ETV Bharat / city

Budget Session Live Updates : विधिमंडळात सत्ताधारी विरोधक आमने-सामने; जाणून घ्या सर्व अपडेट्स - undefined

Budget Session Live Updates
Budget Session Live Updates
author img

By

Published : Mar 15, 2022, 10:43 AM IST

Updated : Mar 15, 2022, 7:52 PM IST

19:45 March 15

हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ घोषणा : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार

काश्मीर फाईल्सच्या करमुक्त करावा यासाठी भाजपच्या ९२ आमदारांच्या सहीचे पत्र अध्यक्षांना दिले आहे.

अर्थसंकल्प पूर्णपणे कॉपी, कट, पेस्ट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस योग्य पद्धतीने यांनी या अर्थसंकल्पातील उणीव त्रुटी लक्षात आणून दिल्या. सरकारला जेव्हा आम्ही उणिवा, त्रुटी लक्षात आणून देतो याचा अर्थ विरोधी पक्ष सभागृहात शत्रू नसून या जनतेच्या हितासाठी आणि समतोल विकासासाठी समूह वर्गाच्या हितासाठी संवाद केला पाहिजे ही यामागची भावना आहे. ५ लक्ष ४८ हजार ५७७ कोटी ५२ लाख हा आकडा मोठा आहे. हा एकदा अर्थसंकल्पाच्या माध्यमांतून तुम्ही जेव्हा सांगितला. जर तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पीय पुस्तकातील घोषणांचा अभ्यास केला तर पहिला मुद्दा हा अर्थसंकल्प पूर्णपणे कॉपी, कट, पेस्ट आहे.

अर्थसंकल्प फसवा

हा अर्थसंकल्प फसवा आहे. कारण इथे अनेक घोषणा होतात मात्र या घोषणावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. अर्थसंकल्प मांडताना जनतेसमोर आपण मांडलेले मुद्दे अर्थसंकल्पात यावे अशी आशा असते. राज्याच्या अर्थसंकल्प जनतेच्या हितासाठी असावा. पण जेव्हा मी या अर्थसंकल्पाकडे बघतो तेव्हा अजितदादांनी एक चांगली संधी गमावली आहे. १ मे १९६० हे एक असाधारण परिस्थितील हा अर्थसंकल्प होता. जगामध्ये कोरोनाची वैश्विक महामारी होती. सर जग स्तब्ध झालं होतं. अर्थचक्र थांबलं होतं. अपेक्षा होती की अजितदादा कोरोनाचा जो विपरीत प्रभाव समाज जीवनावर पडला होता. त्या समस्या सुटाव्यात यासाठी घोषणा करतील. मात्र अर्थसंकल्प वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, हा अर्थसंकल्प सुमार अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांची परिस्थिती, राज्याची उन्नती असेल.

शेतकऱ्यांसंदर्भात फक्त घोषणा

विश्वगौरव नरेंद्र मोदीजी हे या देशाच्या उन्नतीसाठी आणि देश जगाचा कप्तान व्हावा यासाठी मेहनत करतात. या देशाच्या अर्थसंकल्पाच्या प्रगतीमध्ये आमचेही मोठं योगदान असेल अशी आमची अपेक्षा होती. या अर्थसंकल्पात भविष्याचा वेध घेतला पाहिजे. मात्र हा अर्थसंकल्प म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं असा आहे. ११ मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा काय तर २०२१-२२ चा अर्थसंकल्प पुणे शहराबाहेरील रिंग रोड प्रस्तावित असून भुसंपादन करण्यात येईल. मग २१-२२ च्या अर्थसंकल्पात पुन्हा तोच मुद्दा पुणे शहराबाहेर चक्राकार मार्ग बांधण्याची सुरुवात करण्यात येईल व याच वर्षी भूसंपादन करण्यात येईल. २२-२३ ला पुन्हा तेच पुणे रिंग रोडसाठी सुमारे १९०० हेक्तर जमिनीचे भूसंपादन करावयाचे असून, एक हजार पाचशे कोटी प्रस्तावित करण्यात येत आहे. मला आश्चर्य वाटते की, दरवर्षी एकच मुद्दा भाषणात सांगितला जातो. याचप्रमाणे शिर्डी विमानतळावरील रात्रीच्या उड्डाणाची सुविधा, अमरावती विमातळावरील रात्रीच्या उड्डाणासाठी टर्मिनलजवळ इमारतीची सुविधा, नवी मुंबईतील आरक्षित भूखंडावर महाराष्ट्र भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे, शेतकऱ्यांसंदर्भात घोषणा आशा अनेक घोषणा मागील तीन वर्षांपासून पुन्हा त्याच त्याच घोषणा करण्यात येत आहेत. मात्र या योजनांना सुरु करण्यासाठी एक रुपया देण्यात आला नाहीये.

घोषणा करून वर्ष

दोन वर्षे आरोग्यसंदर्भात चर्चा करत आहोत. कोरोनासाठी केलेली घोषणा करण्यात आली की, कोरोनासाठी 7500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला असून, तो आम्ही ४ वर्षात पूर्ण करू. मात्र एक रुपया खर्च झाला नाही. अजून नामोनिशाण नाहीये. राज्यातील आठ ठिकाणी मध्यवर्ती भागात कार्डियाक पॅथलॅब उभारण्यात येतील. ८ मार्चला घोषणा केली आहे मात्र, अद्याप साधा प्रस्तावित असल्याचा बोर्डही लावला नाहीये. ही घोषणा करून वर्ष झालं आहे. शरद पवारांच्या नावाने सुरु झालेल्या योजनेचे फक्त थोडेफार काम सुरु झाले आहे. यात २१-२२ मध्ये गोठे बांधण्यात आले. मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मात्र कुठेही स्थान दिले नाही.

८९ हजार कोटींची तूट

अजितदादा २०१८मध्ये म्हणले होते की, कर्नाटक राज्यात ज्यापद्धतीने कृषी अर्थसंकल्प मांडण्यात येतो तसाच महाराष्ट्रातही मांडण्यात यावा. या ३ वर्षात कृषी अर्थसंकल्प का मांडण्यात आला नाही? १५ हजार कोटींची तूट आणि ५० हजार कोटींची राजकीय तूट झाल्याची कधीही पहिली नव्हती.

२०-२१ ४१ हजार १४२ कोटी

२१-२२ ३०हजार ७२५ कोटी

२२-२३ २४ हजार ३५३ कोटी

८९ हजार ५९८ कोटींची राजकोषीय तूट आहे.

या राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या काळात टीका होत होती की हे सरकार राज्याला कर्जबाजरी करत आहे. मागच्या ५ वर्षात १ लक्ष ५६ हजार कोटींचे कर्ज वाढले आहे. पण या तीन वर्षात १ लक्ष ९८ हजर ५८२ कोटींचे कर्ज वाढले. कर्ज वाढले याबाबत मी नाकारात्मक बोलणार नाही. समाजाचा एखादा भाग अडचणीत असतो. जेव्हा राज्यासमोरील प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा मायबाप सरकार म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे. अर्थसंकल्पात बेरोजगारीच्या संदर्भाने कोणतीही घोषणा नाहीये, शेतकरी आत्महत्यासंदर्भांत कोणतीही घोषणानाही,महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी कोणतीही तरतूद नाही, कृषी पंपांचे कनेक्शन आणि वीजबिल माफ यासंदर्भात कोणतंही घोषणा नाही, आरोग्यासाठी काहीही नाही, शेतमजुरांचे काय, बचत गटांच्या कर्जाचे काय, बारा बलुतेदारांच्या प्रश्नाचे काय? धानाच्या बोनसचे काय? गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय, केवळ घोषणा करून भागणार आहे का? अंगणवाडी सेविकांसाठी काय? पायाभूत सुविधांचे काय? राज्य संकटात असताना नुसत्या घोषणा केल्या आहेत. काय पंचसूत्री दिली आहे? आपण जो खर्च करणार आहोत त्याच्यात फक्त थोडी वाढ करून मोठी स्वप्न दाखवली आहेत. दरम्यान, पुरवणी मागण्यांवरील चर्चेला अर्थमंत्री उद्या उत्तर देणार आहेत.

15:08 March 15

म्हाडाच्या रिक्त 523 जागा तीन महिन्यात भरणार

  • रिक्त जागा म्हाडाच्या 523 जागा तीन महिन्यात भरण्यात येणार आहेत.
  • म्हाडाला दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी आमदार अमिन पटेल यांनी केला.
  • १६ हजार इमारतीसाठी निधी द्यावा असेही ते म्हणाले.
  • त्यासाठी 200 ते 250 कोटी रुपयांच्या तजवीज करण्यात येणार आहे.
  • ट्रांसिस्ट कॅम्प दलालाची यादी लावणार का? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला.

15:06 March 15

काश्मीर फाईल्स टॅक्स चित्रपट फ्री करण्याची मागणी

काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी विधानसभेत केली. भिवंडीत का चित्रपट बंद पडला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  • टॅक्स फ्री करण्याच्या मुद्यावर विरोधकांचा गोंधळ
  • पावनखिंड चित्रपट टॅक्स फ्री करण्याचीही मागणी
  • काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री कराल तर झुंड सुद्धा टॅक्स फ्री करा

14:21 March 15

प्रवीण दरेकर प्रकरणी गदारोळ

मुंब्रा बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे पडसाद विधीमंडळात उमटले आहे. दोन्ही सभागृह सत्ताधारी-विरोध आमने सामने आले आहे. सरकारकडून जाणीवपूर्वक कारवाई होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर सत्तेतील काही नेत्यांनी प्रवीण दरेकरांच्या अटकेची मागणी केली आहे.

14:14 March 15

वीज जोडणी पूर्ववत करू

महावितरण कंपनी शासनाच्या मालकीची 7568 कोटी थकबाकी होती

कृषि पंप ग्राहकांकडे ४४ हजार कोटी

एकूण ६४ हज्रार कोटी थकबाकी

कृषि पंप वीजजोडणी धोरण जाहीर

शेतकऱ्याने टप्प्या टप्प्याने भरावी

सूट देवून ३० हजार 400 कोटी रक्कम निश्चित

2378 कोटी भरणा कृषी ग्राहकांकडून

अनेक सदस्यांकडून वीजपुरवठा खंडित करण्याला विरोध आहे. 47 हजार 34 कोटी बँकांचे कर्ज महावितरणला मदत म्हणून 8500 कोटी महावीतरणला देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. तसेच 14 हजारावरून थकबाकी ५९ हजार वर गेली आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये मध्ये वीज कापली नाही. देशात कोळशाची टंचाई झाली. पण भारनियमन केले नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कापलेल्या वीज जोडण्या पूर्ववत करू अशी घोषणा राऊत यांनी केली.

11:09 March 15

वीज तोडण्यावरून भाजपा आक्रमक; कामकाज तहकूब

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापत असल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याने तात्काळा वीज तोडणे बंद करून वीज जोडणी करावी, अशी मागणी एका सदस्याने केली. त्यावर विरोधकांनी पाठिंबा देत सरकारला धारेवर धरले. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांनी सुद्धा यावर चर्चा व्हायला पाहिजे असून तात्काळा वीज जोडणी करा, अशी जोरदार मागणी केली. विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी बंद ठेवले.

11:06 March 15

भाजपा आमदार प्रशांत चव्हाण यांचा आरोप

सोशल मीडिया प्रमुख कटके यांच्यावर 15 दिवसांपूर्वी भ्याड हल्ला केला. मिरची पावडर टाकून हल्ला करण्यात आला. 15 दिवसांत कोणतीही कारवाई झाली नाही. राजकीय सूडभावनेतून हल्ला झाला. गँगस्टर मंडळीकडून त्रास सुरू आहे. पोलिसांकडे तक्रार केली पण दखल घेतली जात नाही. कल्याण डोंबिवली मध्ये मविआची दडपशाही सुरू आहे. कल्याण डोंबिवली मध्ये उपोषण करायला ही बंदी आहे. पोलीस स्टेशनची दारे बंद केली जात आहेत. त्यामुळे मी स्थगन प्रस्ताव मांडणार आहे, असे भाजपा आमदार प्रशांत चव्हाण म्हणाले.

10:39 March 15

विरोधकांची पायऱ्यावर बसून घोषणाबाजी

विरोधकांची पायऱ्यावर बसून घोषणाबाजी
विरोधकांची पायऱ्यावर बसून घोषणाबाजी

ईडीच्या ताब्यात असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक झाली आहे. आज विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली.

10:10 March 15

कामकाजाला सुरूवात

मुंबई - विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल झाल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवाय नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम आहे. तर रश्मी शुल्का फोन टॅपिंग प्रकरण, प्रवीण चव्हाण सीआयडी तपास यांसह काही विधेयकांवर चर्चा होणार आहे. त्यासंदर्भातील सर्व अपडेट्स ईटीव्ही भारतवर...

19:45 March 15

हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ घोषणा : भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार

काश्मीर फाईल्सच्या करमुक्त करावा यासाठी भाजपच्या ९२ आमदारांच्या सहीचे पत्र अध्यक्षांना दिले आहे.

अर्थसंकल्प पूर्णपणे कॉपी, कट, पेस्ट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस योग्य पद्धतीने यांनी या अर्थसंकल्पातील उणीव त्रुटी लक्षात आणून दिल्या. सरकारला जेव्हा आम्ही उणिवा, त्रुटी लक्षात आणून देतो याचा अर्थ विरोधी पक्ष सभागृहात शत्रू नसून या जनतेच्या हितासाठी आणि समतोल विकासासाठी समूह वर्गाच्या हितासाठी संवाद केला पाहिजे ही यामागची भावना आहे. ५ लक्ष ४८ हजार ५७७ कोटी ५२ लाख हा आकडा मोठा आहे. हा एकदा अर्थसंकल्पाच्या माध्यमांतून तुम्ही जेव्हा सांगितला. जर तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पीय पुस्तकातील घोषणांचा अभ्यास केला तर पहिला मुद्दा हा अर्थसंकल्प पूर्णपणे कॉपी, कट, पेस्ट आहे.

अर्थसंकल्प फसवा

हा अर्थसंकल्प फसवा आहे. कारण इथे अनेक घोषणा होतात मात्र या घोषणावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. अर्थसंकल्प मांडताना जनतेसमोर आपण मांडलेले मुद्दे अर्थसंकल्पात यावे अशी आशा असते. राज्याच्या अर्थसंकल्प जनतेच्या हितासाठी असावा. पण जेव्हा मी या अर्थसंकल्पाकडे बघतो तेव्हा अजितदादांनी एक चांगली संधी गमावली आहे. १ मे १९६० हे एक असाधारण परिस्थितील हा अर्थसंकल्प होता. जगामध्ये कोरोनाची वैश्विक महामारी होती. सर जग स्तब्ध झालं होतं. अर्थचक्र थांबलं होतं. अपेक्षा होती की अजितदादा कोरोनाचा जो विपरीत प्रभाव समाज जीवनावर पडला होता. त्या समस्या सुटाव्यात यासाठी घोषणा करतील. मात्र अर्थसंकल्प वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, हा अर्थसंकल्प सुमार अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांची परिस्थिती, राज्याची उन्नती असेल.

शेतकऱ्यांसंदर्भात फक्त घोषणा

विश्वगौरव नरेंद्र मोदीजी हे या देशाच्या उन्नतीसाठी आणि देश जगाचा कप्तान व्हावा यासाठी मेहनत करतात. या देशाच्या अर्थसंकल्पाच्या प्रगतीमध्ये आमचेही मोठं योगदान असेल अशी आमची अपेक्षा होती. या अर्थसंकल्पात भविष्याचा वेध घेतला पाहिजे. मात्र हा अर्थसंकल्प म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं असा आहे. ११ मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा काय तर २०२१-२२ चा अर्थसंकल्प पुणे शहराबाहेरील रिंग रोड प्रस्तावित असून भुसंपादन करण्यात येईल. मग २१-२२ च्या अर्थसंकल्पात पुन्हा तोच मुद्दा पुणे शहराबाहेर चक्राकार मार्ग बांधण्याची सुरुवात करण्यात येईल व याच वर्षी भूसंपादन करण्यात येईल. २२-२३ ला पुन्हा तेच पुणे रिंग रोडसाठी सुमारे १९०० हेक्तर जमिनीचे भूसंपादन करावयाचे असून, एक हजार पाचशे कोटी प्रस्तावित करण्यात येत आहे. मला आश्चर्य वाटते की, दरवर्षी एकच मुद्दा भाषणात सांगितला जातो. याचप्रमाणे शिर्डी विमानतळावरील रात्रीच्या उड्डाणाची सुविधा, अमरावती विमातळावरील रात्रीच्या उड्डाणासाठी टर्मिनलजवळ इमारतीची सुविधा, नवी मुंबईतील आरक्षित भूखंडावर महाराष्ट्र भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे, शेतकऱ्यांसंदर्भात घोषणा आशा अनेक घोषणा मागील तीन वर्षांपासून पुन्हा त्याच त्याच घोषणा करण्यात येत आहेत. मात्र या योजनांना सुरु करण्यासाठी एक रुपया देण्यात आला नाहीये.

घोषणा करून वर्ष

दोन वर्षे आरोग्यसंदर्भात चर्चा करत आहोत. कोरोनासाठी केलेली घोषणा करण्यात आली की, कोरोनासाठी 7500 कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला असून, तो आम्ही ४ वर्षात पूर्ण करू. मात्र एक रुपया खर्च झाला नाही. अजून नामोनिशाण नाहीये. राज्यातील आठ ठिकाणी मध्यवर्ती भागात कार्डियाक पॅथलॅब उभारण्यात येतील. ८ मार्चला घोषणा केली आहे मात्र, अद्याप साधा प्रस्तावित असल्याचा बोर्डही लावला नाहीये. ही घोषणा करून वर्ष झालं आहे. शरद पवारांच्या नावाने सुरु झालेल्या योजनेचे फक्त थोडेफार काम सुरु झाले आहे. यात २१-२२ मध्ये गोठे बांधण्यात आले. मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मात्र कुठेही स्थान दिले नाही.

८९ हजार कोटींची तूट

अजितदादा २०१८मध्ये म्हणले होते की, कर्नाटक राज्यात ज्यापद्धतीने कृषी अर्थसंकल्प मांडण्यात येतो तसाच महाराष्ट्रातही मांडण्यात यावा. या ३ वर्षात कृषी अर्थसंकल्प का मांडण्यात आला नाही? १५ हजार कोटींची तूट आणि ५० हजार कोटींची राजकीय तूट झाल्याची कधीही पहिली नव्हती.

२०-२१ ४१ हजार १४२ कोटी

२१-२२ ३०हजार ७२५ कोटी

२२-२३ २४ हजार ३५३ कोटी

८९ हजार ५९८ कोटींची राजकोषीय तूट आहे.

या राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या काळात टीका होत होती की हे सरकार राज्याला कर्जबाजरी करत आहे. मागच्या ५ वर्षात १ लक्ष ५६ हजार कोटींचे कर्ज वाढले आहे. पण या तीन वर्षात १ लक्ष ९८ हजर ५८२ कोटींचे कर्ज वाढले. कर्ज वाढले याबाबत मी नाकारात्मक बोलणार नाही. समाजाचा एखादा भाग अडचणीत असतो. जेव्हा राज्यासमोरील प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा मायबाप सरकार म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे. अर्थसंकल्पात बेरोजगारीच्या संदर्भाने कोणतीही घोषणा नाहीये, शेतकरी आत्महत्यासंदर्भांत कोणतीही घोषणानाही,महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी कोणतीही तरतूद नाही, कृषी पंपांचे कनेक्शन आणि वीजबिल माफ यासंदर्भात कोणतंही घोषणा नाही, आरोग्यासाठी काहीही नाही, शेतमजुरांचे काय, बचत गटांच्या कर्जाचे काय, बारा बलुतेदारांच्या प्रश्नाचे काय? धानाच्या बोनसचे काय? गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय, केवळ घोषणा करून भागणार आहे का? अंगणवाडी सेविकांसाठी काय? पायाभूत सुविधांचे काय? राज्य संकटात असताना नुसत्या घोषणा केल्या आहेत. काय पंचसूत्री दिली आहे? आपण जो खर्च करणार आहोत त्याच्यात फक्त थोडी वाढ करून मोठी स्वप्न दाखवली आहेत. दरम्यान, पुरवणी मागण्यांवरील चर्चेला अर्थमंत्री उद्या उत्तर देणार आहेत.

15:08 March 15

म्हाडाच्या रिक्त 523 जागा तीन महिन्यात भरणार

  • रिक्त जागा म्हाडाच्या 523 जागा तीन महिन्यात भरण्यात येणार आहेत.
  • म्हाडाला दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी आमदार अमिन पटेल यांनी केला.
  • १६ हजार इमारतीसाठी निधी द्यावा असेही ते म्हणाले.
  • त्यासाठी 200 ते 250 कोटी रुपयांच्या तजवीज करण्यात येणार आहे.
  • ट्रांसिस्ट कॅम्प दलालाची यादी लावणार का? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला.

15:06 March 15

काश्मीर फाईल्स टॅक्स चित्रपट फ्री करण्याची मागणी

काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी विधानसभेत केली. भिवंडीत का चित्रपट बंद पडला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  • टॅक्स फ्री करण्याच्या मुद्यावर विरोधकांचा गोंधळ
  • पावनखिंड चित्रपट टॅक्स फ्री करण्याचीही मागणी
  • काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री कराल तर झुंड सुद्धा टॅक्स फ्री करा

14:21 March 15

प्रवीण दरेकर प्रकरणी गदारोळ

मुंब्रा बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे पडसाद विधीमंडळात उमटले आहे. दोन्ही सभागृह सत्ताधारी-विरोध आमने सामने आले आहे. सरकारकडून जाणीवपूर्वक कारवाई होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर सत्तेतील काही नेत्यांनी प्रवीण दरेकरांच्या अटकेची मागणी केली आहे.

14:14 March 15

वीज जोडणी पूर्ववत करू

महावितरण कंपनी शासनाच्या मालकीची 7568 कोटी थकबाकी होती

कृषि पंप ग्राहकांकडे ४४ हजार कोटी

एकूण ६४ हज्रार कोटी थकबाकी

कृषि पंप वीजजोडणी धोरण जाहीर

शेतकऱ्याने टप्प्या टप्प्याने भरावी

सूट देवून ३० हजार 400 कोटी रक्कम निश्चित

2378 कोटी भरणा कृषी ग्राहकांकडून

अनेक सदस्यांकडून वीजपुरवठा खंडित करण्याला विरोध आहे. 47 हजार 34 कोटी बँकांचे कर्ज महावितरणला मदत म्हणून 8500 कोटी महावीतरणला देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. तसेच 14 हजारावरून थकबाकी ५९ हजार वर गेली आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये मध्ये वीज कापली नाही. देशात कोळशाची टंचाई झाली. पण भारनियमन केले नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कापलेल्या वीज जोडण्या पूर्ववत करू अशी घोषणा राऊत यांनी केली.

11:09 March 15

वीज तोडण्यावरून भाजपा आक्रमक; कामकाज तहकूब

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापत असल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याने तात्काळा वीज तोडणे बंद करून वीज जोडणी करावी, अशी मागणी एका सदस्याने केली. त्यावर विरोधकांनी पाठिंबा देत सरकारला धारेवर धरले. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांनी सुद्धा यावर चर्चा व्हायला पाहिजे असून तात्काळा वीज जोडणी करा, अशी जोरदार मागणी केली. विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी बंद ठेवले.

11:06 March 15

भाजपा आमदार प्रशांत चव्हाण यांचा आरोप

सोशल मीडिया प्रमुख कटके यांच्यावर 15 दिवसांपूर्वी भ्याड हल्ला केला. मिरची पावडर टाकून हल्ला करण्यात आला. 15 दिवसांत कोणतीही कारवाई झाली नाही. राजकीय सूडभावनेतून हल्ला झाला. गँगस्टर मंडळीकडून त्रास सुरू आहे. पोलिसांकडे तक्रार केली पण दखल घेतली जात नाही. कल्याण डोंबिवली मध्ये मविआची दडपशाही सुरू आहे. कल्याण डोंबिवली मध्ये उपोषण करायला ही बंदी आहे. पोलीस स्टेशनची दारे बंद केली जात आहेत. त्यामुळे मी स्थगन प्रस्ताव मांडणार आहे, असे भाजपा आमदार प्रशांत चव्हाण म्हणाले.

10:39 March 15

विरोधकांची पायऱ्यावर बसून घोषणाबाजी

विरोधकांची पायऱ्यावर बसून घोषणाबाजी
विरोधकांची पायऱ्यावर बसून घोषणाबाजी

ईडीच्या ताब्यात असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक झाली आहे. आज विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली.

10:10 March 15

कामकाजाला सुरूवात

मुंबई - विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल झाल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवाय नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम आहे. तर रश्मी शुल्का फोन टॅपिंग प्रकरण, प्रवीण चव्हाण सीआयडी तपास यांसह काही विधेयकांवर चर्चा होणार आहे. त्यासंदर्भातील सर्व अपडेट्स ईटीव्ही भारतवर...

Last Updated : Mar 15, 2022, 7:52 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.