ETV Bharat / city

BMC Approves 545 Crore Tenders : मुंबईत नालेसफाईच्या ५४५ कोटींच्या ३० निविदांना आयुक्तांनी दिली मंजुरी..

author img

By

Published : Mar 31, 2022, 9:51 PM IST

यंदा पावसाळ्यापूर्वी मुंबईत नालेसफाई ( Mumbai drain cleaning ) करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल ( Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) यांनी नालेसफाईच्या ५४५ कोटींच्या ३० निविदांना मंजुरी दिली ( BMC Approves 545 Crore Tenders ) आहे.

डॉ. इकबाल सिंह चहल
डॉ. इकबाल सिंह चहल

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई केली ( Mumbai drain cleaning ) जाते. त्याचबरोबर चर पुनर्भरणीचे काम केले जाते. मात्र, यावर्षी याबाबत प्रस्ताव मंजूर केला नसल्याने नालेसफाईची कामे सुरू झालेली नाहीत. यावरून पालिका प्रशासनावर टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आज एकूण ३० निविदांना महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली ( Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) आहे. या सर्व निविदांच्या कामांची एकूण किंमत सुमारे ५४५ कोटी रुपये इतकी ( BMC Approves 545 Crore Tenders ) आहे.

नालेसफाईसाठी १६२ कोटी - पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या असून, त्या ७१ कोटी रुपयांच्या आहेत. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ याप्रमाणे निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींच्या १६ प्रस्तावांना प्रशासकांनी मान्यता दिली आहे.


चर भरण्यासाठी ३८३ कोटी - दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्यांवरील चर पुनर्भरणी कामांचा भाग म्हणून परिमंडळनिहाय प्रत्येकी एक अशा ७ निविदांना देखील मान्यता मिळाली आहे. त्यांची एकत्रित किंमत ३८३ कोटी रुपये इतकी आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यासाठी ही मंजुरी मिळाल्याने उपयोगिता संस्थांना कार्यादेश देवून तातडीने कामे सुरु करता येणार आहेत.


यावरून आयुक्तांवर टीका - मुंबईत महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च रोजी संपला. ८ मार्चपासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाई, चर भरण्याचे प्रस्ताव मंजूर केले नव्हते. प्रस्ताव मंजूर न केल्याने नालेसफाई आणि चर भरण्याची कंत्राटे देता आली नाहीत. प्रस्ताव मंजूर न झाल्याने मुंबईत पावसाचे पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात होती. पालिका आयुक्तांनी आज ३१ मार्चला प्रस्तावांना मंजुरी दिल्याने कामे तातडीने सुरु करुन विहित वेळेत पूर्ण करणे प्रशासनाला शक्य होणार असल्याचे पालिका प्रशासनाने काळविले आहे.

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई केली ( Mumbai drain cleaning ) जाते. त्याचबरोबर चर पुनर्भरणीचे काम केले जाते. मात्र, यावर्षी याबाबत प्रस्ताव मंजूर केला नसल्याने नालेसफाईची कामे सुरू झालेली नाहीत. यावरून पालिका प्रशासनावर टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आज एकूण ३० निविदांना महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली ( Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) आहे. या सर्व निविदांच्या कामांची एकूण किंमत सुमारे ५४५ कोटी रुपये इतकी ( BMC Approves 545 Crore Tenders ) आहे.

नालेसफाईसाठी १६२ कोटी - पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या असून, त्या ७१ कोटी रुपयांच्या आहेत. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ याप्रमाणे निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींच्या १६ प्रस्तावांना प्रशासकांनी मान्यता दिली आहे.


चर भरण्यासाठी ३८३ कोटी - दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्यांवरील चर पुनर्भरणी कामांचा भाग म्हणून परिमंडळनिहाय प्रत्येकी एक अशा ७ निविदांना देखील मान्यता मिळाली आहे. त्यांची एकत्रित किंमत ३८३ कोटी रुपये इतकी आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यासाठी ही मंजुरी मिळाल्याने उपयोगिता संस्थांना कार्यादेश देवून तातडीने कामे सुरु करता येणार आहेत.


यावरून आयुक्तांवर टीका - मुंबईत महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च रोजी संपला. ८ मार्चपासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाई, चर भरण्याचे प्रस्ताव मंजूर केले नव्हते. प्रस्ताव मंजूर न केल्याने नालेसफाई आणि चर भरण्याची कंत्राटे देता आली नाहीत. प्रस्ताव मंजूर न झाल्याने मुंबईत पावसाचे पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात होती. पालिका आयुक्तांनी आज ३१ मार्चला प्रस्तावांना मंजुरी दिल्याने कामे तातडीने सुरु करुन विहित वेळेत पूर्ण करणे प्रशासनाला शक्य होणार असल्याचे पालिका प्रशासनाने काळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.