ETV Bharat / city

देशातील कोरोना संपला का? बिहार विधानसभा निवडणुकीवरून संजय राऊत यांचा सवाल

author img

By

Published : Sep 25, 2020, 3:59 PM IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, कोरोनामुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती आहे. सध्या लोकांना निवडणुका नकोत, तर काम हवंय. निवडणुका घेण्यासारखी स्थिती बिहारमध्ये आहे का?, याचा विचार व्हायला हवा.

sanjay rauts
शिवसेना नेते खासदार संजय राऊत

मुंबई - देशातील कोरोना संपला का? देशात अनेक अडचणी आहेत.. पूरस्थिती अजून सावरलेली नाही. बिहारमध्ये या स्थितीत निवडणूक घेणे योग्य आहे का? बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे 24 वर्ष राज्य आहे. तिथल्या जनतेत त्यांच्याविषयी नाराजी आहे. बिहारमध्ये काही लोकांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपासह तिथल्या अन्य पक्षांना स्थानिक समस्या लपवून ठेवायच्या आहेत, त्यामुळे सुशांतचा मुद्दा ते खेचून काढत आहेत. सीबीआय सध्या कुठे दिसत नाही. मारुती कांबळेचे काय झाले.. असे आता म्हणावे लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना लगावला.

व्यसनं कोणत्या क्षेत्रात नाहीत ? काहींना पैशाचे व्यसन असते, असे सांगून संजय राऊत म्हणाले की, एनसीबीचे काम आंतरराष्ट्रीय सीमेवरून येणारे ड्रग्ज रोखण्याचे आहे. पण हे एकेका व्यक्तीला बोलवलं जातंय, असे त्यांनी सांगितले. देशात फिल्म उद्योग वाढत असेल तर, स्वागत आहे. इथला ऐषोराम सोडून कुणी जाणार नाहीत. इथून कुणी जाणार नाही. उलट काश्मीरमध्ये फिल्मसिटी उभारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईचे वलय अजिबात कमी होणार नाही. मुंबादेवीचे महत्त्व कमी होणार नाही. कितीही कार्यालये हलवली तरीही, मुंबई झळाळत राहील. कंगना प्रकरणात माझी काहीच बाजू नाही. आम्ही फक्त भूमिका जाहीर केली, असे त्यांनी सांगितले. सरकारने कोरोना नावाचे प्रकरण संपवून टाकलंय. एक मंत्री, ३ खासदारांचे निधन झाल्यानं संसद अधिवेशन गुंडाळलं, अशी टीका करून त्यांनी, बिहारमधील कोरोना संपला का ? असा सवाल त्यांनी केला. परिस्थिती योग्य आहे का, हा प्रश्न आहे. बिहारमध्ये जातीपातीवर निवडणूक होते, कृषी किंवा कामगार विधेयकावर होणार नाही. सुशांत सिंह राजपूत हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असावा, यासाठीच मुंबईत इतकं राजकारण केलं. कामाचे, विकासाचे मुद्दे नसल्यानं मुंबईतले मुद्दे प्रचारात आणले जात आहेत. तिथला पोलीस प्रमुख बक्सरमधून लढत आहेत. जे नाट्य लिहले गेलंय त्यानुसार पुढं जातंय. मारुती कांबळेचे काय झालं.. त्याप्रमाणे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे काय झालं, असं विचारावं लागेल असेही राऊत यांनी सांगितले.

शिवसेना लढण्याबाबत विचार करेल, असेही ते म्हणाले.

मुंबई - देशातील कोरोना संपला का? देशात अनेक अडचणी आहेत.. पूरस्थिती अजून सावरलेली नाही. बिहारमध्ये या स्थितीत निवडणूक घेणे योग्य आहे का? बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे 24 वर्ष राज्य आहे. तिथल्या जनतेत त्यांच्याविषयी नाराजी आहे. बिहारमध्ये काही लोकांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपासह तिथल्या अन्य पक्षांना स्थानिक समस्या लपवून ठेवायच्या आहेत, त्यामुळे सुशांतचा मुद्दा ते खेचून काढत आहेत. सीबीआय सध्या कुठे दिसत नाही. मारुती कांबळेचे काय झाले.. असे आता म्हणावे लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना लगावला.

व्यसनं कोणत्या क्षेत्रात नाहीत ? काहींना पैशाचे व्यसन असते, असे सांगून संजय राऊत म्हणाले की, एनसीबीचे काम आंतरराष्ट्रीय सीमेवरून येणारे ड्रग्ज रोखण्याचे आहे. पण हे एकेका व्यक्तीला बोलवलं जातंय, असे त्यांनी सांगितले. देशात फिल्म उद्योग वाढत असेल तर, स्वागत आहे. इथला ऐषोराम सोडून कुणी जाणार नाहीत. इथून कुणी जाणार नाही. उलट काश्मीरमध्ये फिल्मसिटी उभारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईचे वलय अजिबात कमी होणार नाही. मुंबादेवीचे महत्त्व कमी होणार नाही. कितीही कार्यालये हलवली तरीही, मुंबई झळाळत राहील. कंगना प्रकरणात माझी काहीच बाजू नाही. आम्ही फक्त भूमिका जाहीर केली, असे त्यांनी सांगितले. सरकारने कोरोना नावाचे प्रकरण संपवून टाकलंय. एक मंत्री, ३ खासदारांचे निधन झाल्यानं संसद अधिवेशन गुंडाळलं, अशी टीका करून त्यांनी, बिहारमधील कोरोना संपला का ? असा सवाल त्यांनी केला. परिस्थिती योग्य आहे का, हा प्रश्न आहे. बिहारमध्ये जातीपातीवर निवडणूक होते, कृषी किंवा कामगार विधेयकावर होणार नाही. सुशांत सिंह राजपूत हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असावा, यासाठीच मुंबईत इतकं राजकारण केलं. कामाचे, विकासाचे मुद्दे नसल्यानं मुंबईतले मुद्दे प्रचारात आणले जात आहेत. तिथला पोलीस प्रमुख बक्सरमधून लढत आहेत. जे नाट्य लिहले गेलंय त्यानुसार पुढं जातंय. मारुती कांबळेचे काय झालं.. त्याप्रमाणे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे काय झालं, असं विचारावं लागेल असेही राऊत यांनी सांगितले.

शिवसेना लढण्याबाबत विचार करेल, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.