्षाचे निवृत्त शासकीय अधिकारी शंकर गणपत शिंदे त्यांच्यासह १३ ते १४ जणांवर गुन्हा दाखल करून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनाच आज दि.१३ ऑक्टोबर रोजी भल्या सकाळी चाप्टर केस भरल्याच्या नोटीसा देण्यात आल्या. चेंदणी कोळीवाडा या भागातील गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारी शिवसेनेची शाखा शिंदे गटाकडून दुरुस्ती च्या नावाखाली बळकविण्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळून घेतली.

प्रक्षोभक भाषण दिल्याचा ठपका - ९ ऑक्टोंबर रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली त्यावेळी गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे शिवसेने नेते भास्कर जाधव साहेब, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, अनिताताई बिर्जे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, धर्मराज पक्षाचे व कामगार नेते राजन राजे, सूत्रसंचालक सचिन चव्हाण या ७ जणांवर प्रक्षोभक भाषण दिल्याचा ठपका देऊन नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले. लोकशाहीने भाषण करण्याचा अधिकार दिला असतानाही गुन्हे दाखल होत असल्याने संतप्त नेत्यांनी पोलीस आयुक्तची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची विनंती केली.

तलवारी फिरवण्यावर कारवाई का नाही ? आमच्यावर लगेच कारवाई करण्यात येते मात्र १३ ऑक्टोबर रोजी किसन नगर शाखेच्या बाहेर निशानीच्या नावावर ढालीतून नंग्या तलवारी फिरवल्या हे कोणत्या कायद्यात बसत आहे ? आणि त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत ? हा पक्षपात आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेत, असे शिष्टमंडळाने ठणकावून सांगितले.

दिवाळी पहाटवर देखील डोळा - मासुंदा तलाव येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गेल्या १० वर्षापासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करीत असताना यावर्षीही महापालिकेने व अग्निशामक दलाने परवानगीही दिलेली आहे. शिंदे गटाकडून आम्ही दिलेल्या अर्जाच्या तारखेच्या मागील तारीख टाकून सत्तेचा दुरुपयोग करून परवानगी घेण्याचे कारस्थान ही मंडळी करीत आहेत. सदर दिवाळी पहाट हा कार्यक्रम आमची परंपरा लक्षात घेता व सदर ठिकाणावर आमचा हक्क लक्षात घेता हा न्याय आम्हाला मिळावा अशी मागणी जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने आज पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये देखील खोडा घालण्याचा प्रयत्न शिंदे गट करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेवर गुन्हे दाखल करण्यात येत असून काही कारण नसताना निष्ठावंत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अडकविण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन पत्राद्वारे न्यायासाठी निवेदन देण्यात ( Thane Police Commissioner Jaijit Singh for justice )आले आहे. शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या शाखेबाहेर तलवारी नाचवत शक्तिप्रदर्शन ( Sword dancing power show ) केल्याचा आरोपही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray group ) गटाकडून करण्यात आला आहे यावर पोलिसांनी कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल केलेला नाही आणि म्हणूनच पोलीस देखील दबावात काम करत असल्याचा आरोप उद्धव गटाकडून होत आहे.

तलवारींसह जल्लोष केल्याचा आरोप - काल मुख्यमंत्र्यांच्या शाखेवर मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला शिंदे गटाने हा जल्लोष करत असताना ढाल तलवारी ही आणल्या होत्या आणि याच ढाल तलवारी नाचवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल उद्धव ठाकरे गटाकडून विचारत उद्धव ठाकरे यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांवर शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा म्हणजे पोलीस बळाचा गैरवापर असल्याचे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे

दोन्ही गटांच्या भांडणाची पार्श्वभूमी - १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री म्हणजे १५ ऑगस्ट च्या प्रारंभी तलावपाली येथील मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार यावर्षीही असंख्य निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचविले असताना फुटीर गटाकडून चितावणी होत असताना सुद्धा आम्ही संयम दाखवल्यामुळे आणि कायदा सुव्यवस्थेची जाण ठेवून संघर्ष टाळला. त्यानंतर मनोरमा नगर येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या वाचनालयाचे नामफलक काढून शिंदे गटाचा नामफलक लावला जबरदस्तीने वाचनालयाची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला तेथेही आम्ही संयम सोडला नाही.तसेच ५ ऑक्टोंबर शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यास पक्षाचा जय जयकार करत घोषणा देत शिस्तीने ठाणे रेल्वे स्थानकात जात असताना ७७ वर्षाचे निवृत्त शासकीय अधिकारी शंकर गणपत शिंदे त्यांच्यासह १३ ते १४ जणांवर गुन्हा दाखल करून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनाच आज दि.१३ ऑक्टोबर रोजी भल्या सकाळी चाप्टर केस भरल्याच्या नोटीसा देण्यात आल्या. चेंदणी कोळीवाडा या भागातील गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारी शिवसेनेची शाखा शिंदे गटाकडून दुरुस्ती च्या नावाखाली बळकविण्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळून घेतली.

प्रक्षोभक भाषण दिल्याचा ठपका - ९ ऑक्टोंबर रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली त्यावेळी गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे शिवसेने नेते भास्कर जाधव साहेब, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, अनिताताई बिर्जे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, धर्मराज पक्षाचे व कामगार नेते राजन राजे, सूत्रसंचालक सचिन चव्हाण या ७ जणांवर प्रक्षोभक भाषण दिल्याचा ठपका देऊन नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले. लोकशाहीने भाषण करण्याचा अधिकार दिला असतानाही गुन्हे दाखल होत असल्याने संतप्त नेत्यांनी पोलीस आयुक्तची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची विनंती केली.

तलवारी फिरवण्यावर कारवाई का नाही ? आमच्यावर लगेच कारवाई करण्यात येते मात्र १३ ऑक्टोबर रोजी किसन नगर शाखेच्या बाहेर निशानीच्या नावावर ढालीतून नंग्या तलवारी फिरवल्या हे कोणत्या कायद्यात बसत आहे ? आणि त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत ? हा पक्षपात आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेत, असे शिष्टमंडळाने ठणकावून सांगितले.

दिवाळी पहाटवर देखील डोळा - मासुंदा तलाव येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गेल्या १० वर्षापासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करीत असताना यावर्षीही महापालिकेने व अग्निशामक दलाने परवानगीही दिलेली आहे. शिंदे गटाकडून आम्ही दिलेल्या अर्जाच्या तारखेच्या मागील तारीख टाकून सत्तेचा दुरुपयोग करून परवानगी घेण्याचे कारस्थान ही मंडळी करीत आहेत. सदर दिवाळी पहाट हा कार्यक्रम आमची परंपरा लक्षात घेता व सदर ठिकाणावर आमचा हक्क लक्षात घेता हा न्याय आम्हाला मिळावा अशी मागणी जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने आज पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये देखील खोडा घालण्याचा प्रयत्न शिंदे गट करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.