ETV Bharat / city

मुंबई नवजात बालक मृत्यू प्रकरण; प्रशासनाचा निषेध करत आरोग्य समितीची सभा तहकूब

author img

By

Published : Dec 23, 2021, 7:39 PM IST

महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाजपने महापालिका मुख्यालयात निदर्शने केली तर, सत्ताधारी शिवसेनेने पालिका प्रशासनाचा निषेध करत आरोग्य समितीची सभा तहकूब केली आहे.

BMC
मुंबई महापालिका

मुंबई - महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाजपने महापालिका मुख्यालयात निदर्शने केली तर, सत्ताधारी शिवसेनेने पालिका प्रशासनाचा निषेध करत आरोग्य समितीची सभा तहकूब केली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा - MH Assembly Winter Session 2021 : शेतकऱ्याला चोर म्हणणाऱ्या सदस्यांनी माफी मागावी - प्रवीण दरेकर

खासगी संस्थाना विरोध -

भांडुप येथील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज पालिकेत उमटले. भाजपच्या नगरसेवकांनी या प्रकरणी सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध करत महापौर कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तर, या घटनेप्रकरणी प्रशासनाचा निषेध करत आरोग्य समितीची बैठक तहकूब करण्यात आली. पालिका रुग्णालयात सुरू असलेला एनआयसीयू पालिका चालवत नाही. तो खासगी संस्थेला चालवण्यास दिला आहे. पालिका रुग्णालयातील आयसीयू, एनआयसीयू खासगी संस्थेला चालवायला देऊ नये, अशी मी मागणी गेली कित्तेक वर्षे करत आहे. खासगी संस्थांना आयसीयू, एनआयसीयू चालवायला दिल्याने त्यांनी काही चुका केल्यास किंवा योग्य उपचार न केल्यास पालिकेचे नाव खराब होते. तसेच, अशा काही घटना घडल्यास त्याला पालिकेला जबाबदार धरले जाते. यामुळे खासगी संस्थांना आयसीयू, एनआयसीयू चालवायला देऊ नये. बालकांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राजुल पटेल यांनी दिली.

घटनेचे पडसाद -

मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामध्ये एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आले होते. रुग्णालयात आणखी तीन बाळ आहेत, त्यांनाही असेच इन्फेक्शन झाल्याचे समजते. भांडुप येथील महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामध्ये चार दिवसांत चार बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात आणि महापालिका मुख्यालयातही उमटले. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सरकारने या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर, भाजप नगरसेवकांनी महापौर कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -

रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षामधील चार बालकांचा ( Septic Shock - Infection ) सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयातील एनआयसीयू ( नवजात शिशू अतिदक्षता विभाग ) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट खासगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. या संस्थेबाबत स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी आणि जागृती पाटील यांनी वारंवार तक्रार करून आरोग्य समितीत आवाज उठवल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने व रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरवर्षी साडेचार हजार कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्यानंतरही मुंबईकरांच्या नशिबी असे दुर्दैवी मृत्यू असतील तर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कोणी विश्वास ठेवण्यास धजावेल का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन खासगी संस्थेकडून काढून घेऊन सदर खासगी संस्थेचा वैद्यकीय परवाना आणि नोंदणी रद्द करावी. तसेच, या नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित रुग्णालय प्रशासन डॉक्टर आणि खासगी संस्थाचालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा - Maharashtra Assembly Winter Session 2021 : स्वत:वर रॉकेल ओतून विधान भवनासमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाजपने महापालिका मुख्यालयात निदर्शने केली तर, सत्ताधारी शिवसेनेने पालिका प्रशासनाचा निषेध करत आरोग्य समितीची सभा तहकूब केली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा - MH Assembly Winter Session 2021 : शेतकऱ्याला चोर म्हणणाऱ्या सदस्यांनी माफी मागावी - प्रवीण दरेकर

खासगी संस्थाना विरोध -

भांडुप येथील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज पालिकेत उमटले. भाजपच्या नगरसेवकांनी या प्रकरणी सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध करत महापौर कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तर, या घटनेप्रकरणी प्रशासनाचा निषेध करत आरोग्य समितीची बैठक तहकूब करण्यात आली. पालिका रुग्णालयात सुरू असलेला एनआयसीयू पालिका चालवत नाही. तो खासगी संस्थेला चालवण्यास दिला आहे. पालिका रुग्णालयातील आयसीयू, एनआयसीयू खासगी संस्थेला चालवायला देऊ नये, अशी मी मागणी गेली कित्तेक वर्षे करत आहे. खासगी संस्थांना आयसीयू, एनआयसीयू चालवायला दिल्याने त्यांनी काही चुका केल्यास किंवा योग्य उपचार न केल्यास पालिकेचे नाव खराब होते. तसेच, अशा काही घटना घडल्यास त्याला पालिकेला जबाबदार धरले जाते. यामुळे खासगी संस्थांना आयसीयू, एनआयसीयू चालवायला देऊ नये. बालकांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राजुल पटेल यांनी दिली.

घटनेचे पडसाद -

मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामध्ये एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आले होते. रुग्णालयात आणखी तीन बाळ आहेत, त्यांनाही असेच इन्फेक्शन झाल्याचे समजते. भांडुप येथील महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामध्ये चार दिवसांत चार बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात आणि महापालिका मुख्यालयातही उमटले. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सरकारने या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर, भाजप नगरसेवकांनी महापौर कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -

रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षामधील चार बालकांचा ( Septic Shock - Infection ) सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयातील एनआयसीयू ( नवजात शिशू अतिदक्षता विभाग ) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट खासगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. या संस्थेबाबत स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी आणि जागृती पाटील यांनी वारंवार तक्रार करून आरोग्य समितीत आवाज उठवल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने व रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरवर्षी साडेचार हजार कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्यानंतरही मुंबईकरांच्या नशिबी असे दुर्दैवी मृत्यू असतील तर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कोणी विश्वास ठेवण्यास धजावेल का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन खासगी संस्थेकडून काढून घेऊन सदर खासगी संस्थेचा वैद्यकीय परवाना आणि नोंदणी रद्द करावी. तसेच, या नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित रुग्णालय प्रशासन डॉक्टर आणि खासगी संस्थाचालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा - Maharashtra Assembly Winter Session 2021 : स्वत:वर रॉकेल ओतून विधान भवनासमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.