ETV Bharat / city

सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करतायेत; पवारांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

author img

By

Published : Sep 14, 2019, 5:20 PM IST

Updated : Sep 14, 2019, 8:52 PM IST

सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करत असून, अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी बंधुभाव कायम राखण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आला.

मुंबई - सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करत आहे. अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी बंधुभाव कायम राखण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मॉब लिंचींग सारखा शब्द यापूर्वी कधीही माहित नव्हता. परंतु, आता रोज या प्रकारच्या घटना समोर येत आहेत. यातून समाजात धार्मिक दहशत निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी, भारतातील सर्वसामान्य माणूस आणि पाकिस्तानातील सर्वसामान्यांना भारत-पाकिस्तानमधील वैराबद्दल काही देणेघेणे नसल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वतः तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आलो असून, ते लोक भारतीयांबद्दल बद्दल प्रचंड आपुलकीने वागत असल्याचा माझा अनुभव आहे, असे शरद पवार म्हणाले. अशीच भावना भारतीयांचीही आहे. परंतु, सत्ताधारी मात्र दोन्ही देशांमध्ये वैर निर्माण करून स्वत:चा राजकीय फायदा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासाठी देशातील जनतेने सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. समाजातील काही विशिष्ट घटकांवर हल्ले केले जात असून, संबंधित आरोपींवर कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचाकार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पवार स्वत:च मैदानात, मंगळवारपासून करणार राज्यव्यापी दौरा

या मेळाव्यात शरद पवार यांनी कलम ३७० तसेच मॉब लिचिंग मुद्द्यांसह अनेक मुद्द्यांवर वक्तव्य केले. काश्मीरमधील 370 कलम काढले. परंतु, नागालँड आणि इतर सात राज्यातील हे कलम का काढण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेण्याला विरोध नाही. परंतु, लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे मत त्यांनी मांडले.

काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती अशा दुहेरी संकटात राज्यातील जनता आहे. अशा परिस्थितीत जनतेला आधार देण्याची जबाबदारी सरकारची होती. परंतु, मुख्यमंत्री एका तासासाठी सांगलीला आले; आणि यानंतर त्यांनी पुन्हा पाऊल ठेवले नसल्याचे पवारांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वत: लातूरमधील भूकंपावेळी राज्याचे प्रमुख म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीची माहिती दिली.

हेही वाचा गिरीश महाजनांचे जेवढं वय, तेवढा शरद पवारांचा राजकारणात अनुभव - रवींद्र पाटील

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी सांप्रदायिक विचार कसे पसरवले जातील, यावर काम करत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच समाजामध्ये अशांती पसरवण्यासाठी काही प्रकाशन संस्था काम करत असून, सध्या एका वेगळया प्रकारच्या विचारधारेचा प्रसार केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

मुंबई - सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करत आहे. अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी बंधुभाव कायम राखण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मॉब लिंचींग सारखा शब्द यापूर्वी कधीही माहित नव्हता. परंतु, आता रोज या प्रकारच्या घटना समोर येत आहेत. यातून समाजात धार्मिक दहशत निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी, भारतातील सर्वसामान्य माणूस आणि पाकिस्तानातील सर्वसामान्यांना भारत-पाकिस्तानमधील वैराबद्दल काही देणेघेणे नसल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वतः तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आलो असून, ते लोक भारतीयांबद्दल बद्दल प्रचंड आपुलकीने वागत असल्याचा माझा अनुभव आहे, असे शरद पवार म्हणाले. अशीच भावना भारतीयांचीही आहे. परंतु, सत्ताधारी मात्र दोन्ही देशांमध्ये वैर निर्माण करून स्वत:चा राजकीय फायदा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासाठी देशातील जनतेने सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. समाजातील काही विशिष्ट घटकांवर हल्ले केले जात असून, संबंधित आरोपींवर कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचाकार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पवार स्वत:च मैदानात, मंगळवारपासून करणार राज्यव्यापी दौरा

या मेळाव्यात शरद पवार यांनी कलम ३७० तसेच मॉब लिचिंग मुद्द्यांसह अनेक मुद्द्यांवर वक्तव्य केले. काश्मीरमधील 370 कलम काढले. परंतु, नागालँड आणि इतर सात राज्यातील हे कलम का काढण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेण्याला विरोध नाही. परंतु, लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे मत त्यांनी मांडले.

काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती अशा दुहेरी संकटात राज्यातील जनता आहे. अशा परिस्थितीत जनतेला आधार देण्याची जबाबदारी सरकारची होती. परंतु, मुख्यमंत्री एका तासासाठी सांगलीला आले; आणि यानंतर त्यांनी पुन्हा पाऊल ठेवले नसल्याचे पवारांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वत: लातूरमधील भूकंपावेळी राज्याचे प्रमुख म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीची माहिती दिली.

हेही वाचा गिरीश महाजनांचे जेवढं वय, तेवढा शरद पवारांचा राजकारणात अनुभव - रवींद्र पाटील

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी सांप्रदायिक विचार कसे पसरवले जातील, यावर काम करत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच समाजामध्ये अशांती पसरवण्यासाठी काही प्रकाशन संस्था काम करत असून, सध्या एका वेगळया प्रकारच्या विचारधारेचा प्रसार केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Intro:देशात सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करत आहेत - शरद पवार

mh-mum-01-ncp-sharadpavar-7201153

( यासाठीचे सर्व फीड मोजोवर पाठवले आहे)

मुंबई ता. १४ :
सत्तेत असलेले लोक देशात धर्माच्या नावाने कायम दहशत निर्माण करत आहेत मोब लिंचींग सारखा शब्द यापूर्वी कधी माहित नव्हता परंतु आता रोज अशा घटना समोर येत असून यातून एक धार्मिक दहशत निर्माण केली जात आहे. अशा लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशात भाईचारा कायम राहणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा आज महामेळावा राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.भारतातील सर्वसामान्य माणूस आणि पाकिस्तानातील सर्वसामान्य माणूस यांना भारत-पाकिस्तानमधील वैराबद्दल काही देणेघेणे नाही. मी स्वतः तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आलो आहे, ते तीन लोक भारतीय बद्दल प्रचंड आपुलकीने वागत असतात हा माझा अनुभव आहे. तशी स्थिती भारतातील सर्वसामान्य जनतेचे आहे. परंतु सत्ताधारी मात्र भारत पाकिस्तानच्या नावाखाली दोन्ही देशांमध्ये वैर निर्माण करून आपला राजकीय फायदा घेत असून त्यासाठी देशातील जनतेने आता सावध व्हावे असे आवाहनही पवार यांनी केले.

समाजातील काही विशिष्ट समाज घटकांवर हल्ले केले जात आहेत परंतु त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. पवार यांनी काश्मीर ३७० मुद्दा असेल किंवा पाकिस्तानचा मुद्दा असेल किंवा मॉब लिचिंगचा मुद्दा असेल या महत्वाच्या मुद्दयासह अनेक मुद्द्यांना हात घातला. काश्मीरमधील 370 कलम काढले परंतु नागालँड आणि इतर सात राज्यातील हे कलम का काढण्यात आले नाही, असा सवाल पवार यांनी उपस्थित करून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.आज देशामध्ये वेगळी स्थिती आहे. आज देशात काय चाललं आहे. प्रत्येक जागी नाराजी असल्याचे ऐकायला मिळत आहे.राज्यात ७० टक्के लोक शेती करतात. राज्यात काही ठिकाणी सुका दुष्काळ आहे तर काही ठिकाणी पुर परिस्थिती आहे. लोकं दुहेरी संकटात आहेत. संकटामध्ये आधार देण्याची जबाबदारी सरकारची होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका तासासाठी सांगलीला आले होते त्यानंतर पुन्हा पाऊल ठेवले नाही. महाराष्ट्रात लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा राज्याचा प्रमुख म्हणून जी जबाबदारी पार पाडली याची इत्यंभूत माहिती शरद पवार यांनी दिली. सांगली, सातारा, कोल्हापुर जिल्हयामध्ये राज्याचे प्रमुख गेले ना देशाचेप्रमुख मात्र
सांप्रदायिक विचार कसे पसरवले जातील यावर काम केले जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.समाजामध्ये अशांती कशी पसरली जाईल यासाठी काही पब्लिकेशन काम करत आहेत. एका वेगळया प्रकारच्या विचारधारेचा प्रसार केला जात आहे.आम्ही भारतामध्ये रहातो हे सांगण्याची आवश्यकता का आहे. परंतु आज बंधुभाव, समतेवर हल्ला होत आहे.देशामध्ये प्रत्येक ठिकाणी राजांचे अधिकार होते परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एकसंघ केले. काश्मीरची परिस्थिती त्यावेळी वेगळी होती. तिथे राजा हिंदू होता तर ९० टक्के जनता मुस्लिम होती. त्यामुळे तिथल्या लोकांच्या काही अटी होत्या. परंतु काश्मीर भारतामध्ये आला. काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आले. आजच्या सरकारने विशेष अधिकार बाजुला केले आहेत. याला विरोध नाही परंतु लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते.मात्र सरकारने काही मीडियाच्या माध्यमातून या निर्णयाचा प्रचार व प्रसार केला आहे. तिथल्या लोकांचं म्हणणं काय आहे याच्यावर चर्चा झाली नाही ही गोष्ट पटण्यासारखी नाही असेही शरद पवार म्हणाले.


Body:देशात सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करत आहेत - शरद पवार
Conclusion:
Last Updated : Sep 14, 2019, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.