ETV Bharat / city

शेतकऱ्यांना खूशखबर; 'कर्जमुक्तीची व्याप्ती वाढवणार, करणार मोठी घोषणा . . . .'

author img

By

Published : Jun 26, 2019, 8:23 AM IST

शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक कर्जबाजारी शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आगामी महिन्यात मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

संपादित छायाचित्र

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक कर्जबाजारी शेतकरी वंचित आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आगामी महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. त्याबरोबरच त्याचबरोबर अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


शेतकऱ्यांसाठी यावर्षी ५८,२४४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे टार्गेट आहे. त्यामुळे बँकांनी कसलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएलबीसीच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कर्ज नक्की मिळेल. जलयुक्त शिवार योजनेचा फायदा न झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता. त्याला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी, अनेक ठिकाणी पाऊस कमी पडला असतानाही यंदा २४ लाख मेट्रिक टन पीक वाढल्याचे सांगितले.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारने यावर्षीही तुटपुंजी तरतूद केल्याचे विरोधकांनी चर्चेत म्हटले होते. यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी पलटवार करत सांगितले, की आघाडी सरकारने हे स्मारक गांभीर्याने घेतले नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकासाठी केंद्रातून सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरून राजकारण न करत सर्वांच्या सहकार्याने हे स्मारक उभारले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी विरोधकांना केले.


अर्थमंत्री मुनगंटीवारांनी केलेल्या अन्य घोषणा

  • २०२४ मधील ऑलिंपिंकमध्ये राज्यातील खेळाडूंचा टक्का वाढावा म्हणून तालुका स्तरावरील स्टेडियमला पाच कोटी रुपये देणार
  • संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अनियमित मिळत असल्याने तीन महिन्यात यासाठी कायदा तयार करून पैसे दिले जातील.
  • माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध योजना राबवण्यात येणार असून यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.
  • आमदार निधीसाठी संपूर्ण पाच वर्षासाठी १० कोटी रुपये देण्यात येत असून त्यात कोणतीही कपात केली जाणार नाही.
  • येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रस्ताव द्यावा, त्यानंतर त्याला निधी देण्यात येईल.
  • वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करणार

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक कर्जबाजारी शेतकरी वंचित आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आगामी महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. त्याबरोबरच त्याचबरोबर अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


शेतकऱ्यांसाठी यावर्षी ५८,२४४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे टार्गेट आहे. त्यामुळे बँकांनी कसलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएलबीसीच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कर्ज नक्की मिळेल. जलयुक्त शिवार योजनेचा फायदा न झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता. त्याला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी, अनेक ठिकाणी पाऊस कमी पडला असतानाही यंदा २४ लाख मेट्रिक टन पीक वाढल्याचे सांगितले.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारने यावर्षीही तुटपुंजी तरतूद केल्याचे विरोधकांनी चर्चेत म्हटले होते. यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी पलटवार करत सांगितले, की आघाडी सरकारने हे स्मारक गांभीर्याने घेतले नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकासाठी केंद्रातून सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरून राजकारण न करत सर्वांच्या सहकार्याने हे स्मारक उभारले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी विरोधकांना केले.


अर्थमंत्री मुनगंटीवारांनी केलेल्या अन्य घोषणा

  • २०२४ मधील ऑलिंपिंकमध्ये राज्यातील खेळाडूंचा टक्का वाढावा म्हणून तालुका स्तरावरील स्टेडियमला पाच कोटी रुपये देणार
  • संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अनियमित मिळत असल्याने तीन महिन्यात यासाठी कायदा तयार करून पैसे दिले जातील.
  • माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध योजना राबवण्यात येणार असून यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.
  • आमदार निधीसाठी संपूर्ण पाच वर्षासाठी १० कोटी रुपये देण्यात येत असून त्यात कोणतीही कपात केली जाणार नाही.
  • येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रस्ताव द्यावा, त्यानंतर त्याला निधी देण्यात येईल.
  • वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करणार
Intro:कर्जमुक्तीची व्याप्ती वाढवणार, आगामी महिन्यात होणार मोठी घोषणा- सुधीर मुनगंटीवार

मुंबई 25

कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या अधिकाधिक शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेच लाभ मिळावा यासाठी आगामी महिनाभरात कर्जमुक्ती न झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. पीडित शेतक-यांना  या योजनेचा लाभ मिळावा म्हणून योजनेच्या निकषात वारंवार बदल करण्यात आले. मात्र अजूनही अनेक शेतकरी तांत्रिक कारणाने या योजनेपासून दूर आहेत. त्या शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी आगामी एक महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. त्याचबरोबर अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पावरील चर्चेला मुनगंटीवार विधानसभेत उत्तर देत होते.

शेतक-यांसाठी यावर्षी ५८२४४ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे टार्गेट असून बँकांनी कसलेही आढेवेढे न घेता शेतक-यांना कर्ज द्यावे , अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसएलबीसीच्या बैठकीत बँक अधिका-यांना दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्यकता असणा-या शेतक-यांना यंदा कर्ज नक्की मिळेल. जलयुक्त शिवारचा फायदा न झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता त्याला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी, अनेक ठिकाणी पाऊस कमी पडला असतानाही यंदा २४ लाख मेट्रिक टन पीक वाढले असे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारने यावर्षी ही तुटपुंजी तरतूद केल्याचे विरोधकांनी चर्चेत म्हटले होते. यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी पलटवार करत सांगितले की, आघाडी सरकारने हे स्मारक गांभीर्याने घेतले नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकासाठी केंद्रातून सर्व परवानग्या मिळवल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरून राजकारण न करत सर्वांच्या सहकार्याने हे स्मारक उभारले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी विरोधकांना केले.


नथुराम गोडसेंचा जन्म बारामतीला झाला

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाबाबत ही विरोधकांनी प्रश्न उपस्तिथ केले होते. या सरकारच्या काळात महात्मा गांधी ऐवजी त्यांचे खुनी नथुराम गोडसेचा उदो उदो केला जात असल्याची टीका विरोधकांनी केली होती. यावर बोलताना अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, नथुराम गोडसे चा जन्म ही बारामतीत झाला होता. त्यांच्या या उत्तरावर विरोधक ही काही वेळ आवक झाले. एवढेच नव्हे तर अजित पवार यांनीही ही गोष्ट आम्हाला प्रथमच कळत असल्याचेही म्हटले.

अर्थमंत्री मुनगंटीवारांनी केलेल्या अन्य घोषणा

* २०२४ मधील ऑलिंपिंकमध्ये राज्यातील खेळाडूंचा टक्का वाढावा म्हणून तालुका स्तरावरील स्टेडियमला पाच कोटी रुपये देणार

* संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अनियमित मिळत असल्याने तीन महिन्यात यासाठी कायदा तयार करून पैसे दिले जातील.


* माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध योजना राबवण्यात येणार असून यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.

* आमदार निधीसाठी संपूर्ण पाच वर्षासाठी १० कोटी रुपये देण्यात येत असून त्यात कोणतीही कपात केली जाणार नाही.

*येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रस्ताव द्यावा, त्यानंतर त्याला निधी देण्यात येईल.

* वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करणारBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.