ETV Bharat / city

स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभादेवीमध्ये रंगला सायकल स्पर्धेचा थरार - कस्टम पॉइंट

'कमी अंतराची स्पर्धा' अशी या स्पर्धेची ओळख आहे. केवळ दोन किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असली, तरी वळणा-वळणाच्या रस्त्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे. मुलांमध्ये सायकलबद्दल प्रेम जागृत व्हावे, या हेतूने ही स्पर्धा भरवण्यात येते.

39th custom point cycle race took place in prabhadevi mumbai on the occasion of independence day
author img

By

Published : Aug 15, 2019, 8:09 PM IST

मुंबई - स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी 'कस्टम पॉइंट'च्या वतीने सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात सायकलपटूंनी सहभाग नोंदवला होता. मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून एकूण 200 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे हे 39 वे वर्ष आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभादेवीमध्ये रंगला सायकल स्पर्धेचा थरार

'कमी अंतराची स्पर्धा' अशी या स्पर्धेची ओळख आहे. केवळ दोन किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असली, तरी वळणावळणाच्या रस्त्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे. मुलांमध्ये सायकलबद्दल प्रेम जागृत व्हावे, या हेतूने ही स्पर्धा भरवण्यात येते.

सायकल स्पर्धेतून सायकलपटू घडावेत, या उद्देशाने कस्टम पॉइंट गेली 39 वर्षे सातत्याने सायकल स्पर्धा आयोजित करत आहे. कस्टम पॉइंटच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. ते आज विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असल्याचे, कस्टम पॉइंटचे अध्यक्ष योगेश मानकामे यांनी सांगितले.

मुंबई - स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी 'कस्टम पॉइंट'च्या वतीने सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात सायकलपटूंनी सहभाग नोंदवला होता. मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून एकूण 200 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे हे 39 वे वर्ष आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभादेवीमध्ये रंगला सायकल स्पर्धेचा थरार

'कमी अंतराची स्पर्धा' अशी या स्पर्धेची ओळख आहे. केवळ दोन किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असली, तरी वळणावळणाच्या रस्त्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे. मुलांमध्ये सायकलबद्दल प्रेम जागृत व्हावे, या हेतूने ही स्पर्धा भरवण्यात येते.

सायकल स्पर्धेतून सायकलपटू घडावेत, या उद्देशाने कस्टम पॉइंट गेली 39 वर्षे सातत्याने सायकल स्पर्धा आयोजित करत आहे. कस्टम पॉइंटच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. ते आज विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असल्याचे, कस्टम पॉइंटचे अध्यक्ष योगेश मानकामे यांनी सांगितले.

Intro:मुंबई

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पर्यावरणाचा संदेश देत कस्टमपॉइंटच्या वतीने घेण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत सायकलस्वरानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. हे या स्पर्धेचे 39 वे वर्ष आहे. मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथून एकूण 200 स्पर्धक सहभागी झाले होते.
Body:कमी अंतराची अशी ओळख या स्पर्धेची ओळख आहे. ही रेस दोन किलोमीटरची जरी असली तरी वळणामुळे जास्त प्रसिद्ध आहे. मुलांमध्ये सायकल बद्दल प्रेम जागावे या हेतूने ही स्पर्धा भरवण्यात येते.


सायकल स्पर्धेतून सायकलपटू घडावेत याउद्देशाने गेली 39 वर्षे सातत्याने सायकल स्पर्धा आयोजित करीत असून कस्टम पॉइंटच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले असून ते आज विविध नामाकिंत कंपनीत कार्यरत असल्याचे अध्यक्ष योगेश मानकामे यांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.