ETV Bharat / city

राज्यात ३ हजार ७५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ४० रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात ३,०७५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,५५,३४१ वर पोहचला आहे. राज्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

author img

By

Published : Dec 7, 2020, 8:31 PM IST

corona
कोरोना

मुंबई - आज राज्यात ३,०७५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,५५,३४१ वर पोहचला आहे. राज्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७,७३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण ७५,७६७ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

७५,७६७ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज ७,३४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १७,३०,७१५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,१८,७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५५,३४१ नमुने म्हणजेच १६.३९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,५५,१८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५,५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हि रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - अदानी, अंबानींचे नुकसान भरून काढण्यासाठीच नव्या कृषी कायद्याची निर्मिती - राजू शेट्टी

मुंबई - आज राज्यात ३,०७५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,५५,३४१ वर पोहचला आहे. राज्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७,७३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण ७५,७६७ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

७५,७६७ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज ७,३४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १७,३०,७१५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,१८,७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५५,३४१ नमुने म्हणजेच १६.३९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,५५,१८० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५,५६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हि रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - अदानी, अंबानींचे नुकसान भरून काढण्यासाठीच नव्या कृषी कायद्याची निर्मिती - राजू शेट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.