ETV Bharat / city

मराठा समाजाच्या आरक्षणसाठी टोकाचा संघर्ष करू, फडणवीसांचा सरकारविरुद्ध एल्गार - देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

devendra fadnavis
फडणवीसांचा सरकारविरुद्ध एल्गार
author img

By

Published : Dec 15, 2020, 7:16 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात बसलेल्या मराठा मोर्चातील आंदोलनकर्त्यांना संबोधले. फडणवीस यांनी आज सांगितले की, महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारने मराठा समाजासाठी काय केले हे मुख्यमंत्र्यांनी आधी सांगावे.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, तसेच कोरोना महामारी या सर्व गोष्टींमध्ये समाधानकारक कामगिरी करु शकले नसल्याचा दावा केला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं. सोमवारपासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात विरोधी पक्षाने पत्रकार ठाकरे सरकारला चांगलेच घेरले. तसेच, चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून, सोमवारी होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेतही विरोधकांनी दिले होते.


महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटली आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकारनं ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाला स्थगिती दिली, ही दुर्दैवाची बाब आहे. यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणसाठी टोकाचा संघर्ष करू, फडणवीस म्हणाले.

मुंबई - उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात बसलेल्या मराठा मोर्चातील आंदोलनकर्त्यांना संबोधले. फडणवीस यांनी आज सांगितले की, महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारने मराठा समाजासाठी काय केले हे मुख्यमंत्र्यांनी आधी सांगावे.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, तसेच कोरोना महामारी या सर्व गोष्टींमध्ये समाधानकारक कामगिरी करु शकले नसल्याचा दावा केला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं. सोमवारपासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात विरोधी पक्षाने पत्रकार ठाकरे सरकारला चांगलेच घेरले. तसेच, चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून, सोमवारी होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेतही विरोधकांनी दिले होते.


महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटली आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकारनं ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाला स्थगिती दिली, ही दुर्दैवाची बाब आहे. यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणसाठी टोकाचा संघर्ष करू, फडणवीस म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.