ETV Bharat / city

राज्यात ऑक्सिजन मर्यादित, सण-उत्सवात नियमांचे उल्लंघन करू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन

author img

By

Published : Aug 18, 2021, 8:38 PM IST

Updated : Aug 18, 2021, 9:07 PM IST

आगामी काळात येणारे सण आणि उत्सव पाहता कोरोनाशी संबंधीत नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी, निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) केले.

Don't break the rules at festivals! CM's appeal
सण-उत्सवात नियमांचे उल्लंघन करू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहान

मुंबई - सण उत्सव साजरे करताना जनतेने सतर्कता ठेवावी. कोरोना संपलेला नाही. ऑक्सिजनचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे कोविड संबंधी नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आगामी काळात येणारे सण आणि उत्सव पाहता कोरोनाशी संबंधीत नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी, निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) केले.

राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये असे आवाहान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.


हेही वाचा : हुश्श... मुंबईंत गेल्या दीड वर्षातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद


नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी, निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.


राज्यात ऑक्सिजन मर्यादित

कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वत:च्याच नव्हे तर, इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत. कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा. राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुंबई - सण उत्सव साजरे करताना जनतेने सतर्कता ठेवावी. कोरोना संपलेला नाही. ऑक्सिजनचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे कोविड संबंधी नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आगामी काळात येणारे सण आणि उत्सव पाहता कोरोनाशी संबंधीत नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी, निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) केले.

राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये असे आवाहान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.


हेही वाचा : हुश्श... मुंबईंत गेल्या दीड वर्षातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद


नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी, निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.


राज्यात ऑक्सिजन मर्यादित

कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वत:च्याच नव्हे तर, इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत. कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा. राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Last Updated : Aug 18, 2021, 9:07 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.