ETV Bharat / city

हायकोर्टात प्रत्यक्ष सुनावणीला 2 ऑगस्टपासून होणार सुरुवात

author img

By

Published : Jul 30, 2021, 7:52 PM IST

बॉम्बे हायकोर्टाच्या प्रशासकीय समितीने राज्यातील कोविड स्थिती पाहता त्यात होणारी सुधारणा पाहून 2 ऑगस्ट 2021 पासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हायकोर्टात प्रत्यक्ष सुनावणीला 2 ऑगस्टपासून होणार सुरुवात
हायकोर्टात प्रत्यक्ष सुनावणीला 2 ऑगस्टपासून होणार सुरुवात

मुंबई - बॉम्बे हायकोर्टाच्या प्रशासकीय समितीने राज्यातील कोविड स्थितीमध्ये होणारी सुधारणा पाहून 2 ऑगस्ट 2021 पासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता तसेच इतर न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या सर्व संघटनांनी सहभाग घेतला होता. प्रशासकीय समितीने सांगितले की लसीकरणामध्ये झालेली वाढ आणि त्याचबरोबर कोविड रुग्णांची घटणारी संख्या पाहता प्रत्यक्ष कामकाज सुरु होऊ शकते.

प्रिन्सिपल सीटद्वारे घेतलेले मुद्दे -
- प्रत्येक बेंच 4 दिवस सुनावणी करेल, चारपैकी तीन दिवस शारीरिक उपस्थिती द्वारे सुनावणी करेल.

- सगळ्या कॉर्ट रूममध्ये फुली हायब्रीड सिस्टीम लागू करण्यासंदर्भात पावले उचलली जाणार.

- वादी आणि प्रतिवादी यांना कोर्टाच्या आवारात तेव्हाच परवानगी असेल जेव्हा कोर्टात त्यांची उपस्थिती आवश्यक असेल.

- नागपूर, औरंगाबाद आणि गोवा इथल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर असलेली सुनावणी भौतिक पद्धतीने सुरु होईल. यासंदर्भातली एसओपी एक ते दोन दिवसात जारी होईल.

- कोर्टामध्ये काम करणारे वकील क्लार्क आणि कर्मचारी यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करता यावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही त्याच लोकांना पास देऊ शकतो ज्यांचे दोन्ही लसीचे डोस पूर्ण झाले आहेत.

- जुलै 2021 च्या शेवटपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावण्या होतील.

- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सात एप्रिलपासून कोर्टाने असा निर्णय घेतला होता की, अत्यावश्यक प्रकरणे वगळता सगळ्या सुनावण्या या व्हर्च्युअल असतील.

हेही वाचा - महिला पोलीस उपायुक्तांना हवीय मोफत बिर्याणी.. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई - बॉम्बे हायकोर्टाच्या प्रशासकीय समितीने राज्यातील कोविड स्थितीमध्ये होणारी सुधारणा पाहून 2 ऑगस्ट 2021 पासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता तसेच इतर न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या सर्व संघटनांनी सहभाग घेतला होता. प्रशासकीय समितीने सांगितले की लसीकरणामध्ये झालेली वाढ आणि त्याचबरोबर कोविड रुग्णांची घटणारी संख्या पाहता प्रत्यक्ष कामकाज सुरु होऊ शकते.

प्रिन्सिपल सीटद्वारे घेतलेले मुद्दे -
- प्रत्येक बेंच 4 दिवस सुनावणी करेल, चारपैकी तीन दिवस शारीरिक उपस्थिती द्वारे सुनावणी करेल.

- सगळ्या कॉर्ट रूममध्ये फुली हायब्रीड सिस्टीम लागू करण्यासंदर्भात पावले उचलली जाणार.

- वादी आणि प्रतिवादी यांना कोर्टाच्या आवारात तेव्हाच परवानगी असेल जेव्हा कोर्टात त्यांची उपस्थिती आवश्यक असेल.

- नागपूर, औरंगाबाद आणि गोवा इथल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर असलेली सुनावणी भौतिक पद्धतीने सुरु होईल. यासंदर्भातली एसओपी एक ते दोन दिवसात जारी होईल.

- कोर्टामध्ये काम करणारे वकील क्लार्क आणि कर्मचारी यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करता यावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही त्याच लोकांना पास देऊ शकतो ज्यांचे दोन्ही लसीचे डोस पूर्ण झाले आहेत.

- जुलै 2021 च्या शेवटपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावण्या होतील.

- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सात एप्रिलपासून कोर्टाने असा निर्णय घेतला होता की, अत्यावश्यक प्रकरणे वगळता सगळ्या सुनावण्या या व्हर्च्युअल असतील.

हेही वाचा - महिला पोलीस उपायुक्तांना हवीय मोफत बिर्याणी.. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.