मुंबई वादग्रस्त संघटना पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटनेच्या संबंधित पाच संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने आज अटक केली आहे. या सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयामध्ये हजर केले, असता या सर्व आरोपींना 27 सप्टेंबर पर्यंत एटीएस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. एटीएसने आरोपींना दहा दिवसाची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पाच दिवसाची एटीएस कोठडी दिली आहे.
पाच आरोपींना अटक या संघटनेच्या संबंधित संशयित लोकांनी विरोधात एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मुंबईतील मालाड, भिवंडी, कांदिवली, पालघर आणि कुर्ला या परिसरामधून संशयित पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मजझर खान, सादिक कुरेशी, असिफ खान, मोहम्मद इकबाल खान आणि मोमीन मिस्त्री या आरोपींचा समावेश आहे. महाराष्ट्र एटीएसने युएपीए देशविरोधी गतीविधी आणि आयपीसीच्या कलम १२०बी, १२१-ए, १५३-ए आणि यूएपीए कायदा १३(१) अंतर्गत आरोपीना अटक केली आहे.
तपास यंत्रणांचा दावा एटीएस युनिट 10 विक्रोळी च्या वतीने या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर असा आरोप करण्यात आला आहे. की हे संशयित आरोपी जातिजातीत तेढ निर्माण करणे देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा तपास यंत्रणांचा दावा केला आहे. या सर्व प्रकरणाची तपासता दरम्यान आरोपी क्रमांक दोन सादिक कुरेशी शेख यांचा लॅपटॉप तपास यंत्रणेने जप्त केला आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक संशयितपत माहिती असल्याचा दावा एटीएसने केला आहे.
20 हून अधिक लोकांना अटक राज्यातल्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएनं एटीएसच्या मदतीनं पीएफआयच्या कार्यालयावर छापे मारले आहेत. त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित 20 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर देशभरातून आतापर्यंत एकूण 106 जणांना ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबईच्या नेरुळमध्येही रात्री तीन वाजल्यापासून NIA ची छापेमारी सुरु आहे. सेक्टर २३ मधल्या PFI च्या कार्यालयावर NIA ने छापा टाकला. प्यॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.