ETV Bharat / city

उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

author img

By

Published : Apr 16, 2021, 1:27 PM IST

Updated : Apr 16, 2021, 2:40 PM IST

नारायण राणे यांनी आपल्या घरी पत्रकार परिषद घेत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास ठाकरे सरकार अपयशी पडलेलं आहे अशी टीका केली. बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारने करायला हवा, संचारबंदीचा परिणाम होताना दिसत नाही, त्यामुळे हा लॉकडाऊन सरकारने का केला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

bjp mp narayan rane attacks on MVA government over corona in state
भ्रष्टाचार हा ठाकरे सरकारचा एक कलमी कार्यक्रम; भाजपा खासदार नारायण राणे यांची टीका..

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे असा गंभीर आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला.

नारायण राणे यांनी आपल्या घरी पत्रकार परिषद घेत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास ठाकरे सरकार अपयशी पडलेलं आहे अशी टीका केली. बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारने करायला हवा, संचारबंदीचा परिणाम होताना दिसत नाही, त्यामुळे हा लॉकडाऊन सरकारने का केला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

मुंबईच्या आणि राज्यातल्या बाजारपेठांमध्ये गर्दी काही कमी होत नाही, त्यामुळे राज्य सरकारने या बाजारातील गर्दीचा विचार करावा. तसेच रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत दिली, त्यातून पूर्ण कुटुंबांचं पालन-पोषण होणार आहे का? पाच जणांच्या कुटुंबाचं महिना दीड हजारात कसं भागणार? असा संतप्त सवाल देखील या वेळेस नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला केला आहे. व्यवसाय बंद असताना जीएसटी का सुरू आहेत? असा प्रश्न उपस्थित करत "लॉकडाऊन उठवा, दुकाने सुरू करा, गोरगरिबांचा विचार करा" असे आवाहन यावेळेस नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करत आहात?

लॉकडाऊन संदर्भात बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्री महोदय, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करायचं काम घटनेत राज्य सरकारला दिले आहे. जरा राज्यघटना वाचा, नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करता? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री वारंवार धमकी देत होते..

मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून मृतांची संख्या वाढत आहे. राज्यात 59 हजार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. हे पाप राज्य सरकारचं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आहे. देशात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 41 टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत. उपाय म्हणून मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्याची वारंवार धमकी देत होते, जणू महाराष्ट्र राज्य त्यांनी विकत घेतले आहे. दम देण्याचे काम राज्य सरकार करत होतं, शेवटी त्यांनी लॉकडाउन लागू केलाच अशी टीका नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा : कोरोनासह मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे असा गंभीर आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला.

नारायण राणे यांनी आपल्या घरी पत्रकार परिषद घेत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास ठाकरे सरकार अपयशी पडलेलं आहे अशी टीका केली. बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारने करायला हवा, संचारबंदीचा परिणाम होताना दिसत नाही, त्यामुळे हा लॉकडाऊन सरकारने का केला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

मुंबईच्या आणि राज्यातल्या बाजारपेठांमध्ये गर्दी काही कमी होत नाही, त्यामुळे राज्य सरकारने या बाजारातील गर्दीचा विचार करावा. तसेच रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत दिली, त्यातून पूर्ण कुटुंबांचं पालन-पोषण होणार आहे का? पाच जणांच्या कुटुंबाचं महिना दीड हजारात कसं भागणार? असा संतप्त सवाल देखील या वेळेस नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला केला आहे. व्यवसाय बंद असताना जीएसटी का सुरू आहेत? असा प्रश्न उपस्थित करत "लॉकडाऊन उठवा, दुकाने सुरू करा, गोरगरिबांचा विचार करा" असे आवाहन यावेळेस नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करत आहात?

लॉकडाऊन संदर्भात बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्री महोदय, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करायचं काम घटनेत राज्य सरकारला दिले आहे. जरा राज्यघटना वाचा, नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करता? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री वारंवार धमकी देत होते..

मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून मृतांची संख्या वाढत आहे. राज्यात 59 हजार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. हे पाप राज्य सरकारचं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आहे. देशात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 41 टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत. उपाय म्हणून मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्याची वारंवार धमकी देत होते, जणू महाराष्ट्र राज्य त्यांनी विकत घेतले आहे. दम देण्याचे काम राज्य सरकार करत होतं, शेवटी त्यांनी लॉकडाउन लागू केलाच अशी टीका नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा : कोरोनासह मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा

Last Updated : Apr 16, 2021, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.