ETV Bharat / city

पूरग्रस्त भागातील नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

author img

By

Published : Jul 25, 2021, 11:45 PM IST

राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधला.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
पूरग्रस्त भागातील नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई - पुरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर आरोग्य यंत्रणांनी तत्काळ उपचार करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला केले आहे.


राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधला. आवश्यक ते औषधे, गोळ्या, वैद्यकीय पथके याबाबत त्यांनी माहिती घेतली. पूर ओसल्यानंतर साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.


हेही वाचा-संकट कायम : कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

साथीच्या आजारांचा फैलाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन-
पूर ओसरल्यानंतर त्या भागात साथीच्या आजारांचा फैलाव होतो. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्याला प्राधान्य देण्यात यावे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सविस्तर सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. पुरग्रस्त भागातील विहीरींचे शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरीनच्या गोळ्या आणि क्लोरीन द्रव यांचा वापर करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-VIDEO : हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; पूल चक्काचूर, 9 पर्यटकांचा मृत्यू

आरोग्ययंत्रणेला या दिल्या आहेत सूचना-

  • पूराचे पाणी साचल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • पुराच्या अथवा पावसाच्या साचलेल्या पाण्यातून पायी चालत गेलेल्या नागरिकांना त्यांच्या जोखमीकरणाच्या वर्गीकरणानुसार लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करावे.
  • पूरग्रस्त भागात आणि पावसाचे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत.
  • साथरोगांवरील तसेच सर्पदंशावरील औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवा.
  • स्थानिक प्रशासनाच्या डास उत्पत्ती रोखण्याकरीता धूर आणि औषध फवारणी करावी, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी विभागाला दिल्या आहेत.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुरामुळे अन्य साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती मोहिम होती घ्यावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा- तरुणांना वाचविण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नदीपात्रात घेतली उडी

दरम्यान, चिपळूणमधील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात महिलेने मदतीसाठी टाहो फोडला. आमदार -खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजाव, अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली. त्यामुळे समाज माध्यमातून नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे.

मुंबई - पुरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर आरोग्य यंत्रणांनी तत्काळ उपचार करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला केले आहे.


राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधला. आवश्यक ते औषधे, गोळ्या, वैद्यकीय पथके याबाबत त्यांनी माहिती घेतली. पूर ओसल्यानंतर साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.


हेही वाचा-संकट कायम : कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

साथीच्या आजारांचा फैलाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन-
पूर ओसरल्यानंतर त्या भागात साथीच्या आजारांचा फैलाव होतो. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्याला प्राधान्य देण्यात यावे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सविस्तर सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. पुरग्रस्त भागातील विहीरींचे शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरीनच्या गोळ्या आणि क्लोरीन द्रव यांचा वापर करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-VIDEO : हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; पूल चक्काचूर, 9 पर्यटकांचा मृत्यू

आरोग्ययंत्रणेला या दिल्या आहेत सूचना-

  • पूराचे पाणी साचल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • पुराच्या अथवा पावसाच्या साचलेल्या पाण्यातून पायी चालत गेलेल्या नागरिकांना त्यांच्या जोखमीकरणाच्या वर्गीकरणानुसार लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करावे.
  • पूरग्रस्त भागात आणि पावसाचे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत.
  • साथरोगांवरील तसेच सर्पदंशावरील औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवा.
  • स्थानिक प्रशासनाच्या डास उत्पत्ती रोखण्याकरीता धूर आणि औषध फवारणी करावी, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी विभागाला दिल्या आहेत.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुरामुळे अन्य साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती मोहिम होती घ्यावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा- तरुणांना वाचविण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नदीपात्रात घेतली उडी

दरम्यान, चिपळूणमधील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात महिलेने मदतीसाठी टाहो फोडला. आमदार -खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजाव, अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली. त्यामुळे समाज माध्यमातून नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.