ETV Bharat / city

'फडणवीस, दरेकरांच्या एसआयटी चौकशीला राज्य सरकारला मिळेना मुहूर्त'

author img

By

Published : Apr 29, 2021, 7:53 PM IST

Updated : Apr 29, 2021, 9:18 PM IST

फडणवीस, दरेकरांच्या एसआयटी चौकशीला राज्य सरकारला मुहूर्त मिळेना,अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबई लेटेस्ट न्यूज
'फडणवीस, दरेकरांच्या एसआयटी चौकशीला राज्य सरकारला मिळेना मुहूर्त'

मुंबई - रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि दोन आमदारांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. आठवडा उलटून गेला तरी राज्य सरकारकडून अद्याप एसआयटी नेमण्यात आलेली नाही, असा घरचा आहेर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

'फडणवीस, दरेकरांच्या एसआयटी चौकशीला राज्य सरकारला मिळेना मुहूर्त'

राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण, घरेलू कामगार, रिक्षा चालक, फेरिवाल्यांना लॉकडाऊन काळात सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीबाबत अभिनंदन करतानाच आघाडी सरकारचा जगताप यांनी समाचार घेतला. नियमबाह्य पध्दतीने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. फडणवीस, दरेकर यांनी यानंतर पोलीस ठाणे गाठून सरकारी कामांत हस्तक्षेप केला. काँग्रेसकडून या प्रकरणी फडणवीस, दरेकर आणि इतर दोन आमदारांविरोधात गुन्हा दाखल करुन एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली. मात्र, अद्याप आठ दिवस उलटून गेले तरी एसआयटीमार्फत चौकशी केलेली नाही. परमबीरसिंह यांच्या पत्रावरुन सचिन वाझेची चौकशी होते. मात्र, माझ्या पत्रावरुन फडणवीस, दरेकर यांची चौकशी का होत नाही, अशी खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मोफत लसीकरण -

राज्य सरकार सुमारे दीड कोटी जनतेचे मोफत लसीकरण करणार आहे. मोफत लसीकरणाटी मागणी काँग्रेसने केली होती. १ मे पासून काही ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया सुरु होईल. ही लवकर पूर्ण व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात सेंटर तयार करावेत. मुंबईत १३८ लसीकरण केंद्र आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने ते अपूरे असून २२७ वॉर्डातील प्रत्येक प्रभागांत किमान दोन सेंटर सुरु करावेत, अशी मागणी भाई जगताप यांनी केली. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात कठोर लॉकडाऊन लावण्याच्या न्यायलयाच्या सूचना आहेत. सरकारने त्यानुसार निर्णय घ्यावा, काँग्रेस सरकारच्या सोबत असेल, असेही जगताप म्हणाले.

'मोदीजी, मृतदेहांचा व्यवसाय करू नका'

केंद्राने लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. असे असताना कोरोना आटोक्यात आणण्यास केंद्र सरकार कुठे कमी पडत आहे. देशाचे पंतप्रधान याबाबत बोलणार आहेत का? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. लसीअभावीं मुंबईतील प्रमुख केंद्र बंद आहेत. केंद्राकडून पुरेसा साठा मिळत नाही. केंद्र व्यापाऱ्यांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे व्यवसाय करताना, लोकांच्या मृतदेहांचा व्यवसाय करू नका, अशी विनंती काँग्रेस नेते जगताप यांनी केली.

आर्थिक मदतीचा हात -

राज्यात ४ लाख १७ हजार नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत. ३ लाख ७५ हजार रिक्षा चालकांची नोंद आहे. फेरीवाल्यांची नोंद मर्यादित आहे. लॉकडाऊन काळात या सर्व घटकांना आर्थिक मदतीचा हात सरकारकडून दिला जातो आहे. सरकारच्या कामगिरीचे जगतापांनी यावेळी अभिनंदन केले.

मुंबई - रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि दोन आमदारांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. आठवडा उलटून गेला तरी राज्य सरकारकडून अद्याप एसआयटी नेमण्यात आलेली नाही, असा घरचा आहेर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

'फडणवीस, दरेकरांच्या एसआयटी चौकशीला राज्य सरकारला मिळेना मुहूर्त'

राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण, घरेलू कामगार, रिक्षा चालक, फेरिवाल्यांना लॉकडाऊन काळात सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीबाबत अभिनंदन करतानाच आघाडी सरकारचा जगताप यांनी समाचार घेतला. नियमबाह्य पध्दतीने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. फडणवीस, दरेकर यांनी यानंतर पोलीस ठाणे गाठून सरकारी कामांत हस्तक्षेप केला. काँग्रेसकडून या प्रकरणी फडणवीस, दरेकर आणि इतर दोन आमदारांविरोधात गुन्हा दाखल करुन एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली. मात्र, अद्याप आठ दिवस उलटून गेले तरी एसआयटीमार्फत चौकशी केलेली नाही. परमबीरसिंह यांच्या पत्रावरुन सचिन वाझेची चौकशी होते. मात्र, माझ्या पत्रावरुन फडणवीस, दरेकर यांची चौकशी का होत नाही, अशी खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मोफत लसीकरण -

राज्य सरकार सुमारे दीड कोटी जनतेचे मोफत लसीकरण करणार आहे. मोफत लसीकरणाटी मागणी काँग्रेसने केली होती. १ मे पासून काही ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया सुरु होईल. ही लवकर पूर्ण व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात सेंटर तयार करावेत. मुंबईत १३८ लसीकरण केंद्र आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने ते अपूरे असून २२७ वॉर्डातील प्रत्येक प्रभागांत किमान दोन सेंटर सुरु करावेत, अशी मागणी भाई जगताप यांनी केली. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात कठोर लॉकडाऊन लावण्याच्या न्यायलयाच्या सूचना आहेत. सरकारने त्यानुसार निर्णय घ्यावा, काँग्रेस सरकारच्या सोबत असेल, असेही जगताप म्हणाले.

'मोदीजी, मृतदेहांचा व्यवसाय करू नका'

केंद्राने लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. असे असताना कोरोना आटोक्यात आणण्यास केंद्र सरकार कुठे कमी पडत आहे. देशाचे पंतप्रधान याबाबत बोलणार आहेत का? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. लसीअभावीं मुंबईतील प्रमुख केंद्र बंद आहेत. केंद्राकडून पुरेसा साठा मिळत नाही. केंद्र व्यापाऱ्यांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे व्यवसाय करताना, लोकांच्या मृतदेहांचा व्यवसाय करू नका, अशी विनंती काँग्रेस नेते जगताप यांनी केली.

आर्थिक मदतीचा हात -

राज्यात ४ लाख १७ हजार नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत. ३ लाख ७५ हजार रिक्षा चालकांची नोंद आहे. फेरीवाल्यांची नोंद मर्यादित आहे. लॉकडाऊन काळात या सर्व घटकांना आर्थिक मदतीचा हात सरकारकडून दिला जातो आहे. सरकारच्या कामगिरीचे जगतापांनी यावेळी अभिनंदन केले.

Last Updated : Apr 29, 2021, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.