ETV Bharat / city

पीएमसी बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

author img

By

Published : Sep 30, 2019, 10:36 PM IST

Updated : Sep 30, 2019, 11:51 PM IST

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमसी बँक प्रकरण

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरुन फिर्यादी जसबीर सिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरुन बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ ढवळे , याचिकाकर्ते वकील

मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वारीयम सिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा मालक राकेश वाधवा यांचा समावेश आहे.

2008 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पीएमसी बँकेकडून एचडीआयएलच्या ठराविक कंपन्यांची मोठी कर्जखाती बुडीत झाल्याने यामध्ये कर्जफेड होत नव्हती. ही बाब बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी आरबीआयच्या निदर्शनास न आणता जाणीवपूर्वक ही माहिती लपवली. बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करुन तो आरबीआयला सादर केला, असे पोलीस तपासात आढळून आलेले आहे. या सर्व प्रकारामुळे बँकेला तब्बल 4 हजार 355 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही आढळून आलेले आहे.

मोठ्या कर्ज प्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेले एचडीआयएल कंपनीचा मालक व बँकेचे पदाधिकारी यांच्यात संगनमत होऊन हा घोटाळा झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याला अनुसरुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम 409, 420, 465, 466, 471 सह 120 ब नुसार गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून एका विशेष पथकाची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र बँकवर आरबीआय ने निर्बंध घालत फक्त 10 हजार रुपयांच्या वर पैसे काढता येणार आहेत. हे निर्बंध बेकायदेशीर असल्याचे सांगत निर्बंध हटवावेत, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात सोमवारी दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरुन फिर्यादी जसबीर सिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरुन बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ ढवळे , याचिकाकर्ते वकील

मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वारीयम सिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा मालक राकेश वाधवा यांचा समावेश आहे.

2008 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पीएमसी बँकेकडून एचडीआयएलच्या ठराविक कंपन्यांची मोठी कर्जखाती बुडीत झाल्याने यामध्ये कर्जफेड होत नव्हती. ही बाब बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी आरबीआयच्या निदर्शनास न आणता जाणीवपूर्वक ही माहिती लपवली. बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करुन तो आरबीआयला सादर केला, असे पोलीस तपासात आढळून आलेले आहे. या सर्व प्रकारामुळे बँकेला तब्बल 4 हजार 355 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही आढळून आलेले आहे.

मोठ्या कर्ज प्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेले एचडीआयएल कंपनीचा मालक व बँकेचे पदाधिकारी यांच्यात संगनमत होऊन हा घोटाळा झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याला अनुसरुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम 409, 420, 465, 466, 471 सह 120 ब नुसार गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून एका विशेष पथकाची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र बँकवर आरबीआय ने निर्बंध घालत फक्त 10 हजार रुपयांच्या वर पैसे काढता येणार आहेत. हे निर्बंध बेकायदेशीर असल्याचे सांगत निर्बंध हटवावेत, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात सोमवारी दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.

Intro:तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधांमुळे पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे लाखो ग्राहक हे हवालदिल झालेले आहेत. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या प्रशासक यांच्या आदेशावरून फिर्यादी जसबीर सिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरून पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस , चेअरमन वारीयम सिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा मालक राकेश वाधवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Body:2008 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पीएमसी बँकेकडून एचडीआयल च्या ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाति बुडीत झाल्याने यामध्ये कर्जफेड होत होत नव्हती. ही बाब आरबीआयच्या निदर्शनास न आणता जाणीवपूर्वक ही माहिती लपवत बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून तो आरबीआयला सादर केले असल्याचे पोलीस तपासात आढळून आलेल आहे. या सर्व प्रकारामुळे बँकेला तब्बल 4355 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचही आढळून आलेले आहे . या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झालेला असून मोठ्या कर्ज प्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेली एचडीएल कंपनीचा मालक व बँकेचे पदाधिकारी यांच्यात संगनमत होऊन हा घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलेल आहे. याला अनुसरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम 409 ,420 ,465, 466 ,471 सह 120 ब नुसार गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून एका विशेष पथकाची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. Conclusion:
Last Updated : Sep 30, 2019, 11:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.