ETV Bharat / city

मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ, आरोग्ययंत्रणा अलर्टवर

author img

By

Published : Sep 27, 2022, 3:22 PM IST

Updated : Sep 27, 2022, 3:28 PM IST

मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार (Monsoon disease) डोकं वर काढतात. यंदाही पावसाळी आजारांना सुरुवात झाली आहे. मागील आठवडाभरात मलेरिया, (malaria) डेंग्यू, (dengue) लेप्टो, (gastro ) गॅस्ट्रो, कावीळ (jaundice) या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ (double increase in the number of patients) झाली आहे.

Double increase in number of malaria dengue gastro jaundice patients in Mumbai health department on alert
मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ, आरोग्ययंत्रणा अलर्टवर

मुंबई: मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार (Monsoon disease) डोकं वर काढतात. यंदाही पावसाळी आजारांना सुरुवात झाली आहे. मागील आठवडाभरात मलेरिया, (malaria) डेंग्यू, (dengue) लेप्टो, (gastro ) गॅस्ट्रो, कावीळ (jaundice) या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ (double increase in the number of patients) झाली आहे. १८ ते २५ सप्टेंबर या आठवडाभरात मलेरियाचे १७२, डेंग्यूचे ४१, लेप्टोचे ९ तर गॅस्ट्रोच्या ८८ रुग्णांची नोंद झाली आहे.

रुग्णसंख्येत वाढ- (increase in patients) मुंबईमध्ये १ ते २५ सप्टेंबरपर्यंत २५ दिवसांत मलेरियाचे ५७० रुग्ण, लेप्टोचे ३६, डेंग्यूचे १८०, गॅस्ट्रोचे २९६, हेपेटायसिसचे ५६, चिकनगुनियाचे २ तर स्वाईन फ्लूच्या ७ रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मलेरियाचे ७८७ रुग्ण, लेप्टोचे ६३, डेंग्यूचे १६९, गॅस्ट्रोचे ४६७, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर स्वाईन फ्लूच्या १८९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये मलेरियाचे ६०७ रुग्ण, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे २५६, गॅस्ट्रोचे २४५, हेपेटायसिसचे २८, चिकनगुनियाच्या ७ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हेपेटायसिस मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

इतके झाले मृत्यू- २०१९ मध्ये लेप्टोमुळे ११, डेंग्यूमुळे ३, हेपेटायसिसमुळे १, तर स्वाईन फ्लुमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ८, डेंग्यूमुळे ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५, हेपेटायसीसमुळे १ असा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर स्वाईन फ्लूने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वाईन फ्लू बाबत अशी घ्या काळजी- मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिंकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, डोळे, ओठ पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात (BMC hospitals) उपचार करून घ्यावे.

मुंबई: मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार (Monsoon disease) डोकं वर काढतात. यंदाही पावसाळी आजारांना सुरुवात झाली आहे. मागील आठवडाभरात मलेरिया, (malaria) डेंग्यू, (dengue) लेप्टो, (gastro ) गॅस्ट्रो, कावीळ (jaundice) या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ (double increase in the number of patients) झाली आहे. १८ ते २५ सप्टेंबर या आठवडाभरात मलेरियाचे १७२, डेंग्यूचे ४१, लेप्टोचे ९ तर गॅस्ट्रोच्या ८८ रुग्णांची नोंद झाली आहे.

रुग्णसंख्येत वाढ- (increase in patients) मुंबईमध्ये १ ते २५ सप्टेंबरपर्यंत २५ दिवसांत मलेरियाचे ५७० रुग्ण, लेप्टोचे ३६, डेंग्यूचे १८०, गॅस्ट्रोचे २९६, हेपेटायसिसचे ५६, चिकनगुनियाचे २ तर स्वाईन फ्लूच्या ७ रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मलेरियाचे ७८७ रुग्ण, लेप्टोचे ६३, डेंग्यूचे १६९, गॅस्ट्रोचे ४६७, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर स्वाईन फ्लूच्या १८९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये मलेरियाचे ६०७ रुग्ण, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे २५६, गॅस्ट्रोचे २४५, हेपेटायसिसचे २८, चिकनगुनियाच्या ७ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हेपेटायसिस मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

इतके झाले मृत्यू- २०१९ मध्ये लेप्टोमुळे ११, डेंग्यूमुळे ३, हेपेटायसिसमुळे १, तर स्वाईन फ्लुमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ८, डेंग्यूमुळे ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५, हेपेटायसीसमुळे १ असा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर स्वाईन फ्लूने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वाईन फ्लू बाबत अशी घ्या काळजी- मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिंकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, डोळे, ओठ पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात (BMC hospitals) उपचार करून घ्यावे.

Last Updated : Sep 27, 2022, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.