ETV Bharat / city

सिद्धी-साई इमारत दुर्घटनेला दोन वर्ष पूर्ण; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच

दुर्घटनास्थळाला भेट दिल्यावर, भाजपचे नगरसेवक पराग शाह यांच्या मन बिल्डर्समार्फत वर्षभरात इमारत उभी करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिल्याने घरे परत मिळण्याची आशा येथील रहिवाशांना होती. मात्र, दोन वर्षाचा कालावधी लोटल्यावरही अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

author img

By

Published : Jul 25, 2019, 10:58 PM IST

इमारतीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

मुंबई - घाटकोपर पश्चिममधील दामोदर पार्कजवळ असलेल्या सिद्धी-साई इमारत दुर्घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने १७ जणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी घटनास्थळाला भेट दिल्यावर मुख्यामंत्र्यांनी इमारत एका वर्षात उभारली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षात या इमारतीची एकही वीट रचली न गेल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. तसेच इमारतीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील नर्सिंग होमचे नूतनीकरण करताना इमारतीमधील खांबांच्या मूळ रचनेला धक्का लागल्याचे पंचनाम्यात समोर आले होते.

इमारतीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

दुर्घटनास्थळाला भेट दिल्यावर, भाजपचे नगरसेवक पराग शाह यांच्या मन बिल्डर्स मार्फत वर्षाभरात इमारत उभी करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिल्याने घरे परत मिळण्याची आशा येथील रहिवाशांना होती. मात्र, दोन वर्षाचा कालावधी लोटल्यावरही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

दुर्घटनाग्रस्त सिद्धी-साई इमारतीच्या बाजूलाच राजेश जैन नामक विकासकाचे काम चालू आहे. या विकासकाने सिद्धी-साई इमारतीच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये घुसखोरी केल्याने मूळ ४९० चौरस मीटर असलेले इमारतीचे क्षेत्रफळ आता ३५९ चौरस मीटर इतकेच राहिले आहे. रहिवाशांनी घटनेचा पाठपुरावा केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याचे विरेंद्र सिंह यांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना भांडुपमधील जंगल मंगल रस्त्यावरील भट्टीपाडाच्या एसआरए इमारतीमध्ये तात्पुरते निवासस्थान देण्यात आले. मात्र, येत्या सप्टेंबर महिन्यात हा कालावधी संपणार आहे. यामुळे इमारतीची पुनर्बांधणी होईपर्यंत घाटकोपर भागातच पर्यायी घरे द्यावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सुनील सितप अद्यापही तुरुंगातच -
सिद्धी-साई इमारतीच्या तळमजल्यावर सुनील सीताप या शिवसैनिकाचे प्रसूतिगृह होते. त्याचे बांधकाम सुरु असताना सिताप यांनी इमारतीचे खांब काढून त्या ठिकाणी लोखंडी चॅनल लावले. हे लोखंडी चॅनल इमारतीचा भार पेलू न शकल्याने इमारत कोसळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सुनील सिताप यांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी सीताप तुरुंगात आहे.

मुंबई - घाटकोपर पश्चिममधील दामोदर पार्कजवळ असलेल्या सिद्धी-साई इमारत दुर्घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने १७ जणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी घटनास्थळाला भेट दिल्यावर मुख्यामंत्र्यांनी इमारत एका वर्षात उभारली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षात या इमारतीची एकही वीट रचली न गेल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. तसेच इमारतीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील नर्सिंग होमचे नूतनीकरण करताना इमारतीमधील खांबांच्या मूळ रचनेला धक्का लागल्याचे पंचनाम्यात समोर आले होते.

इमारतीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

दुर्घटनास्थळाला भेट दिल्यावर, भाजपचे नगरसेवक पराग शाह यांच्या मन बिल्डर्स मार्फत वर्षाभरात इमारत उभी करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिल्याने घरे परत मिळण्याची आशा येथील रहिवाशांना होती. मात्र, दोन वर्षाचा कालावधी लोटल्यावरही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

दुर्घटनाग्रस्त सिद्धी-साई इमारतीच्या बाजूलाच राजेश जैन नामक विकासकाचे काम चालू आहे. या विकासकाने सिद्धी-साई इमारतीच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये घुसखोरी केल्याने मूळ ४९० चौरस मीटर असलेले इमारतीचे क्षेत्रफळ आता ३५९ चौरस मीटर इतकेच राहिले आहे. रहिवाशांनी घटनेचा पाठपुरावा केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याचे विरेंद्र सिंह यांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना भांडुपमधील जंगल मंगल रस्त्यावरील भट्टीपाडाच्या एसआरए इमारतीमध्ये तात्पुरते निवासस्थान देण्यात आले. मात्र, येत्या सप्टेंबर महिन्यात हा कालावधी संपणार आहे. यामुळे इमारतीची पुनर्बांधणी होईपर्यंत घाटकोपर भागातच पर्यायी घरे द्यावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सुनील सितप अद्यापही तुरुंगातच -
सिद्धी-साई इमारतीच्या तळमजल्यावर सुनील सीताप या शिवसैनिकाचे प्रसूतिगृह होते. त्याचे बांधकाम सुरु असताना सिताप यांनी इमारतीचे खांब काढून त्या ठिकाणी लोखंडी चॅनल लावले. हे लोखंडी चॅनल इमारतीचा भार पेलू न शकल्याने इमारत कोसळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सुनील सिताप यांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी सीताप तुरुंगात आहे.

Intro:मुंबई (विशेष बातमी)
घाटकोपर पश्चिम दामोदर पार्क येथील सिद्धी साई इमारत दोन वर्षांपूर्वी कोसळली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला आज दोन वर्ष वर्ष पूर्ण झाले. दोन वर्षांपूर्वी दुर्घटना घडली त्यावेळी घटनास्थळाला भेट दिल्यावर मुख्यामंत्र्यांनी इमारत एका वर्षात उभारली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र गेल्या दोन वर्षात या इमारतीची एक विटही रचली गेली नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. गेल्या दोन वर्षात इमारत उभी राहिली नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. Body:घाटकोपर पश्चिम दामोदर पार्क येथे सिद्धी साई इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या नर्सिंग होमचे नूतनीकरण करताना इमारतीचे पिलर तोडण्यात आले. यामुळे २५ जुलै २०१७ ला इमारत पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली. इमारतीमध्ये राहणारे रहिवाशी ढिगाऱ्याखाली गाढले गेले. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला. यावेळी दुर्घटना स्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी भाजपाचे नगरसेवक असलेल्या पराग शाह यांच्या मन बिल्डर्स मार्फत एका वर्षात इमारत उभी करून देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनीच आश्वासन दिल्याने रहिवाशांना आपली घरे पुन्हा मिळतील अशी अपेक्षा येथील रहिवाशांना होती. मात्र दोन वर्ष झाले तरी अद्याप या इमारतीची एक वीटही रचण्यात आलेली नाही.

दुर्घटनाग्रस्त सिद्धी साई इमारतीच्या बाजूलाच राजेश जैन या विकासकाचे काम सुरु आहे. या विकासकाने सिद्धी साई इमारतीच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये घुसखोरी केली आहे. सिद्धी साई इमारतीचे क्षेत्रफळ ४९० चौरस मीटर इतके आहे. मात्र घुसखोरीमुळे आता या इमारतीचे क्षेत्रफळ ३५९ चौरस मीटर इतकेच राहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने आम्ही पाठपुरावा केला असता हा प्रकार उघड झाल्याचे विरेंद्र सिंह यांनी सांगितले. येथील रहिवाशांना भांडुप जंगल मंगल रोड भट्टीपाडा येथील एसआरए इमारतीमध्ये तात्पुरते निवासस्थाने देण्यात आली मात्र येत्या सप्टेंबरमध्ये याचा कालावधी संपत आहे. यामुळे इमारत पुन्हा बांधून तयार होई पर्यंत घाटकोपरमध्येच पर्यायी घरे द्यावीत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सुनील सितप अद्यापही तुरुंगातच -
सिद्धी साई इमारतीच्या तळमजल्यावर शिवसैंनिक असलेल्या सुनील सीताप यांचे प्रसूतिगृह होते. त्याचे बांधकाम सुरु असताना सितप यांनी इमारतीचे पिलर काढून त्याठिकाणी लोखंडी चॅनल लावण्यात आले होते. इमारतीचा भार हे लोखंडी चॅनल पेलू न शकल्याने इमारत कोसळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सुनील सितप यांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

सोबत vis आणि बाईट्स Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.