ETV Bharat / city

Har Ghar Tiranga Initiative Mumbai संतापजनक नरिमन पॉईंट ते गिरगाव परिसरात दोन तिरंग्यांमध्ये भाजपचा झेंडा

author img

By

Published : Aug 14, 2022, 6:51 AM IST

नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी भाग नेहमीच वर्दळीचा असतो मान्सूनमध्ये पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या परिसराला भेट देतात या मार्गावर मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंडे लावण्यात आले आहेत किमान २ ते ३ तिरंगा झेंड्यांच्यामध्ये भाजपचा झेंडा लावण्यात आला आहे देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना भाजपचे झेंडे तिरंग्याच्यामध्ये लावण्यात आल्याने देशप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे Indian Independence Day Azadi ka Amrit Mahotsav

Har Ghar Tiranga Initiative Mumbai
हर घर तिरंगा मोहीम

मुंबई हर घर तिरंगा अभियान Har Ghar Tiranga Initiative Mumbai देशभरात राबवले जात आहे. ठिकठिकाणी तिरंगा लावण्यात येत आहेत. नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत Nariman Point to Girgaon Chowpatty लावलेल्या तिरंग्याच्यामध्ये भाजपचा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देशप्रेमींमध्ये यामुळे संतापाची लाट आहे. यंदा देशाचा अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. शिंदे सरकारनेसुद्धा महोत्सवी Azadi ka Amrit Mahotsav वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रत्येक घरात झेंडा मोफतची मोहीम महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत प्रत्येक घरात झेंडा मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. सलग आठ दिवस तिरंगा फडकवत ठेवला जात आहे. राज्यातील सर्व महापालिकांना हर घर तिरंगा मोहीम राबविणयाचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरे करण्यासाठी देशभरातील सर्वच महापालिकां सज्ज आहेत. महाराष्ट्रातसुद्धा हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. असे असताना हा विचित्र प्रकार निदर्शनास आला.


देशप्रेमींमध्ये संतापाची लाट नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी भाग नेहमीच वर्दळीचा असतो. मान्सूनमध्ये पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या परिसराला भेट देतात. गणेशोत्सव काळात मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा, गणेश गल्ली आदी दक्षिण आणि मध्य मुंबईतील गणेशमूर्तींचे गिरगाव चौपाटी येथे विसर्जन होते. देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना हा परिसर नेहमीच भुरळ घालतो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंडे लावण्यात आले आहेत. किमान २ ते ३ तिरंगा झेंड्यांच्यामध्ये भाजपचा झेंडा लावण्यात आला आहे. देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना भाजपचे झेंडे तिरंग्याच्यामध्ये लावण्यात आल्याने देशप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


तिरंग्याची किंमत २८ रुपये देशात मोफत तिरंगा द्यावा, असे पंतप्रधानांचे आदेश आहेत. अनेक भाजपशासित राज्यात तिरंगा २० ते ३० रुपयांना विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येत आहेत. काही भागात तिरंगा विकत न घेतल्यास रेशनिंगवरील धान्य बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रसुद्धा त्याला अपवाद राहिलेला नाही. महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक शाखांमध्ये तिरंगा २० रुपयांना विकला जातो आहे. तसेच, शाळांमध्ये तिरंगा अनिवार्य केला असून, प्रत्येक मुलाकडून २८ रुपये घेण्यात आले आहेत. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या नावाने ही लूट सुरू आहे का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.


देशभक्ती नव्हे तर ढोंग हर घर तिरंगा हे अभियान भारतातील मूलभूत समस्यांवरून लक्ष विचलित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ला महागाई भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापासून पळ काढण्याचा प्रकार आहे. देशभक्ती वगैरे यात काही नाही, तर देशभक्तीच्या नावावर पैसे गोळा करण्याचा गोरखधंदा आहे. सरकारी यंत्रणा यासाठी कामाला लावल्या आहेत. सरकारी यंत्रणा जर कामाला लावली नसती आणि भाजप कार्यकर्ते झेंडे लावण्यासाठी गेले असते तर नागरिकांनी समस्यांबाबत जाब विचारून चोप दिला असता.

महापालिकेचे कर्मचारी कामाला लावले त्यामुळेच महापालिका, पोस्टाचे कर्मचारी, आरोग्य आणि अंगणवाडी सेविकांचा वापर केला जातो आहे. भाजपने ७५ वर्षांत तिरंग्याचा मानसन्मान कधीही ठेवला नाही. उलट तिरंग्याचा तिरस्कार आणि त्याला पायदळी तुडवले आहे. भाजपचे देशप्रेम हे केवळ ढोंग आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते सागर तायडे यांनी केली.

हेही वाचा सरकार पाडण्यावरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर जोरदार टीका

मुंबई हर घर तिरंगा अभियान Har Ghar Tiranga Initiative Mumbai देशभरात राबवले जात आहे. ठिकठिकाणी तिरंगा लावण्यात येत आहेत. नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत Nariman Point to Girgaon Chowpatty लावलेल्या तिरंग्याच्यामध्ये भाजपचा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देशप्रेमींमध्ये यामुळे संतापाची लाट आहे. यंदा देशाचा अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. शिंदे सरकारनेसुद्धा महोत्सवी Azadi ka Amrit Mahotsav वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रत्येक घरात झेंडा मोफतची मोहीम महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत प्रत्येक घरात झेंडा मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. सलग आठ दिवस तिरंगा फडकवत ठेवला जात आहे. राज्यातील सर्व महापालिकांना हर घर तिरंगा मोहीम राबविणयाचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरे करण्यासाठी देशभरातील सर्वच महापालिकां सज्ज आहेत. महाराष्ट्रातसुद्धा हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. असे असताना हा विचित्र प्रकार निदर्शनास आला.


देशप्रेमींमध्ये संतापाची लाट नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी भाग नेहमीच वर्दळीचा असतो. मान्सूनमध्ये पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या परिसराला भेट देतात. गणेशोत्सव काळात मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा, गणेश गल्ली आदी दक्षिण आणि मध्य मुंबईतील गणेशमूर्तींचे गिरगाव चौपाटी येथे विसर्जन होते. देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना हा परिसर नेहमीच भुरळ घालतो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंडे लावण्यात आले आहेत. किमान २ ते ३ तिरंगा झेंड्यांच्यामध्ये भाजपचा झेंडा लावण्यात आला आहे. देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना भाजपचे झेंडे तिरंग्याच्यामध्ये लावण्यात आल्याने देशप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


तिरंग्याची किंमत २८ रुपये देशात मोफत तिरंगा द्यावा, असे पंतप्रधानांचे आदेश आहेत. अनेक भाजपशासित राज्यात तिरंगा २० ते ३० रुपयांना विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येत आहेत. काही भागात तिरंगा विकत न घेतल्यास रेशनिंगवरील धान्य बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रसुद्धा त्याला अपवाद राहिलेला नाही. महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक शाखांमध्ये तिरंगा २० रुपयांना विकला जातो आहे. तसेच, शाळांमध्ये तिरंगा अनिवार्य केला असून, प्रत्येक मुलाकडून २८ रुपये घेण्यात आले आहेत. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या नावाने ही लूट सुरू आहे का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.


देशभक्ती नव्हे तर ढोंग हर घर तिरंगा हे अभियान भारतातील मूलभूत समस्यांवरून लक्ष विचलित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ला महागाई भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापासून पळ काढण्याचा प्रकार आहे. देशभक्ती वगैरे यात काही नाही, तर देशभक्तीच्या नावावर पैसे गोळा करण्याचा गोरखधंदा आहे. सरकारी यंत्रणा यासाठी कामाला लावल्या आहेत. सरकारी यंत्रणा जर कामाला लावली नसती आणि भाजप कार्यकर्ते झेंडे लावण्यासाठी गेले असते तर नागरिकांनी समस्यांबाबत जाब विचारून चोप दिला असता.

महापालिकेचे कर्मचारी कामाला लावले त्यामुळेच महापालिका, पोस्टाचे कर्मचारी, आरोग्य आणि अंगणवाडी सेविकांचा वापर केला जातो आहे. भाजपने ७५ वर्षांत तिरंग्याचा मानसन्मान कधीही ठेवला नाही. उलट तिरंग्याचा तिरस्कार आणि त्याला पायदळी तुडवले आहे. भाजपचे देशप्रेम हे केवळ ढोंग आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते सागर तायडे यांनी केली.

हेही वाचा सरकार पाडण्यावरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर जोरदार टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.