ETV Bharat / city

'आरे' संदर्भात न्यायालयाने पुनर्विचार करावा...

author img

By

Published : Oct 4, 2019, 5:57 PM IST

आरे मेट्रो कारशेडप्रकरणी निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षतोडीस परवानगी दिली आहे. हे चुकीचे असल्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने केली आहे. मंडळाचे अध्यक्ष अक्षय बिरवाडकर यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे.

#SaveAarey

मुंबई - बहुचर्चित आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. याप्रकरणी सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. हा पर्यावरणासाठी गंभीर निर्णय असून याचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने केली आहे.

'आरे' संदर्भात न्यायालयाने पुनर्विचार करावा, आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची मागणी

'आरे'ला वनजमीन घोषित करण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे प्रस्तावित वृक्षतोड होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या वृक्षतोडीचे गांभीर्य जनमाणसांना कळावे यासाठी मंडळाकडून यावर्षी १९१९ सालची मुंबई आणि मुंबईची सध्याची परिस्थिती, असा तुलनात्मक देखावा उभारण्यात आला होता. यामाध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा मंडळाचा उद्देश होता.

उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता आरेमधील २७०० झाडे तोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट नसल्याने या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय बिरवाडकर यांनी केली आहे.

हेही वाचा : आरे मेट्रो कारशेडच्या विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

मुंबई - बहुचर्चित आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. याप्रकरणी सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. हा पर्यावरणासाठी गंभीर निर्णय असून याचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने केली आहे.

'आरे' संदर्भात न्यायालयाने पुनर्विचार करावा, आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची मागणी

'आरे'ला वनजमीन घोषित करण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे प्रस्तावित वृक्षतोड होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या वृक्षतोडीचे गांभीर्य जनमाणसांना कळावे यासाठी मंडळाकडून यावर्षी १९१९ सालची मुंबई आणि मुंबईची सध्याची परिस्थिती, असा तुलनात्मक देखावा उभारण्यात आला होता. यामाध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा मंडळाचा उद्देश होता.

उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता आरेमधील २७०० झाडे तोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट नसल्याने या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय बिरवाडकर यांनी केली आहे.

हेही वाचा : आरे मेट्रो कारशेडच्या विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Intro:मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील सर्व विरोधी याचिका फेटाळून लावल्या जरी असल्या तरी हा विषय येणाऱ्या पुढच्या पिढीचा , पर्यवरणाच्या समतोल राखण्याचा असल्याने न्यायालयाने त्यांनी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी मुंबईतील आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने केला आहे.


Body:आरे संदर्भात मेट्रोकारशेड साठी केली जाणारी वृक्षतोड ही किती भयानक आहे याची जाणीव जनमानसात व्हावी म्हणून या मंडळाकडून यंदा 1919 सालची मुंबईतील परिस्थिती व सध्याच्या वृक्षतोडीमुळे होणारी परिस्थिती याचा देखावा उभारण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयात मेट्रो करशेड ला विरोध दर्शवणारी याचिका दाखल करण्यात आली असताना न्यायालयाच्या बाहेर आरे चा विषय लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या मंडळाने केला होता. मात्र , शुक्रवारच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आरे मधील 2700 झाड तोडली जाणार असल्याने याचा राज्य सरकार , व उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा अशी मागणी अक्षय बिरवाडकर यांनी केली आहे.


Conclusion:या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.