ETV Bharat / city

Nawab Malik On ED : गरज पडल्यास स्वत: ईडी कार्यालयात जाईल, किरीट सोमैयांनी ईडीचे प्रवक्ते बनू नये -नवाब मलिक

author img

By

Published : Dec 11, 2021, 5:24 PM IST

Updated : Dec 11, 2021, 7:29 PM IST

वक्फ बोर्डात ( Waqf board Maharashtra Nawab Malik ) भ्रष्टाचार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केला आहे. त्यावर गरज पडल्यास आपण स्वतः ईडी ( enforcement directorate Maharashtra Waqf board) कार्यालयात जाऊ. मात्र, किरीट सोमैया ( nawab malik criticize kirit somaiya ) यांनी ईडीचे प्रवक्ते बनू नये, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

nawab malik criticize kirit somaiya
किरीट सोमैया टीका नवाब मलिक

मुंबई - वक्फ बोर्डात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केला आहे. त्यावर गरज पडल्यास आपण स्वतः ईडी कार्यालयात जाऊ. मात्र, किरीट सोमैया ( nawab malik criticize kirit somaiya ) यांनी ईडीचे प्रवक्ते बनू नये. ईडीने जर त्यांना प्रवक्ते बनवले असेल तर, तसे त्यांनी जाहीर करावे, असा टोला नवाब मलिक यांनी किरीट सोमैया यांना लगावला.

हेही वाचा - शरद पवारांच्या जुन्या भाषणांचे 'नेमकचि बोलणें' पुस्तकाचे प्रकाशन, पवारांनी सांगितले अनेक किस्से

आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, असे ट्विट नवाब मलिक यांनी केले होते. आपण घाबरत नाही. अन्यायाच्या विरोधात आपण अजून जोरदार लढा देऊ, असे आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितले होते. तसेच, वक्फ बोर्डात भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांचा घोटाळा आपण लवकरच समोर आणू, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

वक्फ बोर्डावर ईडीकडून धाड पडली असून, बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या बातम्या काही लोक जाणीवपूर्वक पेरत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही वक्फ बोर्डावर धाड पडलेली नाही. केवळ एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, अशी माहितीही नवाब मलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

किरीट सोमैयांचा मालिकांवर हा आरोप

नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीत घोटाळा केला आहे. हा घोटाळा बाहेर येऊ नये यासाठी नवाब मलिक प्रयत्न करत आहेत. आपल्यावर कारवाई होणार या भीतीपोटीच अशा प्रकारचे ट्विट त्यांच्याकडून करण्यात आले असून, पुण्यातील वक्फ बोर्डाची जमीन नवाब मलिक यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर केली होती, असा आरोप किरीट सोमैया यांच्याकडून करण्यात आला होता.

हेही वाचा - Mumbai mayors threat matter: मुंबई महापौरांना पत्राद्वारे धमकी दिल्याप्रकरणी भायखळा पोलिसांचा तपास सुरू

मुंबई - वक्फ बोर्डात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केला आहे. त्यावर गरज पडल्यास आपण स्वतः ईडी कार्यालयात जाऊ. मात्र, किरीट सोमैया ( nawab malik criticize kirit somaiya ) यांनी ईडीचे प्रवक्ते बनू नये. ईडीने जर त्यांना प्रवक्ते बनवले असेल तर, तसे त्यांनी जाहीर करावे, असा टोला नवाब मलिक यांनी किरीट सोमैया यांना लगावला.

हेही वाचा - शरद पवारांच्या जुन्या भाषणांचे 'नेमकचि बोलणें' पुस्तकाचे प्रकाशन, पवारांनी सांगितले अनेक किस्से

आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, असे ट्विट नवाब मलिक यांनी केले होते. आपण घाबरत नाही. अन्यायाच्या विरोधात आपण अजून जोरदार लढा देऊ, असे आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितले होते. तसेच, वक्फ बोर्डात भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांचा घोटाळा आपण लवकरच समोर आणू, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

वक्फ बोर्डावर ईडीकडून धाड पडली असून, बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या बातम्या काही लोक जाणीवपूर्वक पेरत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही वक्फ बोर्डावर धाड पडलेली नाही. केवळ एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, अशी माहितीही नवाब मलिक यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

किरीट सोमैयांचा मालिकांवर हा आरोप

नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीत घोटाळा केला आहे. हा घोटाळा बाहेर येऊ नये यासाठी नवाब मलिक प्रयत्न करत आहेत. आपल्यावर कारवाई होणार या भीतीपोटीच अशा प्रकारचे ट्विट त्यांच्याकडून करण्यात आले असून, पुण्यातील वक्फ बोर्डाची जमीन नवाब मलिक यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर केली होती, असा आरोप किरीट सोमैया यांच्याकडून करण्यात आला होता.

हेही वाचा - Mumbai mayors threat matter: मुंबई महापौरांना पत्राद्वारे धमकी दिल्याप्रकरणी भायखळा पोलिसांचा तपास सुरू

Last Updated : Dec 11, 2021, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.