ETV Bharat / city

'आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज'

author img

By

Published : Sep 23, 2020, 3:26 PM IST

Updated : Sep 23, 2020, 3:37 PM IST

मुंबईमध्ये मंत्रालयात असलेल्या आपत्ती नियंत्रण कक्षातून राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्यात.परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

minister vijay vadettivar on state heavy rainfall and ndrf help
आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज

मुंबई - राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. काल (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काल पासून मुंबई, ठाणे, पालघर यासह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरात राहावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

'आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज'
मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्यात. आवश्यक त्या ठिकाणी या तुकड्या पोहोचून मदत कार्य करतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.मुंबईमध्ये मंत्रालयात असलेल्या आपत्ती नियंत्रण कक्षातून राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे.आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेवटी स्पष्ट केले.

मुंबई - राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. काल (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काल पासून मुंबई, ठाणे, पालघर यासह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरात राहावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

'आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज'
मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तयार करण्यात आल्यात. आवश्यक त्या ठिकाणी या तुकड्या पोहोचून मदत कार्य करतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.मुंबईमध्ये मंत्रालयात असलेल्या आपत्ती नियंत्रण कक्षातून राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे.आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेवटी स्पष्ट केले.
Last Updated : Sep 23, 2020, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.