ETV Bharat / city

मुंबईत मागील 5 वर्षात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 1854 वाहनचालकांवर कारवाई

author img

By

Published : Aug 27, 2019, 4:28 PM IST

Updated : Aug 27, 2019, 8:47 PM IST

२०१५ पासून जुलै २०१९ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचे वय हे १८ ते २० वर्ष वयोगटातील आहेत. यात तब्बल १ हजार ८५४ जणांवर कारवाई झाली आहे, तर मद्यपी महिला वाहनचालकांचे प्रमाण आहे तब्बल ३६७. गेल्या पाच वर्षात मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या १० हजार ७०२ वाहनचालकांचे व्हॅन परवाने रद्द करण्यात आले आहेत.

वाहतूक

मुंबई - दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. मुंबईत गेल्या ५ वर्षात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या १८ ते २० वर्षे वयोगटातील १ हजार ८५४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३८ कोटी ८६ लाख ५९ हजार २२४ रुपये एवढा दंड वसूल केला आहे. २०१७ च्या काळात हाच दंड ८५ कोटी ७८ लाख ६० हजार ३५५ रुपये एवढा वसूल करण्यात आला होता. वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या ई चलन कार्यप्रणालीमुळे वाहतूक पोलीस विभागात भ्रष्टाचार कमी होऊन मद्यपी वाहनचालकांवर व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली गेल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.

मुंबईत मागील 5 वर्षात 1854 मद्यापी वाहन चालकांवर कारवाई

हेही वाचा - मुंबईतील १६ पुलांवरील 'भार' पालिका कमी करणार

२०१५ मध्ये तब्बल १८ हजार ०३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. हेच प्रमाण २०१६ मध्ये वाढत मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या २० हजार ७६८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. २०१७ मध्ये १७ हजार ९३१ मद्यापी वाहनचालकांवर कारवाई झाली असून २०१८ मध्ये यात सर्वाधिक घट होत ११ हजार ६६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - गणपती उत्सवापूर्वीच शिक्षकांच्या खात्यांवर होणार पगार जमा

महत्वाचे म्हणजे सन २०१५ पासून जुलै २०१९ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचे वय हे १८ ते २० वर्ष वयोगटातील आहेत. यात तब्बल १ हजार ८५४ जणांवर कारवाई झाली आहे, तर मद्यपी महिला वाहनचालकांचे प्रमाण आहे तब्बल ३६७. गेल्या पाच वर्षात मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या १० हजार ७०२ वाहनचालकांचे व्हॅन परवाने रद्द करण्यात आले आहेत.

मुंबई - दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. मुंबईत गेल्या ५ वर्षात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या १८ ते २० वर्षे वयोगटातील १ हजार ८५४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३८ कोटी ८६ लाख ५९ हजार २२४ रुपये एवढा दंड वसूल केला आहे. २०१७ च्या काळात हाच दंड ८५ कोटी ७८ लाख ६० हजार ३५५ रुपये एवढा वसूल करण्यात आला होता. वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या ई चलन कार्यप्रणालीमुळे वाहतूक पोलीस विभागात भ्रष्टाचार कमी होऊन मद्यपी वाहनचालकांवर व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली गेल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.

मुंबईत मागील 5 वर्षात 1854 मद्यापी वाहन चालकांवर कारवाई

हेही वाचा - मुंबईतील १६ पुलांवरील 'भार' पालिका कमी करणार

२०१५ मध्ये तब्बल १८ हजार ०३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. हेच प्रमाण २०१६ मध्ये वाढत मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या २० हजार ७६८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. २०१७ मध्ये १७ हजार ९३१ मद्यापी वाहनचालकांवर कारवाई झाली असून २०१८ मध्ये यात सर्वाधिक घट होत ११ हजार ६६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - गणपती उत्सवापूर्वीच शिक्षकांच्या खात्यांवर होणार पगार जमा

महत्वाचे म्हणजे सन २०१५ पासून जुलै २०१९ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचे वय हे १८ ते २० वर्ष वयोगटातील आहेत. यात तब्बल १ हजार ८५४ जणांवर कारवाई झाली आहे, तर मद्यपी महिला वाहनचालकांचे प्रमाण आहे तब्बल ३६७. गेल्या पाच वर्षात मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या १० हजार ७०२ वाहनचालकांचे व्हॅन परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Intro:दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या ट्राफिक विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते . मुंबईत गेल्या 5 वर्षात दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या 18 ते 20 वर्षे वयोगटातील 1854 वाहणचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. ट्राफिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३८ कोटी ८६ लाख ५९ हजार २२४ रुपये एवढा दंड वसूल केला आहे. सन २०१७ च्या काळात हाच दंड ८५ कोटी ७८ लाख ६० हजार ३५५ रुपये एवढा वसूल करण्यात आला होता. ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आलेल्या ई चलान कार्यप्रणालीमुळे ट्रॅफिक पोलीस विभागात भ्रष्टाचार कमी होऊन मद्यपी वाहनचालकांवर , व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली गेल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.
Body:मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई बाबत बोलायचे झाल्यास २०१५ साली तब्बल १८०३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. हेच प्रमाण २०१६ मध्ये वाढत मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्या २०७६८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. २०१७ मध्ये १७९३१ मद्यापायी वाहनचालकांवर कारवाई झाली असून २०१८ मध्ये यात सर्वाधिक घट होत ११६६२ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.Conclusion:महत्वाचे म्हणजे सन २०१५ पासून जुलै २०१९ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांचे वय हे १८ ते २० वर्ष वयोगटातील असून तब्बल १८५४ जणांवर कारवाई झाली आहे. तर मद्यपी महिला वाहनचालकांचे प्रमाण आहे तब्बल ३६७ . गेल्या पाच वर्षात मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या १०७०२ वाहनचालकांचे व्हॅन परवाने रद्द करण्यात आले आहेत.

(बाईट - जितेंद्र घाडगे , आरटीआय कार्यकर्ता)
Last Updated : Aug 27, 2019, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.