ETV Bharat / city

भाजपाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडेंनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अवताडे यांना सदस्यत्वाची शपथ दिली.

author img

By

Published : May 12, 2021, 5:39 PM IST

समाधान आवताडेंनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
समाधान आवताडेंनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अवताडे यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी विधानसभेचे सदस्य आशिष शेलार, कॅप्टन. आ. तमिल सेल्वन, संजय केळकर, अनिल पाटील, बाळा भेगडे, राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांची उपस्थिती होती.

विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर - मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या विधानसभा जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे निवडून आले. त्यांनी दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भागीरथ भालकेंचा पराभव केला. आज अवताडे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली, नरहरी झिरवळ यांनी त्यांना शपथ दिली. दरम्यान शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आवताडे म्हणाले की, हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र तरी देखील या जिल्ह्यात भाजपाचा दबदबा असून, 13 पैकी 7 आमदार हे भाजपाचे आहेत.

समाधान आवताडेंनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

लसीकरणावरून शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील कोविड परिस्थितीवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लसीकरण मोहिमेला वेग येण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची मागणी भाजपाने केली आहे. महापालिका आयुक्त चहल यांना याबाबत निवेदन देखील देण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टेंडर काढण्याची सूचना केली. परंतु, आरोग्य मंत्र्यांनी टेंडर काढता येत नसल्याचे म्हटले आहे. यावरून हेच दिसून येते की, महाविकास आघाडीमधील मंत्र्यांमध्ये मेळ राहिलेला नाही. या राजकारणामुळे मुंबईकरांना लसीची वाट पाहावी लागत असल्याची टीका यावेळी शेलार यांनी केली.

हेही वाचा - राज्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार? मंत्रिमंडळ बैठकीत आज होणार निर्णय

मुंबई - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अवताडे यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी विधानसभेचे सदस्य आशिष शेलार, कॅप्टन. आ. तमिल सेल्वन, संजय केळकर, अनिल पाटील, बाळा भेगडे, राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांची उपस्थिती होती.

विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर - मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या विधानसभा जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे निवडून आले. त्यांनी दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भागीरथ भालकेंचा पराभव केला. आज अवताडे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली, नरहरी झिरवळ यांनी त्यांना शपथ दिली. दरम्यान शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आवताडे म्हणाले की, हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र तरी देखील या जिल्ह्यात भाजपाचा दबदबा असून, 13 पैकी 7 आमदार हे भाजपाचे आहेत.

समाधान आवताडेंनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

लसीकरणावरून शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील कोविड परिस्थितीवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लसीकरण मोहिमेला वेग येण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची मागणी भाजपाने केली आहे. महापालिका आयुक्त चहल यांना याबाबत निवेदन देखील देण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टेंडर काढण्याची सूचना केली. परंतु, आरोग्य मंत्र्यांनी टेंडर काढता येत नसल्याचे म्हटले आहे. यावरून हेच दिसून येते की, महाविकास आघाडीमधील मंत्र्यांमध्ये मेळ राहिलेला नाही. या राजकारणामुळे मुंबईकरांना लसीची वाट पाहावी लागत असल्याची टीका यावेळी शेलार यांनी केली.

हेही वाचा - राज्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार? मंत्रिमंडळ बैठकीत आज होणार निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.