ETV Bharat / city

मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह भाजपात

author img

By

Published : Jul 7, 2021, 5:28 PM IST

कृपाशंकर सिंह यांच्यामागे मुंबईमधील खूप मोठा उत्तर भारतीय वर्ग आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आधी शिवसेनेला धक्का देण्यासाठी कृपाशंकर सिंह यांचा मोठा उपयोग भारतीय जनता पक्षाला होणार आहे.

कृपाशंकर सिंह भाजपात
कृपाशंकर सिंह भाजपात

मुंबई - काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भारतीय जनता पक्षात आज (बुधवारी) प्रवेश केला. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा, खासदार रिटा बहुगुना आणि आमदार आशिष शेलार उपस्थित होते. काही महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. कृपाशंकर सिंह यांच्यामागे मुंबईमधील खूप मोठा उत्तर भारतीय वर्ग आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आधी शिवसेनेला धक्का देण्यासाठी कृपाशंकर सिंह यांचा मोठा उपयोग भारतीय जनता पक्षाला होणार आहे.


'तीन पक्ष एकत्र असल्याने भारतीय जनता पक्षाला विस्ताराची संधी'

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याने भारतीय जनता पक्षाला आता राज्यामध्ये विस्ताराची मोठी संधी असल्याचे मत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्यात सत्तेत भारतीय जनता पक्ष नसला तरी, राज्यभरातून भारतीय जनता पक्षात लोकं येत आहेत. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि नाशिक जिल्ह्यातील युवा नेता यतीन रावसाहेब कदम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यतीन कदम हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र असून नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. अजूनही राज्यभरातून लोकं भाजपाशी जोडले जाणार असल्याचा, इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

'मनपा निवडणुकीत उत्तर भारतीय जनता भाजपासोबत'

370 कलम हटवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेससोबत मतभेद झाल्यामुळे आपण काँग्रेस पक्षातून दोन वर्षांपूर्वी बाहेर पडलो. मात्र गेली दोन वर्षे आपण कोणत्याही पक्षाशी जोडले गेले नव्हतो. मात्र 370 कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधून हटवल्यानंतर त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली होती आणि म्हणूनच आज भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा निर्णय मी घेतला असल्याचे कृपाशंकर सिंग यांनी सांगितले. काही महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मुंबईतील उत्तर भारतीय समाज पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्यामागे उभा राहील, असा विश्वासही कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला.

'गेल्या पंचवीस वर्षात मुंबईमध्ये कचरा जमा झाला'

गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. या पंचवीस वर्षात संपूर्ण मुंबईत कचरा जमा झाला असल्याचा टोला मंगलप्रताप लोढा यांनी शिवसेनेला मारला आहे. तसेच येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागेल, असा विश्वासही मंगलप्रभात लोढा यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा -शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी

मुंबई - काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भारतीय जनता पक्षात आज (बुधवारी) प्रवेश केला. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा, खासदार रिटा बहुगुना आणि आमदार आशिष शेलार उपस्थित होते. काही महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. कृपाशंकर सिंह यांच्यामागे मुंबईमधील खूप मोठा उत्तर भारतीय वर्ग आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आधी शिवसेनेला धक्का देण्यासाठी कृपाशंकर सिंह यांचा मोठा उपयोग भारतीय जनता पक्षाला होणार आहे.


'तीन पक्ष एकत्र असल्याने भारतीय जनता पक्षाला विस्ताराची संधी'

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याने भारतीय जनता पक्षाला आता राज्यामध्ये विस्ताराची मोठी संधी असल्याचे मत विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राज्यात सत्तेत भारतीय जनता पक्ष नसला तरी, राज्यभरातून भारतीय जनता पक्षात लोकं येत आहेत. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि नाशिक जिल्ह्यातील युवा नेता यतीन रावसाहेब कदम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यतीन कदम हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र असून नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. अजूनही राज्यभरातून लोकं भाजपाशी जोडले जाणार असल्याचा, इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

'मनपा निवडणुकीत उत्तर भारतीय जनता भाजपासोबत'

370 कलम हटवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेससोबत मतभेद झाल्यामुळे आपण काँग्रेस पक्षातून दोन वर्षांपूर्वी बाहेर पडलो. मात्र गेली दोन वर्षे आपण कोणत्याही पक्षाशी जोडले गेले नव्हतो. मात्र 370 कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधून हटवल्यानंतर त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली होती आणि म्हणूनच आज भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा निर्णय मी घेतला असल्याचे कृपाशंकर सिंग यांनी सांगितले. काही महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मुंबईतील उत्तर भारतीय समाज पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्यामागे उभा राहील, असा विश्वासही कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला.

'गेल्या पंचवीस वर्षात मुंबईमध्ये कचरा जमा झाला'

गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. या पंचवीस वर्षात संपूर्ण मुंबईत कचरा जमा झाला असल्याचा टोला मंगलप्रताप लोढा यांनी शिवसेनेला मारला आहे. तसेच येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागेल, असा विश्वासही मंगलप्रभात लोढा यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा -शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.