ETV Bharat / city

पाणीपुरीचा ठेला ते रेस्टॉरंट... वाचा बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा

author img

By

Published : Feb 7, 2020, 4:41 PM IST

फाळणीच्यावेळी पाकिस्तानमधून आलेले मोहनदास भगनानी व्यवसायाच्या शोधात मुंबईत आले. बांद्रा येथील एल्को बाजारपेठेत त्यांनी छोटा पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय मोठा झाला आहे.

lco hotel
एल्को रेस्टॉरंट

मुंबई - अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येत असतात. मात्र, सर्वांचेच स्वप्न पूर्ण होतात असे नाही. फाळणीच्यावेळी पाकिस्तानमधून आलेले मोहनदास भगनानी व्यवसायाच्या शोधात मुंबईत आले. बांद्रा येथील एल्को बाजारपेठेत त्यांनी पाणीपुरीचा छोटा व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय मोठा झाला आहे. या छोट्याशा व्यवसायाचे रूपांतर आता मोठ्या रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...

बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा

हेही वाचा - शिवरायांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे - शिवेंद्रराजे भोसले

मुंबई ही स्वप्ननगरी समजली जाते. अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवतात. मात्र, प्रत्येकाच्या स्वप्नाला दिशा मिळते असे नाही. मात्र, याला मोहनदास भगनानी हे अपवाद ठरले आहेत. मोहनदास यांनी मुंबईत बांद्रा येथे स्वतःचा पाणीपुरीचा 1975 साली व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांचे दुकान हे छोटासा स्टॉल होता. मात्र, आज 45 वर्षानंतर त्यांच्या स्टॉलचे रूपांतर हे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. 'एल्को' असे त्या रेस्टॉरंटचे नाव आहे.

हेही वाचा - 'लेडी सिंघम': महिला पोलीस उपनिरीक्षक बनली 'हिरोईन'

मुंबईच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या पाणीपुरीची चव चाखण्यासाठी खवय्ये येत असतात. आज त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त पाणीपुरी नाही तर, वेगवेगळे पदार्थही मिळतात. पन्नासपेक्षा जास्तजण त्यांच्याकडे कामाला आहेत. त्यांच्या रेस्टॉरंटची शाखा ही दुबईतदेखील आहे. आज त्यांचा हा बहरलेला व्यवसाय त्यांची मुलं अनिल आणि दीपक भगनानी हे सांभाळतात. यामुळे नक्कीच मोहनदास यांची कहाणी ही तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.

छोट्याशा स्टॉलपासून आमच्या वडिलांनी पाणीपुरी व्यवसायाची सुरुवात केली. आज तोच व्यवसाय मोठा झाला आहे. छोटेसे दुकान आता रेस्टॉरंट झाले आहे. 2000 साली आम्ही हे रेस्टॉरंट सुरू केले. वडिलांनी केलेल्या मेहनतीचे हे चीज आहे. सुरवातीला अनेक अडचणींचा सामना करून इथपर्यत पोहचलो आहे. आज आमची शाखा दुबईतदेखील आहे. तरुणांना मी फक्त एवढेच सांगेन की, मेहनत करा पाठीमाघे बघू नका, असे रेस्टॉरंटचे मालक अनिल भगनानी यांनी सांगितले.

मुंबई - अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येत असतात. मात्र, सर्वांचेच स्वप्न पूर्ण होतात असे नाही. फाळणीच्यावेळी पाकिस्तानमधून आलेले मोहनदास भगनानी व्यवसायाच्या शोधात मुंबईत आले. बांद्रा येथील एल्को बाजारपेठेत त्यांनी पाणीपुरीचा छोटा व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय मोठा झाला आहे. या छोट्याशा व्यवसायाचे रूपांतर आता मोठ्या रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...

बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा

हेही वाचा - शिवरायांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे - शिवेंद्रराजे भोसले

मुंबई ही स्वप्ननगरी समजली जाते. अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवतात. मात्र, प्रत्येकाच्या स्वप्नाला दिशा मिळते असे नाही. मात्र, याला मोहनदास भगनानी हे अपवाद ठरले आहेत. मोहनदास यांनी मुंबईत बांद्रा येथे स्वतःचा पाणीपुरीचा 1975 साली व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांचे दुकान हे छोटासा स्टॉल होता. मात्र, आज 45 वर्षानंतर त्यांच्या स्टॉलचे रूपांतर हे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. 'एल्को' असे त्या रेस्टॉरंटचे नाव आहे.

हेही वाचा - 'लेडी सिंघम': महिला पोलीस उपनिरीक्षक बनली 'हिरोईन'

मुंबईच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या पाणीपुरीची चव चाखण्यासाठी खवय्ये येत असतात. आज त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त पाणीपुरी नाही तर, वेगवेगळे पदार्थही मिळतात. पन्नासपेक्षा जास्तजण त्यांच्याकडे कामाला आहेत. त्यांच्या रेस्टॉरंटची शाखा ही दुबईतदेखील आहे. आज त्यांचा हा बहरलेला व्यवसाय त्यांची मुलं अनिल आणि दीपक भगनानी हे सांभाळतात. यामुळे नक्कीच मोहनदास यांची कहाणी ही तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.

छोट्याशा स्टॉलपासून आमच्या वडिलांनी पाणीपुरी व्यवसायाची सुरुवात केली. आज तोच व्यवसाय मोठा झाला आहे. छोटेसे दुकान आता रेस्टॉरंट झाले आहे. 2000 साली आम्ही हे रेस्टॉरंट सुरू केले. वडिलांनी केलेल्या मेहनतीचे हे चीज आहे. सुरवातीला अनेक अडचणींचा सामना करून इथपर्यत पोहचलो आहे. आज आमची शाखा दुबईतदेखील आहे. तरुणांना मी फक्त एवढेच सांगेन की, मेहनत करा पाठीमाघे बघू नका, असे रेस्टॉरंटचे मालक अनिल भगनानी यांनी सांगितले.

Intro:मुंबई

मुंबईत अनेक जण आपला स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. मात्र सर्वांचेच स्वप्न पूर्ण होतात असे नाही. फाळणीच्या वेळी पाकिस्तान मधून आलेले मोहनदास भगनानी व्यवसायाच्या शोधात मुंबईत आले. बांद्रा येथील एल्को बाजारपेठेत त्यांनी छोटा पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. आज हा व्यवसाय मोठा झाला आहे. या छोट्याश्या व्यवसायचे रूपांतर आता मोठ्या रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनीBody:मुंबई स्वप्ननगरी समजली जाते अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवतात मात्र प्रत्येकाच्या स्वप्नाला दिशा मिळते असे नाही. मात्र याला मोहनदास भगनानी हे अपवाद ठरले आहेत. मोहनदास यांनी मुंबईत वांद्रे येथे स्वतःचा पाणीपुरीचा 1975 साली व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांचे दुकान हे छोटासा स्टॉल होता. मात्र आज 45 वर्षानंतर त्यांच्या स्टॉलचे रूपांतर हे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये झाले आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या पाणी पुरीची चव चाखण्यासाठी खवय्ये येत असतात. आज त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त पाणी पुरी नाही तर वेगवेगळे पदार्थही मिळतात. पन्नास पेक्षा जास्त जण त्यांच्याकडे कामाला आहे व त्यांच्या रेस्टॉरंटची शाखा ही दुबईतदेखील आहे. आज त्यांचा हा बहरलेला व्यवसाय त्यांची मुलं अनिल आणि दीपक भगनानी हे सांभाळतात. यामुळे नक्कीच मोहनदास यांची कहाणी ही तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.

छोट्याशा स्टॉलपासून आमच्या वडिलांनी पाणीपुरी व्यवसायाची सुरुवात केली. आज तोच व्यवसाय मोठा झाला आहे. छोट्याशा दुकान आता रेस्टॉरंट झाले आहे. 2000 साली आम्ही हे रेस्टॉरंट सुरू केले.वडिलांनी केलेल्या मेहनतीचे हे चीज आहे. सुरवातीला अनेक अडचणींचा सामना करून इथपर्यत पोहचलो आहे.आज आमची शाखा दुबई देखील आहे. तरुणांना मी फक्त एवढेच सांगेन की मेहनत करा पाठी बघू नका असे रेस्टॉरंट चे मालक अनिल भगनानी यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.