ETV Bharat / city

demand to change exam system परीक्षा पद्धती सुधारत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करा, शिक्षणतज्ज्ञांसह पालकांची मागणी

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री (education minister) दीपक केसरकर (dipak kesarkar) यांनी पद स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत निर्णय जाहिर केला होता. आता याबाबत, परीक्षा पद्धती सुधारत (change exam system) विद्यार्थ्यांवरील ताण कमी (reduce stress over students) करा. अशी देखील मागणी जोर धरताना दिसत आहे. शिक्षणतज्ज्ञांसह (educationists) पालकांनी हि मागणी उचलून धरली आहे.

author img

By

Published : Sep 10, 2022, 10:55 PM IST

demand to change exam system
परीक्षा पद्धती सुधारत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करा, शिक्षणतज्ज्ञांसह पालकांची मागणी

मुंबई राज्याचे शालेय शिक्षण मंत्री (education minister) दीपक केसरकर (dipak kesarkar) यांनी पद स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत निर्णय जाहिर केला होता. आता याबाबत, परीक्षा पद्धती सुधारत (change exam system) विद्यार्थ्यांवरील ताण कमी (reduce stress over students) करा. अशी देखील मागणी जोर धरताना दिसत आहे. शिक्षणतज्ज्ञांसह (educationists) पालकांनी हि मागणी उचलून धरली आहे. याबाबत, पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांनी निरनिराळी मते व्यक्त केलेली आहे. जाणून घेवूया सविस्तर,

किमतींचा भार आमच्या माथी नको पालकांची मागणी राज्यात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सुमारे २ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ लाख ४ हजार एकूण शाळा आहेत. ६६ हजार सरकारी शाळा आणि ३७ हजार खाजगी शाळा राज्यात आहेत. सुमारे ६ लाख शिक्षक राज्यात कार्यरत आहेत. त्यामुळे ह्या निर्णयाचे दूरगामी परिणाम ह्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या पालकांवर होणार आहे. पालकांना दप्तराचे ओझे कमी व्हावे असे मनापासून वाटते. याबाबत पालक तेजस्विनी गोणी यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले कि, ''दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार चांगला आहे. त्याचे स्वागत आहे. मात्र मूळ रोगावर इलाज करायला हवा. सरकारने परीक्षा पद्धती बदलावी, अभ्यासक्रम बदलावा जेणेकरुन पालकांच्या आणि पाल्यांच्या मनावरील ताण दूर होईल. तसेच पुस्तकाचे तीन भाग होणार म्हणजे पुस्तक आणि वह्या आणखी महाग होणार. शासनाचा इलाज तर दूर उलट महागड्या किमतींची पुस्तके वह्या आम्हाला घ्याव्या लागतील. आमच्या माथी कशाला उगीच हा खर्च टाकता? ''

परीक्षा पद्धती सुधारत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करा, शिक्षणतज्ज्ञांसह पालकांची मागणी

दप्तराच्या ओझ्याचा त्रास मोठा ईटीव्हीने विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले. गार्गी गोणी हि मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते तिने सांगितले,'' माझ्या दप्तराचे ओझे ७ किलो आहे. माझी पाठ दुखते. जर दप्तराचे ओझे कमी झाले तर खूप बरे होईल. तर आझाद या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले कि, ''माझ्या पाठीला दप्तरामुळे त्रास होतो. जर शाळेतच काही वह्या पुस्तके ठेवली तर आणि खूप होमवर्क नाही दिला तर आम्हाला छान वाटतं.''

सीबीएसई समकक्ष अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती राबवा - शिक्षकांचे मत शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष जालिंदर सरोदे यांना विचारले असता त्यांनी याचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. " हि बाब प्रत्यक्षात राबविता येणार नाही. जसे कि, ऍक्टिव्हिटी पुस्तक, किंवा शाळेतच अभ्यास करावयाचे पुस्तक हे शाळेतच ठेवून घ्यावे. जेणेकरून तो भार हलका होईल. घरी गृहपाठ प्रचंड दिला जातो. शिवाय, सत्रानुसार आपण पुस्तकाची विभागणी केल्यास, पुस्तके महाग होतील. मात्र, पुस्तक हरवल्यास वही देखील जाणार त्याचे काय करणार?" असा प्रतिप्रश्न सरोदे यांनी सरकारला केला. राज्यातील सर्व पहिली ते दहावीच्या शाळा अभ्यासक्रम हा सीबीएसई दर्जाच्या समकक्ष केला तर कायमचा प्रश्न सुटेल असही सरोदे म्हणाले.

शालेय साहित्य महागणार तर दुकानदार जिग्नेश वर्मा यांनी देखील ईटीवी भारत सोबत संवाद साधला त्यांनी म्हटलं आहे की, "खात्रीपूर्वक एक पुस्तकाचे तुम्ही तीन भाग करणार. तर त्याचा उत्पादन खर्च वाढणार. त्याच्या रंगाचा खर्च वाढणार. त्याचा पेपरचा खर्च वाढणार त्यामुळे पुस्तकाची किंमत वाढू शकते.

मुलांवर शारीरिक व मानसिक ताण अस्थिरोग तज्ञ डॉ मिहीर रणनवरे आपले निरीक्षण नोंदवतात. ''सतत पाठीवर दप्तराचे ओझे असल्याने मुलांच्या मणक्यावर भार येतो. खूप ताण आल्याने त्यांच्या शरीराची वाढ खुंटते. त्यामुळे त्यांची उंची कमी राहते. शाळेत चालत जाणाऱ्या सामान्य घरातील बालके त्यांना खूप त्रास होतो. मुलांचे स्नायू आणि हाड एवढे मजबूत नसतात कि ५ किलो पेक्षा अधिक वजन पेलू शकतील. त्यामुळे अभ्यासक्रम मुळातून बदलावा लागेल.

मुंबई राज्याचे शालेय शिक्षण मंत्री (education minister) दीपक केसरकर (dipak kesarkar) यांनी पद स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत निर्णय जाहिर केला होता. आता याबाबत, परीक्षा पद्धती सुधारत (change exam system) विद्यार्थ्यांवरील ताण कमी (reduce stress over students) करा. अशी देखील मागणी जोर धरताना दिसत आहे. शिक्षणतज्ज्ञांसह (educationists) पालकांनी हि मागणी उचलून धरली आहे. याबाबत, पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांनी निरनिराळी मते व्यक्त केलेली आहे. जाणून घेवूया सविस्तर,

किमतींचा भार आमच्या माथी नको पालकांची मागणी राज्यात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सुमारे २ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ लाख ४ हजार एकूण शाळा आहेत. ६६ हजार सरकारी शाळा आणि ३७ हजार खाजगी शाळा राज्यात आहेत. सुमारे ६ लाख शिक्षक राज्यात कार्यरत आहेत. त्यामुळे ह्या निर्णयाचे दूरगामी परिणाम ह्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या पालकांवर होणार आहे. पालकांना दप्तराचे ओझे कमी व्हावे असे मनापासून वाटते. याबाबत पालक तेजस्विनी गोणी यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले कि, ''दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार चांगला आहे. त्याचे स्वागत आहे. मात्र मूळ रोगावर इलाज करायला हवा. सरकारने परीक्षा पद्धती बदलावी, अभ्यासक्रम बदलावा जेणेकरुन पालकांच्या आणि पाल्यांच्या मनावरील ताण दूर होईल. तसेच पुस्तकाचे तीन भाग होणार म्हणजे पुस्तक आणि वह्या आणखी महाग होणार. शासनाचा इलाज तर दूर उलट महागड्या किमतींची पुस्तके वह्या आम्हाला घ्याव्या लागतील. आमच्या माथी कशाला उगीच हा खर्च टाकता? ''

परीक्षा पद्धती सुधारत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करा, शिक्षणतज्ज्ञांसह पालकांची मागणी

दप्तराच्या ओझ्याचा त्रास मोठा ईटीव्हीने विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले. गार्गी गोणी हि मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकते तिने सांगितले,'' माझ्या दप्तराचे ओझे ७ किलो आहे. माझी पाठ दुखते. जर दप्तराचे ओझे कमी झाले तर खूप बरे होईल. तर आझाद या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले कि, ''माझ्या पाठीला दप्तरामुळे त्रास होतो. जर शाळेतच काही वह्या पुस्तके ठेवली तर आणि खूप होमवर्क नाही दिला तर आम्हाला छान वाटतं.''

सीबीएसई समकक्ष अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती राबवा - शिक्षकांचे मत शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष जालिंदर सरोदे यांना विचारले असता त्यांनी याचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. " हि बाब प्रत्यक्षात राबविता येणार नाही. जसे कि, ऍक्टिव्हिटी पुस्तक, किंवा शाळेतच अभ्यास करावयाचे पुस्तक हे शाळेतच ठेवून घ्यावे. जेणेकरून तो भार हलका होईल. घरी गृहपाठ प्रचंड दिला जातो. शिवाय, सत्रानुसार आपण पुस्तकाची विभागणी केल्यास, पुस्तके महाग होतील. मात्र, पुस्तक हरवल्यास वही देखील जाणार त्याचे काय करणार?" असा प्रतिप्रश्न सरोदे यांनी सरकारला केला. राज्यातील सर्व पहिली ते दहावीच्या शाळा अभ्यासक्रम हा सीबीएसई दर्जाच्या समकक्ष केला तर कायमचा प्रश्न सुटेल असही सरोदे म्हणाले.

शालेय साहित्य महागणार तर दुकानदार जिग्नेश वर्मा यांनी देखील ईटीवी भारत सोबत संवाद साधला त्यांनी म्हटलं आहे की, "खात्रीपूर्वक एक पुस्तकाचे तुम्ही तीन भाग करणार. तर त्याचा उत्पादन खर्च वाढणार. त्याच्या रंगाचा खर्च वाढणार. त्याचा पेपरचा खर्च वाढणार त्यामुळे पुस्तकाची किंमत वाढू शकते.

मुलांवर शारीरिक व मानसिक ताण अस्थिरोग तज्ञ डॉ मिहीर रणनवरे आपले निरीक्षण नोंदवतात. ''सतत पाठीवर दप्तराचे ओझे असल्याने मुलांच्या मणक्यावर भार येतो. खूप ताण आल्याने त्यांच्या शरीराची वाढ खुंटते. त्यामुळे त्यांची उंची कमी राहते. शाळेत चालत जाणाऱ्या सामान्य घरातील बालके त्यांना खूप त्रास होतो. मुलांचे स्नायू आणि हाड एवढे मजबूत नसतात कि ५ किलो पेक्षा अधिक वजन पेलू शकतील. त्यामुळे अभ्यासक्रम मुळातून बदलावा लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.