ETV Bharat / city

MAHARASHTRA CORONA UPDATE नवीन ५०३१ रुग्ण; २१६ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 25, 2021, 9:33 PM IST

Updated : Aug 25, 2021, 9:46 PM IST

राज्यात ४,३८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४७,४१४ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजारांच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) रोजी ५०३१ नव्या रुग्णांची तर २१६ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातून आज ४३८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ५०,१८३ सक्रिय रुग्ण -
राज्यात ४,३८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४७,४१४ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे

राज्यात ५०,१८३ सक्रिय रुग्ण

आजपर्यंत एकूण १,३६,५७१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २८ लाख ४० हजार ८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ३७ हजार ६८० (१२.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २६४ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५०,१८३ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर वाढला, २.१२ टक्क्यांची नोंद-
राज्यात मृत्युदर वाढला असून तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. १९ जुलैला- ६६, २४ जुलै- २२४, २६ जुलै- ५३, २७ जुलै- २५४, २८ जुलै- २८६, ३० जुलै- २३१, ३१ जुलै- २२५, १ ऑगस्ट- १५७, २ ऑगस्ट- ९०, ३ ऑगस्ट- १७७, ४ ऑगस्ट- १९५ अशी मृत्यूची नोंद आहे. ५ ऑगस्ट- १२०, ६ ऑगस्ट- १८७, ७ ऑगस्ट- १२८, ८ ऑगस्ट- १५१, ९ ऑगस्ट- ६८, १० ऑगस्ट- १३७, ११ ऑगस्ट- १६३, १२ ऑगस्ट- २०८, १३ ऑगस्ट- १५८, १४ ऑगस्ट- १३४ मृत्यूची नोंद झाली आहे. १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्ट- १००, १७ ऑगस्ट- ११६, १८ ऑगस्ट- १५८, १९ ऑगस्ट- १५४, २० ऑगस्ट- १०५, २१ ऑगस्ट- १४५, २३ ऑगस्ट- १०५, २४ ऑगस्ट- ११९ तर २५ ऑगस्टला २१६ मृत्यूंची नोंद झाली आहे.


या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ३४२
रायगड - १०७
पनवेल पालिका - ५५
अहमदनगर - ६७३
पुणे - ७८४
पुणे पालिका - ४१७
पिपरी चिंचवड पालिका - १४४
सोलापूर - ५५०
सातारा - ६०५
कोल्हापूर - १२२
सांगली - ३८२
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ७४
सिंधुदुर्ग - ६४
रत्नागिरी - ७१
उस्मानाबाद - ६६
बीड - ८२

सेंटीनल सर्वेक्षण, जिनोमिक सिक्वेन्सिंग

राज्यातील 5 प्रयोगशाळा आणि 5 रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवड्याला 15 प्रयोगशालेय नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या पुणे स्थित संस्थांना पाठवते. जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजेच, जिनोमिक सिक्वेन्सिंगला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून, या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून 100 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते, अशी माहिती आरोग्य विभागाने मंगळवारी दिली आहे.

हेही वाचा- राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळले, म्हणाले 'आता चांगल्या शब्दात टीका करणार'

हेही वाचा- नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा, तर जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली

हेही वाचा- संजय राऊतांना दिलासा; छळ केल्याची महिलेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजारांच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) रोजी ५०३१ नव्या रुग्णांची तर २१६ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातून आज ४३८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ५०,१८३ सक्रिय रुग्ण -
राज्यात ४,३८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४७,४१४ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे

राज्यात ५०,१८३ सक्रिय रुग्ण

आजपर्यंत एकूण १,३६,५७१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २८ लाख ४० हजार ८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ३७ हजार ६८० (१२.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २६४ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५०,१८३ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर वाढला, २.१२ टक्क्यांची नोंद-
राज्यात मृत्युदर वाढला असून तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. १९ जुलैला- ६६, २४ जुलै- २२४, २६ जुलै- ५३, २७ जुलै- २५४, २८ जुलै- २८६, ३० जुलै- २३१, ३१ जुलै- २२५, १ ऑगस्ट- १५७, २ ऑगस्ट- ९०, ३ ऑगस्ट- १७७, ४ ऑगस्ट- १९५ अशी मृत्यूची नोंद आहे. ५ ऑगस्ट- १२०, ६ ऑगस्ट- १८७, ७ ऑगस्ट- १२८, ८ ऑगस्ट- १५१, ९ ऑगस्ट- ६८, १० ऑगस्ट- १३७, ११ ऑगस्ट- १६३, १२ ऑगस्ट- २०८, १३ ऑगस्ट- १५८, १४ ऑगस्ट- १३४ मृत्यूची नोंद झाली आहे. १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्ट- १००, १७ ऑगस्ट- ११६, १८ ऑगस्ट- १५८, १९ ऑगस्ट- १५४, २० ऑगस्ट- १०५, २१ ऑगस्ट- १४५, २३ ऑगस्ट- १०५, २४ ऑगस्ट- ११९ तर २५ ऑगस्टला २१६ मृत्यूंची नोंद झाली आहे.


या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ३४२
रायगड - १०७
पनवेल पालिका - ५५
अहमदनगर - ६७३
पुणे - ७८४
पुणे पालिका - ४१७
पिपरी चिंचवड पालिका - १४४
सोलापूर - ५५०
सातारा - ६०५
कोल्हापूर - १२२
सांगली - ३८२
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ७४
सिंधुदुर्ग - ६४
रत्नागिरी - ७१
उस्मानाबाद - ६६
बीड - ८२

सेंटीनल सर्वेक्षण, जिनोमिक सिक्वेन्सिंग

राज्यातील 5 प्रयोगशाळा आणि 5 रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवड्याला 15 प्रयोगशालेय नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या पुणे स्थित संस्थांना पाठवते. जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजेच, जिनोमिक सिक्वेन्सिंगला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून, या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून 100 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते, अशी माहिती आरोग्य विभागाने मंगळवारी दिली आहे.

हेही वाचा- राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळले, म्हणाले 'आता चांगल्या शब्दात टीका करणार'

हेही वाचा- नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा, तर जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली

हेही वाचा- संजय राऊतांना दिलासा; छळ केल्याची महिलेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

Last Updated : Aug 25, 2021, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.