ETV Bharat / city

तिवरे धरण फुटीच्या चौकशीचा अहवाल पंधरा दिवसात सादर करा; मंत्री उदय सामंतांचा आदेश

author img

By

Published : Jan 2, 2020, 6:13 PM IST

Updated : Jan 2, 2020, 6:20 PM IST

तिवरे धरणाच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याची मर्यादा असणार आहे.

report on tiwre dam
तिवरे धरणाच्या चौकशीचे अहवाल पंधरा दिवसात सादर करा; मंत्री उदय सामंतांचा आदेश

मुंबई - तिवरे धरण फुटीच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याची मर्यादा असणार आहे.

तिवरे धरणाच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले

प्रकल्पग्रस्तांना 453 चौरस फूट घर बांधून देण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. एका महिन्यात अहवाल आणि प्रकल्पबाधित पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना, धरण फुटीचे मुख्य कारण खेकडे आहे की माणूस, हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असे सामंत म्हणाले. अहवालात केलेल्या शिफारशीनुसार दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या धरण फुटीत 21 जणांचा बळी गेला होता. संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने दिलेल्या मदतीचा पाठपुरावा घेण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मुंबई - तिवरे धरण फुटीच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याची मर्यादा असणार आहे.

तिवरे धरणाच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले

प्रकल्पग्रस्तांना 453 चौरस फूट घर बांधून देण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. एका महिन्यात अहवाल आणि प्रकल्पबाधित पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना, धरण फुटीचे मुख्य कारण खेकडे आहे की माणूस, हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असे सामंत म्हणाले. अहवालात केलेल्या शिफारशीनुसार दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या धरण फुटीत 21 जणांचा बळी गेला होता. संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने दिलेल्या मदतीचा पाठपुरावा घेण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Intro:
मुंबई - तिवरे धरणाच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसात पूर्ण करून, अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिलेत.
Body:प्रकल्पग्रस्तांना 453 चौरस फूट घर बांधून देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. एक महिन्यात अहवाल आणि प्रकल्प बाधित पुर्नवसनाची प्रक्रिया पूर्ण होईल असे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
धरण फुटीच मुख्य कारण खेकडे आहे की माणूस आहे. हे अहवाल आल्यावरच लवकरच स्पष्ट होईल. अहवालात केलेल्या शिफारशीनुसार दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
या धरण फुटीत 21 जणांचा बळी गेलाय. या मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी जी मदत दिल्या त्याचा पाठपुरावाही आज घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितले आहे.
Conclusion:
Last Updated : Jan 2, 2020, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.