ETV Bharat / city

Raj Thackeray Letter: राज ठाकरेंच्या 'त्या' पत्राने मुरजी पटेल यांचे टेंशन वाढले?

author img

By

Published : Oct 16, 2022, 4:57 PM IST

Raj Thackeray letter:अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना Deputy Chief Minister Devendra Fadnavisn पत्र लिहिले आहे. त्यावर फडणवीस यांनी या पत्राचा विचार केला जाईल असे सांगितल्याने या निवडणुकीसंदर्भात नवीन राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray letter
Raj Thackeray letter

मुंबई: अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना Deputy Chief Minister Devendra Fadnavisn पत्र लिहिले आहे. त्यावर फडणवीस यांनी या पत्राचा विचार केला जाईल असे सांगितल्याने या निवडणुकीसंदर्भात नवीन राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे. ]

पत्र राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं पटेल यांचं ? अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे पहावं, असे आवाहन राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केले आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनीही प्रत्युत्तर दिले असून राज ठाकरेंनी केलेल्या मागणीचा विचार करू. मात्र, याबाबत पक्षात चर्चा करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या निवडणुकीत त्यांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. परंतु त्यांनी पत्र लिहून आम्ही आमचा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.

परंतु या संदर्भात मला माझ्या वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करावी लागेल. परंतु यापूर्वी आर. आर. पाटील असतील किंवा विधान परिषदेच्या यंदाच्या दोन निवडणुका असतील, त्या आम्ही बिनविरोध करण्यास परवानगी दिली. परंतु त्यासाठी समोरच्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली होती. तशी विनंती आम्हाला केली होती. परंतु या निवडणुकीत कोणीही आम्हाला भेटले नाही व तशी आपल्याला विनंती केली नाही, म्हणून हा प्रश्न मार्गी लागला नाही. परंतु राज ठाकरे यांच्या पत्राने भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे टेन्शन वाढलं आहे, यात काही शंका नाही.

सामना बाळासाहेब ठाकरेंचा राहिलेला नाही ? राज ठाकरे यांनी जरी चांगल्या भावनेने पत्र लिहिले असले, तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा लागेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भाजप या प्रकरणांमध्ये राजकारण करत आहे, असे ठाकरे गटाच्या सामनामधून आरोप करण्यात आलेला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामनाला सध्या कोणीच विचारत नाही व तुम्ही पत्रकारांनी सुद्धा असे प्रश्न मला विचारू नयेत. सामना हा आता बाळासाहेब ठाकरे यांचा राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेले पत्र एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात. तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे, आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल. आपला मित्र, राज ठाकरे

राज ठाकरे यांचे ऋतुजा लटके यांना अप्रत्यक्ष समर्थन ? ऋतुजा लटके यांना आमदार होता यावे, यासाठी फडणवीसांना पत्र पाठवल्याने, त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंधेरी पूर्व भागात एक लाख पेक्षा जास्त मराठी मतदार असून या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप शिंदे युती, तसेच महाविकास आघाडीकडून होत असताना अप्रतक्षपणे राज ठाकरे यांनी पत्र लिहून ऋतुजा लटके यांना समर्थन दिले आहे.

महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिंदे गटाचे सर्व बडे नेते मैदानात प्रचारासाठी उतरणार आहेत. स्वत: आशिष शेलार पुढे १५ दिवस अंधेरीत तळ ठोकणार आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे प्रचारात कोणतीच कसर सोडताना दिसत नाहीये. अशा स्थितीत फडणवीस राज ठाकरेंची विनंती मान्य करतील, अशी शक्यता कमी वर्तवली जात आहे. तरी देखील राज ठाकरेंनी अशी भूमिका का घेतली ? पूर्वीपासून अशीच भूमिका होती, तर पूर्वीच तसे जाहीर का केले नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. पण या सर्व कारणांमुळे भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे टेंशन वाढले आहे.

मुंबई: अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना Deputy Chief Minister Devendra Fadnavisn पत्र लिहिले आहे. त्यावर फडणवीस यांनी या पत्राचा विचार केला जाईल असे सांगितल्याने या निवडणुकीसंदर्भात नवीन राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे. ]

पत्र राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं पटेल यांचं ? अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे पहावं, असे आवाहन राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केले आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनीही प्रत्युत्तर दिले असून राज ठाकरेंनी केलेल्या मागणीचा विचार करू. मात्र, याबाबत पक्षात चर्चा करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या निवडणुकीत त्यांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. परंतु त्यांनी पत्र लिहून आम्ही आमचा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.

परंतु या संदर्भात मला माझ्या वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करावी लागेल. परंतु यापूर्वी आर. आर. पाटील असतील किंवा विधान परिषदेच्या यंदाच्या दोन निवडणुका असतील, त्या आम्ही बिनविरोध करण्यास परवानगी दिली. परंतु त्यासाठी समोरच्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली होती. तशी विनंती आम्हाला केली होती. परंतु या निवडणुकीत कोणीही आम्हाला भेटले नाही व तशी आपल्याला विनंती केली नाही, म्हणून हा प्रश्न मार्गी लागला नाही. परंतु राज ठाकरे यांच्या पत्राने भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे टेन्शन वाढलं आहे, यात काही शंका नाही.

सामना बाळासाहेब ठाकरेंचा राहिलेला नाही ? राज ठाकरे यांनी जरी चांगल्या भावनेने पत्र लिहिले असले, तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा लागेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भाजप या प्रकरणांमध्ये राजकारण करत आहे, असे ठाकरे गटाच्या सामनामधून आरोप करण्यात आलेला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामनाला सध्या कोणीच विचारत नाही व तुम्ही पत्रकारांनी सुद्धा असे प्रश्न मला विचारू नयेत. सामना हा आता बाळासाहेब ठाकरे यांचा राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेले पत्र एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात. तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे, आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल. आपला मित्र, राज ठाकरे

राज ठाकरे यांचे ऋतुजा लटके यांना अप्रत्यक्ष समर्थन ? ऋतुजा लटके यांना आमदार होता यावे, यासाठी फडणवीसांना पत्र पाठवल्याने, त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंधेरी पूर्व भागात एक लाख पेक्षा जास्त मराठी मतदार असून या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप शिंदे युती, तसेच महाविकास आघाडीकडून होत असताना अप्रतक्षपणे राज ठाकरे यांनी पत्र लिहून ऋतुजा लटके यांना समर्थन दिले आहे.

महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिंदे गटाचे सर्व बडे नेते मैदानात प्रचारासाठी उतरणार आहेत. स्वत: आशिष शेलार पुढे १५ दिवस अंधेरीत तळ ठोकणार आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे प्रचारात कोणतीच कसर सोडताना दिसत नाहीये. अशा स्थितीत फडणवीस राज ठाकरेंची विनंती मान्य करतील, अशी शक्यता कमी वर्तवली जात आहे. तरी देखील राज ठाकरेंनी अशी भूमिका का घेतली ? पूर्वीपासून अशीच भूमिका होती, तर पूर्वीच तसे जाहीर का केले नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. पण या सर्व कारणांमुळे भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे टेंशन वाढले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.