ETV Bharat / city

Corona Update : राज्यात आज दिवसभरात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक.. ३७४१ नवे रुग्ण

author img

By

Published : Aug 30, 2021, 8:10 PM IST

राज्यात आज (सोमवार) दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली. तर करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही कालच्या तुलनेत निम्मी घट झाल्याचे दिसून असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. राज्यभरात आज ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ३ हजार ७४१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत.

Maharashtra corona virus
Maharashtra corona virus

मुंबई - राज्यात आज (सोमवार) दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली. तर करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही कालच्या तुलनेत निम्मी घट झाल्याचे दिसून असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. राज्यभरात आज ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ३ हजार ७४१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ५२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत होती. त्यात आज घट झाली असून आज सोमवारी ३० ऑगस्ट रोजी ३,७४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातून आज ४,६९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५१,८३४ सक्रिय रुग्ण -

राज्यात ४,६९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६८,११२ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३,७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७,२०९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३८ लाख १२ हजार ८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६० हजार ६८० (१२.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८८ हजार ४८९ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५१,८३४ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहेत.

मृत्यूदर वाढला.. २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५, २१ ऑगस्टला १४५, २३ ऑगस्टला १०५, २४ ऑगस्टला ११९, २५ ऑगस्टला २१६, २६ ऑगस्टला १५९, २७ ऑगस्टला १७०, २८ ऑगस्टला १२६, २९ ऑगस्टला १३१, ३० ऑगस्टला ५२ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर वाढला असून तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

..या विभागात सर्वाधिक रुग्ण

  • मुंबई - ३३३
  • रायगड - ३९
  • पनवेल पालिका - ६१
  • अहमदनगर - ७७०
  • पुणे - ४२६
  • पुणे पालिका - १६८
  • पिपरी चिंचवड पालिका - ८३
  • सोलापूर - ३८२
  • सातारा - ४४६
  • कोल्हापूर - ८६
  • सांगली - २३७
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ५४
  • सिंधुदुर्ग - ५३
  • रत्नागिरी - ६९
  • उस्मानाबाद - २९
  • बीड - ७५

मुंबई - राज्यात आज (सोमवार) दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली. तर करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही कालच्या तुलनेत निम्मी घट झाल्याचे दिसून असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. राज्यभरात आज ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ३ हजार ७४१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ५२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत होती. त्यात आज घट झाली असून आज सोमवारी ३० ऑगस्ट रोजी ३,७४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातून आज ४,६९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५१,८३४ सक्रिय रुग्ण -

राज्यात ४,६९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६८,११२ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३,७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७,२०९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३८ लाख १२ हजार ८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६० हजार ६८० (१२.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८८ हजार ४८९ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५१,८३४ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहेत.

मृत्यूदर वाढला.. २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५, २१ ऑगस्टला १४५, २३ ऑगस्टला १०५, २४ ऑगस्टला ११९, २५ ऑगस्टला २१६, २६ ऑगस्टला १५९, २७ ऑगस्टला १७०, २८ ऑगस्टला १२६, २९ ऑगस्टला १३१, ३० ऑगस्टला ५२ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर वाढला असून तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

..या विभागात सर्वाधिक रुग्ण

  • मुंबई - ३३३
  • रायगड - ३९
  • पनवेल पालिका - ६१
  • अहमदनगर - ७७०
  • पुणे - ४२६
  • पुणे पालिका - १६८
  • पिपरी चिंचवड पालिका - ८३
  • सोलापूर - ३८२
  • सातारा - ४४६
  • कोल्हापूर - ८६
  • सांगली - २३७
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ५४
  • सिंधुदुर्ग - ५३
  • रत्नागिरी - ६९
  • उस्मानाबाद - २९
  • बीड - ७५
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.