ETV Bharat / city

राज ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी आपल्या घराकडे लक्ष द्यावे - नवाब मलिक

author img

By

Published : Aug 22, 2019, 6:31 PM IST

ज्यांचे कुटुंब एकसंघ असते अशा कुटुंबांमध्ये कुटुंब प्रमुखाला अडचण आली, तर संपूर्ण कुटुंब त्यांना आधार देण्यासाठी त्याच्या पाठीमागे असते. त्यामुळे, राज ठाकरे यांचे कुटुंबीय किंवा कुटुंबातील लोक ईडीच्या कार्यालयापर्यंत गेले असतील तर त्यावर टीका करणे हे चुकीचे असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

Nawab malik strikes back at anjali damaniya

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे. यावेळी, त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यही कार्यालयापर्यंत गेले म्हणून, "त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र, त्या टीकाकारांनी आपल्या घरात काय चाललंय याकडे लक्ष द्यावे" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना टोला लगावला आहे.

ठाकरेंवर टीका करणाऱ्या लोकांनी आपल्या घराकडे लक्ष द्यावे, नवाब मलिक यांचा अंजली दमानियांना टोला

नवाब मलिक म्हणाले की, ज्यांचे कुटुंब एकसंघ असते अशा कुटुंबांमध्ये कुटुंब प्रमुखाला अडचण आली, तर संपूर्ण कुटुंब त्यांना आधार देण्यासाठी त्याच्या पाठीमागे असते. त्यामुळे, राज ठाकरे यांचे कुटुंबीय किंवा कुटुंबातील लोक ईडीच्या कार्यालयापर्यंत गेले असतील तर त्यावर टीका करणे हे चुकीचे असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

अंजली दमानिया यांनी, राज ठाकरे चौकशीला जात आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी टीका केली होती. त्यामुळे, दमानिया यांनी इतरांची कुटुंबे बघण्यापेक्षा, स्वतःच्या कुटुंबातील लोक काय करतात, त्यांच्यावर पण याप्रकारे काही संकट येणार आहे का? असे म्हणत नवाब मलिक यांनी दमानियांवर टीका केली.

तसेच, या सरकारच्या इशाऱ्यावर त्यांनी या प्रकारचे वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे काय, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचा टोलादेखील नवाब मलिक यांनी लगावला.

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे. यावेळी, त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यही कार्यालयापर्यंत गेले म्हणून, "त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र, त्या टीकाकारांनी आपल्या घरात काय चाललंय याकडे लक्ष द्यावे" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना टोला लगावला आहे.

ठाकरेंवर टीका करणाऱ्या लोकांनी आपल्या घराकडे लक्ष द्यावे, नवाब मलिक यांचा अंजली दमानियांना टोला

नवाब मलिक म्हणाले की, ज्यांचे कुटुंब एकसंघ असते अशा कुटुंबांमध्ये कुटुंब प्रमुखाला अडचण आली, तर संपूर्ण कुटुंब त्यांना आधार देण्यासाठी त्याच्या पाठीमागे असते. त्यामुळे, राज ठाकरे यांचे कुटुंबीय किंवा कुटुंबातील लोक ईडीच्या कार्यालयापर्यंत गेले असतील तर त्यावर टीका करणे हे चुकीचे असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

अंजली दमानिया यांनी, राज ठाकरे चौकशीला जात आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी टीका केली होती. त्यामुळे, दमानिया यांनी इतरांची कुटुंबे बघण्यापेक्षा, स्वतःच्या कुटुंबातील लोक काय करतात, त्यांच्यावर पण याप्रकारे काही संकट येणार आहे का? असे म्हणत नवाब मलिक यांनी दमानियांवर टीका केली.

तसेच, या सरकारच्या इशाऱ्यावर त्यांनी या प्रकारचे वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे काय, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचा टोलादेखील नवाब मलिक यांनी लगावला.

Intro:
ठाकरेंवर टीका करणाऱ्या लोकांनी आपल्या घरात काय चाललंय याकडे लक्ष द्यावे; नवाब मलिक यांचा अंजली दमानिया यांनी टोला

mh-mum-01-ncp-navabmalik-byte-7201153



मुंबई, ता. २२ :

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज डीडीने त्यांच्या कार्यालयात बोलावले त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियातील लोक कार्यालयापर्यंत गेले म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांनी आपल्या घरात काय चाललंय याकडे लक्ष द्यावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना टोला लगावला.
नवाब मलिक म्हणाले की, ज्यांचे कुटुंब एकसंघ असते अशा कुटुंबांमध्ये एखाद्या कुटुंब प्रमुखाला अडचण आली तर संपूर्ण कुटुंब त्यांना आधार देण्यासाठी पाठीमागे असते. मात्र राज ठाकरे यांचे कुटुंबीय किंवा कुटुंबातील लोक इडीच्या कार्यालयापर्यंत गेले असतील तर त्यावर टीका करणे हे चुकीचे असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
मलिक यांनी दमानिया यांच्यावर टीका केली. त्यामुळे दमानिया यांनी इतरांची कुटुंब बघण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबातील लोक काय करतात, त्यांच्यावर पण याप्रकारे काय संकट येणार आहे काय किंवा या सरकारच्या इशाऱ्यावर त्यांनी या प्रकारचे वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे काय, असे प्रश्न आम्हाला पडले असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आमचे एकच म्हणणे आहे की त्यामुळे कुठून सोबत गेला असला तरी ते काहीही च्या कार्यालयात जात नाही कुटुंब आधार देतो त्यामुळे त्यांचे कुटुंब एकसंघ राहते कुटुंबप्रमुख वर प्रेम असते असते तर ते एकत्र असतात त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी लोक पुढे जात असतात जे लोक त्यावर टीका करतात त्यांच्या कुटुंबात काय चाललेला आहे त्याच्याकडे लक्ष द्यावे असा टोला मलिक यांनी लगावला.Body:ठाकरेंवर टीका करणाऱ्या लोकांनी आपल्या घरात काय चाललंय याकडे लक्ष द्यावे; नवाब मलिक यांचा अंजली दमानिया यांनी टोला
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.