ETV Bharat / city

एसटी संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून उद्या निर्णय घेऊ - सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांची माहिती - एसटी महामंडळाचे विलीनीकरण

विलिनीकरणाबत न्यायालयाने नियुक्त केलेली समितने दिलेला निर्णय सरकार मान्य करेल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. आझाद मैदानात आज रात्रभर कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सांगितलले. त्यानंतर उद्या निर्णय जाहीर करू अशी त्यांनी माहिती दिली आहे.

सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांची माहिती
सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांची माहिती
author img

By

Published : Nov 24, 2021, 11:25 PM IST

मुंबई - राज्य सरकारने वेतवनाढीचा निर्णय घेतल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांशी बोलून उद्या निर्णय जाहीर करू, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांनी दिली. यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांचा आज रात्रीही आझाद मैदानातच मुक्काम असणार आहे.


एसटी महामंडळाचे विलीनीकरण (ST employees strike in Azad Maidan) आणि इतर मागण्यांबाबत २७ ऑक्टोबरपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गेले दोन आठवडे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले जात आहे. राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पगार वाढ देण्याची तसेच विलीनीकरणाबत न्यायालयाने नियुक्त केलेली समितीने दिलेला निर्णय सरकार मान्य करेल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab on ST employees salary hike) यांनी दिली. आझाद मैदानात आज रात्रभर कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलले. त्यानंतर उद्या निर्णय जाहीर करू अशी त्यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा-ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, परिवहनमंत्र्यांची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन -
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे व इतर मागण्यांसाठी २७ ऑक्टोबरपासून कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. गेले दोन आठवडे हे आंदोलन सुरू आहे. उच्च न्यायालयाने याबाबत एक समिती स्थापन केली आहे. याबाबत पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. सरकारने या समितीच्या अहवालाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच समितीने विलिनीकरण करण्याबाबत नकारात्मक अहवाल दिल्यास एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे.

हेही वाचा- Corona Third Wave : महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर, सौम्य स्वरूपाची असेल - राजेश टोपे

मुंबई - राज्य सरकारने वेतवनाढीचा निर्णय घेतल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांशी बोलून उद्या निर्णय जाहीर करू, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांनी दिली. यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांचा आज रात्रीही आझाद मैदानातच मुक्काम असणार आहे.


एसटी महामंडळाचे विलीनीकरण (ST employees strike in Azad Maidan) आणि इतर मागण्यांबाबत २७ ऑक्टोबरपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गेले दोन आठवडे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले जात आहे. राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पगार वाढ देण्याची तसेच विलीनीकरणाबत न्यायालयाने नियुक्त केलेली समितीने दिलेला निर्णय सरकार मान्य करेल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab on ST employees salary hike) यांनी दिली. आझाद मैदानात आज रात्रभर कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलले. त्यानंतर उद्या निर्णय जाहीर करू अशी त्यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा-ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, परिवहनमंत्र्यांची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन -
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे व इतर मागण्यांसाठी २७ ऑक्टोबरपासून कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. गेले दोन आठवडे हे आंदोलन सुरू आहे. उच्च न्यायालयाने याबाबत एक समिती स्थापन केली आहे. याबाबत पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. सरकारने या समितीच्या अहवालाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच समितीने विलिनीकरण करण्याबाबत नकारात्मक अहवाल दिल्यास एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे.

हेही वाचा- Corona Third Wave : महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर, सौम्य स्वरूपाची असेल - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.