ETV Bharat / city

काँग्रेस नेते राहुल गांधींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता - संजय राऊत

author img

By

Published : Aug 25, 2020, 3:32 PM IST

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजस्थान, छत्तीसगड येथे काँग्रेसची सत्ता आली. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर त्यांना नैराश्य आलं असेल आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

sanjay raut
शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई - कॉंग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष मिळावा यासाठी गेले दोन दिवस काँग्रेसमध्ये घमासान सुरू होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजस्थान, छत्तीसगड येथे काँग्रेसची सत्ता आली. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर त्यांना नैराश्य आलं असेल आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा राहुल गांधींचा निर्णय मला पटला नव्हता, असेही संजय राऊत म्हणाले.


काँग्रेस हा देशातील मुख्य विरोधीपक्ष आहे. काँग्रेसमध्ये विस्कळीतपणा आला आहे, त्यातून पक्षाने सावरावे. देशभरातील प्रत्येक गावात, अगदी उत्तर आणि पश्चिमेपासून ईशान्य भारतापर्यंत, प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. पण विरोधीपक्ष म्हणून त्यांनी उभारी घेण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.


गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड आहे. गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली जाते. ती तितकीशी संयुक्तिक नसल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.
राज्यातील महामंडळाच्या सदस्य निवडीबाबत चर्चा होऊ शकली नाही, कारण सर्व यंत्रणा ही कोविड विरोधात लढा देण्यात व्यस्त होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व अजित पवार ते बाळासाहेब थोरात सर्वच व्यस्त होते.

नाराजी काँग्रेसमध्ये नाही, तर आमदारात..


नाराजी काँग्रेसमध्ये नाही, तर काही आमदारांमध्ये आहे. मुळात त्याला नाराजी म्हणता येणार नाही. कोरोनामुळे त्यांच्या क्षेत्रातील विकासकामं असतील किंवा इतर काम यांना गती मिळाली नाही. आमदारांच्या मागण्यांबाबत मंत्रीमंडळातील समन्वय समितीचे नेते एकत्र बसून मार्ग काढतील असे राऊत यांनी म्हटले.

मुंबई - कॉंग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष मिळावा यासाठी गेले दोन दिवस काँग्रेसमध्ये घमासान सुरू होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजस्थान, छत्तीसगड येथे काँग्रेसची सत्ता आली. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर त्यांना नैराश्य आलं असेल आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा राहुल गांधींचा निर्णय मला पटला नव्हता, असेही संजय राऊत म्हणाले.


काँग्रेस हा देशातील मुख्य विरोधीपक्ष आहे. काँग्रेसमध्ये विस्कळीतपणा आला आहे, त्यातून पक्षाने सावरावे. देशभरातील प्रत्येक गावात, अगदी उत्तर आणि पश्चिमेपासून ईशान्य भारतापर्यंत, प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. पण विरोधीपक्ष म्हणून त्यांनी उभारी घेण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.


गांधी परिवार हेच काँग्रेसचे आधार कार्ड आहे. गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली जाते. ती तितकीशी संयुक्तिक नसल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.
राज्यातील महामंडळाच्या सदस्य निवडीबाबत चर्चा होऊ शकली नाही, कारण सर्व यंत्रणा ही कोविड विरोधात लढा देण्यात व्यस्त होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व अजित पवार ते बाळासाहेब थोरात सर्वच व्यस्त होते.

नाराजी काँग्रेसमध्ये नाही, तर आमदारात..


नाराजी काँग्रेसमध्ये नाही, तर काही आमदारांमध्ये आहे. मुळात त्याला नाराजी म्हणता येणार नाही. कोरोनामुळे त्यांच्या क्षेत्रातील विकासकामं असतील किंवा इतर काम यांना गती मिळाली नाही. आमदारांच्या मागण्यांबाबत मंत्रीमंडळातील समन्वय समितीचे नेते एकत्र बसून मार्ग काढतील असे राऊत यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.